Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

22 भारताचा भूगोल


भारताचा भूगोल


भारत हा एक प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला देश आहे. उत्तर भारतातील आर्यांच्या वास्तव्यामुळे यास आर्यावर्त म्हटले जाते. भरत राजाच्या आर्यांच्या शाखेमुळे भारतवर्ष नाव पडले तर वायव्येकडे वाहणा-या नदीस सिंधू नाव पडले. इरानी लोकानी सिंधू नदीचा उल्लेख हिंदू व भारताचा हिंदुस्थान असा केला- ग्रीक लोकांनी सिंधू नदीचा उल्लेख इन्डोस असा केला तर रुमानियन लोकांनी सिंधूस इंडस व भारतात इंडिया असे नाव दिले.

भारताचे स्थान :-

भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस–या प्रकारे तो उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या प्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८०४ उ. ते ३७०६ उ. अक्षांश ६८०७ पू. ते ९७०२५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६०३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.

भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-

भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत

भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक लागतो.

भारतास एकूण १५,१६८ कि.मी. लांबीची भू-सीमा लाभली आहे. ती खालील प्रमाणे-

संबंधित देश सीमेचे नाव लांबी संबंधित देश लांबी
चीन मॅकमोहन रेषा ४२५०कि.मी. नेपाल १०५० कि.मी.
पाकिस्थान रॅडक्लिफ लाईन ४०९०कि.मी. भूतान ०४७५ कि.मी.
बांग्लादेश रॅडक्लिफ लाईन ३९१०कि.मी. अफगाणिस्थान ————
ब्रम्हदेश ———— १४५०कि.मी. ———— ————

भारताच्या दक्षिण बाजूस हिंदी महासागर आहे. पश्चिम बाजूस अरबी समुद्र तर पूर्वेस बंगालचा उपसागर आहे. समुद्रमार्गे श्रीलंका हा देश भारतास सर्वात जवळ आहे. मन्नारचे आखात व पाल्कच्या सामुद्रधुनीमुळ श्रीलंका भारतापासून वेगळी झाली आहे.

भारताची प्राकृतीक रचना

प्राकृतीक रचना

प्राकृतीक रचना

भारताचे प्राकृतिक दृष्ट्या खालील पाच भाग पडतात.

१) उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश

२) उत्तरेकडील मैदाने

३) द्विकल्पीय पठार

४) किनारी मैदाने

५) भारतीय बेटे

भारताचा १०.७% भाग पर्वतीय, १८.६% भाग डोंगराळ, २७.७% पठारी व ४३% भाग मैदानी प्रदेशाचा आहे.

भारतीय उपखंडाची निर्मितीः-

भारतीय उपखंड

भारतीय उपखंड

आल्फ्रेड वेगनर याने या विषयी भूखंड वहन सिधांन्त मांडला. सद्याच्या हिमालय व मैदानी भागात पूर्वी टेथिस नावाचा समुद्र होता. टेथिसच्या उत्तरेस लॉरेशिया (अंगारा भूमी) व दक्षिणेस गोंडवाना भूमी होती. या महासागराचा विस्तार भारत-म्यानमारच्या सीमेपासून अटलांटिक महासागरातील गिनीच्या खाडीपर्यंत होता. दोन्ही बाजूच्या जमिनीच्या झीज होऊन ती टेथिस महासागरात जमा झाली. दोन्ही भूखंडाच्या परस्परांकडे सरकण्यामुळे गाळास वळ्या पडून पर्वताची निर्मिती झाली. या पर्वताची झिज होऊन गाळ टेथिस समुद्रात जमा झाली. अशा प्रकारे मैदानांची निर्मिती झाली.

१) उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशः-

पर्वतमय प्रदेश

पर्वतमय प्रदेश

जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाणार्‍या पामिर पठारापासून अनेक पर्वत श्रेणी निघालेल्या आहेत. यातील कुनलून पर्वत श्रेणी तिबेटकडे, तर काराकोरम काश्मिरकडे प्रवेश करते. यातच अक्साईचीनचे पठार आहे. बाल्टोरो व सियाचीन या येथील प्रमुख हिमनद्या आहेत. काराकोरमच्या दक्षिणेस अनुक्रमे लडाख व झास्कर पर्वत रांगा आहेत. कैलास पर्वतावर सिंधू नदी उगम पाऊन लडाख व झास्कर पर्वत रांगातून वायव्येकडे वाहत जाते.

हिमालय पर्वतः- सिंधू व ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्ये असणार्‍या पर्वत श्रेणीस हिमालय म्हणतात. याची लांबी २५०० किमी. असून रूंदी १५० ते ४०० किमी आहे. भारत-म्यानमार सीमेवर यास पूर्वाचल म्हणतात. हिमालयास तरुण पर्वत असे म्हणतात. भारतातून तिबेटकडे जातांना हिमालयाच्या खालील रांगा लागतात.
सिंधु नदी

सिंधु नदी

अ) शिवालिक किंवा उपहिमालयः- ही सर्वात कमी उंचीची पर्वत रांग आहे. मॄदेची सर्वाधिक झीज हिमालयाच्या या सर्वात तरुण भागात होते.याची सरासरी उंची १००० ते १२०० मी व रुंदी १० ते ५० कि.मी. आहे. या रांगेस नद्यांनी अनेक ठिकाणी छेदले असुन त्यास पश्चिमेसडे डून (उदाः- डेहराडुन, कोथरीडून,) व पूर्वेकडे द्वार म्हणतात. (उदाः- हरीद्वार)

ब) लघु हिमालय/ मध्य/लेसर/ हिमालयः- याची सरासरी रुंदी ८० किमी व उंची ४००० ते ५००० मी. इतकी आहे. निसर्ग सौंदर्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. उदाः- डलहौसी, धर्मशाळा, शिमला, मसुरी, नैनिताल, राणीखेत व दार्जिलिंग इ. यातच काश्मिर खोरे व काठमांडू खोरे आहे. यातील पर्वत उतारावरील गवताळ प्रदेशास काश्मिरमध्ये मग असे म्हणतात. (सोनमर्ग, गुलमर्ग) तर गढवाल हिमालयात यास बुग्याल व पयार म्हणतात. झेलम व बियास नद्यांच्या दरम्यानची पिरपंजाल ही पर्वत रांग लेसर हिमालयातील सर्वांत लांब रांग आहे. तसेच धौलपारु, नांगतिबा, महाभारत व मसुरी या पर्वत रांगा आहेत.

क) बृहत/ हिमाद्री/ग्रेटर हिमालयः- याची उंची सर्वाधिक म्हणजे सरासरी ६००० मी. आहे. येथे जगातील सर्वोच्च असणारे एव्हरेस्ट (नेपाल- ८८४८ मी. पर्वत) आहे. त्यास नेपाळमध्ये सागर माथा असे म्हणतात. इतर नंदादेवी, गंगा पर्वत इ.

ड) बाह्य हिमालय (ट्रान्स हिमालय ):-यात काराकोरम व झास्कर पर्वत रांगा आहेत. के -२ किंवा गॉडविन ऑस्टिन हे जगातील द्वितीय क्रमांकाचे शिखर (८६११ मी.) काराकोरम पर्वत रांगेत आहे. हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे.
शिखर उंची मी पर्वत रांग देश शिखर उंची मी पर्वत रांग देश
माउंट एव्हरेस्ट ८८४८ ग्रेटर हिमालय नेपाळ धौलगिरी ८१७२ बृहत हिमालय भारत
के-२ ८६११ काराकोरम(ट्रान्स) भारत ८१५६ बृहत हिमालय भारत
कांचनगंगा ८५९८ सिक्कीम भारत ८१२६ बृहत हिमालय भारत
———- ——- ग्रेटर हिमालय —— ८४८१ बृहत हिमालय भारत

इ) पूर्वाचलः- यात गारो, खासी, जैतिया, मिझो इ रांगा आहेत. भारत व म्यानमार दरम्यान पत्कोई व लुशाई पर्वत रांगा आहे.

प्रमुख खिंडी-

तिबेट-हिमालय मार्ग जातो – शिपकी ला खिंडीतून (हिमाचल प्रदेश)
भारतातून ल्हासा (तिबेट) पर्यंत जाणारा मार्ग जातो – नाथुला खिंडीतून (सिक्कीम)
लाकडाच्या उतारावरील खिंड – झोझीला (जम्मू काश्मिर)
हिमालयातील इतर खिंडी – बोमडिला (अरुणाचल प्रदेश) जेलपला (सिक्कीम), बारा लापचा ला (हिमाचल प्रदेश) थागला व नितीपास (उत्तराखंड व उ. प्रदेश), चुंबी खिंड (आसाम), खुजेराब (पाक व्याप्त काश्मिर POK) बुराझिल (जम्मू काश्मिर).

२) मैदानी प्रदेशः-

पश्चिमेकडे सतलज नदीपासून पुर्वेकडे ब्रम्हपुत्रा नदीपर्यंत पसरलेला २५०० किमी लांबीचा गाळाच्या संचायापासून तयार झालेला प्रदेश; याची निर्मिती गंगा, सिंधू व ब्रम्हपुत्रा यांच्या उपनद्यांनी केली आहे.
मैदानाचे पूर्व व पश्चिम असे विभाजन करणारा पर्वत – अरवली
शिवालीक उतारावर नद्यांनी वाहून आणलेल्या जाड्या भरड्या दगडांचे वाळू व खडे संचयन – भाबर (कंकर – UP)
भाबरमध्ये लुप्त झालेल्या नद्या प्रकट होतात असा भाबरच्या दक्षिणेकडील दलदलीचा भाग – तराई
मैदानी भागातील गाळाचा जुना थर – भांगर
दरवर्षीच्या गाळाने तयार होणा-या नवीन गाळाचे मैदान – खादर (बेत-पंजाब)
गंगा व ब्रम्हपुत्रेच्या संचयातून तयार झालेल्या जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश – बांग्लादेश
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा उतार – १ किमी ला १२ सेमी.

३) द्विकल्पीय पठारः-

हा भारतीय भूखंडावरील सर्वांत मोठा प्राचीन भाग आहे.
भारतील पठार बनले आहे – अग्निजम्य व रुपांतरीत खडकांचे
पठाराचे उत्तर व दक्षिण भाग झाले आहे – नर्मदा नदीमुळे
पठाराच्या ईशान्येस असणारा भाग –राजमहल टेकड्या
पठारी भागाच्या उत्तर सिमेवरील पर्वत – विंध्यपर्वत
पठाराच्या वायव्य भागात असणारी पर्वतरांग – अरवली
अरवली पर्वताच्या वायव्येचा भाग – मारवाडचे पठार
अरवली व विंध्य पर्वताच्या दरम्यान असणारे पठार – (चंबळचे खोरे, बनास, काली, विंध्य नद्या) – माळव्याचे पठार
उत्तरेकडील पठाराच्या पूर्वेकडील भागास नाव – (दामोदर व सुवर्ण रेखा नदीचे खोरे) – छोटा नागपूरचे पठार
यमुना नदी व विंध्य पर्वतादरम्यानचा भाग – बुंदेलखंड
उत्तरेपासून सातपुडा पर्वतापासून द्विपकालापर्यंतचा प्रदेश – दख्खनचे पठार ( महाराष्ट्र पठार )
दख्खनच्या पठाराची निर्मिती – भेगी उद्रेकाने लाव्हा रसाने थरावर थर साचून झाली.
नर्मदा व तापी नदीस वेगळी करणारी पर्वतरांग – सातपुडा
सातपुडा पर्वताच्या उपरांगा – महादेव, मैकल व राजपिपला
दख्खनच्या पश्चिम किनारी भागाचे नाव – पश्चिम घाट
पश्चिम घाटाची स्थानिक नावे – महाराष्ट्र व कर्नाटक – सह्याद्री, तामिळनाडू, निलगिरी
पठारावरील प्रमुख जलविभाजक – पश्चिम घाट
पश्चिम घाटाची लांबी – १६०० किमी असुन सरासरी उंची १००० मी.
पश्चिम घाटातील डोंगररांगा – सह्याद्री, निलगिरी, अन्नामलाई, कार्डमम
पश्चिम घाटातील उंची – उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत जाते
पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर – अनाईमुदी २६९५ मी. (केरळ)
तेलंगना पठार हे ग्रॅनाईट या अच्छिद्र अग्निजन्य खडकांचे बनले आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झाली आहे.
गोदावरी नदीने या पठाराचे दोन भागात विभाजन केले आहे.
सह्याद्री व निलगिरी पर्वत एकत्र येतात – गुड्लूर जवळ
कर्नाटक पठार (म्हैसुर पठार) दक्षिणेकडील पठाराचा हा तिसरा भाग आहे.
निलगिरी पर्वताच्या दक्षिणेकडून कोचीन मद्रास रेल्वे मार्ग जातो – पाल घाट खिंडीतून
पलनी टेकड्यांवर २१३५ मी. उंची वरील थंड हवेचे ठिकाण – कोडाईकॅनॉल (तामिळनाडू)
केरळ व तामिळनाडूच्या सीमेवर – अन्नामलाई व कार्डमम डोंगर
दख्खनच्या पठाराची पूर्व सीमा – पूर्व घाट
विखंडीत अशा पूर्व घाटाची एकूण लांबी – १०७० कि.मी.
पूर्व घाटाची सरासरी उंची आहे – ६०० मी.
पूर्व घाटातील रांगा – महेंद्रगिरी, नल्लामलाई, खेलिकोंडा, पालकोंडा, पचमलाई
पूर्व घाटातील महानदी गोदावरी खो-याच्या दरम्यानचा भाग – महेंद्रगिरी पर्वत रांग
कृष्णा व पेन्नेरु नद्या दरम्यानची पर्वत रांग – नाल्ला माला

पर्वत रांगा सर्वोच्च शिखर, उंची व राज्य थंड हवेचे ठिकाण
हिमालय (घडीचा) माउंट एव्हरेस्ट – ८८४८ मी. ( नेपाळ ) सिमला, मसुरी, नैनिताल
——- गॉडविन ऑस्टीन – ८६११ मी. ( भारत ) ——-
अरवली पर्वत (अवशिष्ट) सर्वांत प्रचिन रंग, गुरु शिखर – १७२२ मी. माउंटआबू ११५८ मी. ( राजस्थान )
सातपुडा धुपगड – १३५० मी. (होशंगाबाद, मध्यप्रदेश) ——–
——– महाराष्ट्रातील बैराट – ११७७ मी. पंचमढी, तोरणमाळ, चिखलदरा
पश्चिम घाट अनाईमुदी २६९५ मी. (केरळ) उग्दमंडल ( उटी ), तामिळनाडू
निलगिरी पर्वत दोडाबेट्टा २६३७ मी. (तामिळनाडू ) ——–
पूर्व घाट १) दिशाखापट्टनम जिल्ह्यातील शिखर – १६८० मी. ——–
——– २) तिमाई गिरी – १५१५ मी. ——–
——– ३) महेंद्रगिरी – १५०१ मी. ( आंध्रप्रदेश ) ——–

३) किनारी मैदानेः-

भारतातील समुद्र किनारा लाभलेले एकूण राज्ये – ९ राज्ये व ४ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभलेले राज्य – १) गुजरात २) आंध्रप्रदेश
कच्छच्या रणापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या पश्चिम किनारपट्टीची सरासरी रुंदी –६४ कि.मी.
पश्चिम किनारपट्टीचा सर्वाधिक रुंद भाग – नर्मदा व तापीचे मुख
पश्चिम किनारपट्टीचे गुजरात मधील नावे –कच्छ त्ट व गुजरात मैदान
पश्चिम किनारपट्टीचे महाराष्ट्रातील नाव – कोकण किनारा
गोवा ते मंगलोर ( कर्नाटक ) पर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीचे नाव – कानडा/कारवार
मलबार किना-याचे ( केरळ )वैशिष्ट्य – मसाल्याची पिके
मंगलोर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या मलबार किना-याचे वैशिष्ट्य – वाळूच्या दांड्यामुळे झालेले कायले (लंगून)
पश्चिम किना-यावरील प्रमुख बंदरे – कांड्ला ( गुजरात ), मुंबई, न्हावा शेवा (महाराष्ट्र), मार्मागोवा ( गोवा ) मंगलोर ( कर्नाटक ), कोचीन ( केरळ )
सुंदरबन पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला पुर्व किनारपट्टीची रुंदी – १०० ते १५०
महानदी व गोदावरी खो-या दरम्यानचे किनारपट्टीचे नाव – उत्तर सरकार
कृष्णा व कावेरी नदीच्यादरम्यान नाव - कोरोमंडल किनारा
पूर्व किनारपट्टीच्या मध्यभागाचे नाव – काकिनाडा
महानदीचा त्रिभूज प्रदेश, चिल्का सरोवर ( खारे ) व विशाखापट्टनम बंदरे असणारे मैदान –उत्कल मैदान ( ओरीसा )
कृष्णा व गोदावरी त्रिभूज प्रदेशाच्या दरम्यान असणारे गोड्या पाण्याचे सरोवर – कोलेरु ( आंध्रप्रदेश )
७०० कि.मी. लांबीचे कायले – पुलिकत ( लंगूर ) आंध्रप्रदेश
पूर्व किना-यावरील बंदरे – चेन्नई ( तामिळ्नाडू ), विशाखापट्टनम ( आंध्रप्रदेश ), हाल्दीया, कोलकाता ( प. बंगाल ), पॅराद्विप ( ओरिसा ), येन्नोर, तुतिकोरीन ( तामिळ्नाडू )

३) भारतीय बेटेः-

ज्वालामुखी पर्वताभोवती प्रवाळ किटकांचे संचयन होऊन तयार झालेले अरबी समुद्रातील बेटे – लक्षद्विप
सरासरी ५ मी. उंची व कावरती ( राजधानी ) लखदीव, अमिनी, चेटलाट, मिनीकॉय अशा ३६ बेटांचा हा समूह केरळपासून २८० ते ४८० कि.मी. वर आहे.
बंगालच्या उपसागरातील आरकानयोमा या बुडालेल्या पर्वताची शिखरे म्हणजे – अंदमान निकोबार बेट समुह
निकोबार समुहात २२ बेटे असून सर्वात मोठे बेट – बृहतनिकोबार
सरासरी ७५० मीटर उंची असणा-या या अंदमान निकोबार द्विपसमुहाचे अंतर चेन्नईपासून ११८५ कि.मी. तर कलकत्यापासून १२५० कि.मी. आहे.
पोर्टब्लेअरच्या दक्षिणेस जागृत ज्वालामुखी बेटे – बॅरन व नारकोंडम बेट
समुद्र किना-यावरील बेट – सागर, न्यूमुर, पांबन, श्रीहरीकोटा, हेअर द्विप

भारतातील थंड हवेची ठिकाणे
ठिकाण राज्य ठिकाण राज्य ठिकाण राज्य
माउंट अबु राजस्थान दार्जिलिंग प.बंगाल शिलॉग मेघालय
आल्मोडा उत्तराखंड नैनिताल उत्तराखंड मसुरी उत्तराखंड
कूल, मनाली हिमाचल प्रदेश डलहौसी हिमाचल प्रदेश सिमला हिमाचल प्रदेश
गुलमर्ग जम्मू काश्मिर सोनमर्ग जम्मू काश्मिर पंचमढी मध्यप्रदेश
उद्धगमंदलम (उटी) तामिळनाडू कोडाई कॅनॉल तामिळनाडू कॉलीपॉग प.बंगाल
महाबळेश्वर महाराष्ट्र पाचगणी महाराष्ट्र राणीखेत प.बंगाल
कसौली पंजाब कुन्नूर तामिळनाडू धर्मशाळा हिमाचल प्रदेश
पहलगाम जम्मू काश्मिर कांगडा, मंडी हिमाचल प्रदेश मन्नार केरळ
अनंतगिरी आंध्रप्रदेश नंदी हिल्स कर्नाटक वायनाड केरळ
येरकॉड तामिळनाडू

जलप्रणाली

हिमालयीन नद्या
हिमालयीन नद्या

हिमालयीन नद्या

हिमालयात उगम पावणा-या नद्या बारमाही स्वरुपाच्या आहेत.

१)सिंधू नदी प्रणालीः-

सिंधू नदी

सिंधू नदी

हिचा उगम तिबेटमध्ये कैलास पर्वतावर सेंगेरुबाब येथील मानसरोवरातून होतो. हिची एकूण लांबी २९०० कि.मी. असून भागातून ७०९ कि.मी. वाहते. सतलज, बियास ( व्यास ) रावी, चिनाब, झेलम या हिच्या प्रमुख उपनद्या आहेत. ही ५१८१ मी. खोल घळईतून वाहते. कराची जवळ अरबी समुद्रास मिळते.

लाहूल (हि.प्रदेश) येथे चंद्र व भागा या दोन नद्यांच्या संगमातून तयार होणारी सर्वात मोठी उपनदी – चिनाब
रावी व चीनाब नद्यांचा संगम – मुलतान जवळ (पाकिस्थान)
बियास नदी पंजाबच्या मैदानात प्रवेश करते – मिरताल जवळ
बुलर सरोवरातून वाहणारी व झंग (पाकिस्थान) येथे चिनाब नदीस मिळणारी नदी – झेलम
सिंधू पाणी वाटप करानुसार भारतास मिळणारे पाणी – २०%

२) गंगा नदी प्रणालीः-
गंगा नदी

गंगा नदी

गंगा नदी भागिरथी व अलकनंदा यांच्या संगमातून उगम पावते. देव प्रयाग येथे हा संगम होतो. तेथून तिला गंगा म्हणतात. भागिरथी हा मुळ प्रवाह मानतात. तिचा उगम गोमुख (गंगोत्री, हिमनदी, उत्तराखंड) येथून होतो. गंगा नदी हरिद्वार येथे मैदानी प्रदेशात प्रवेश करते. गंगा ही नदी असून तिची लांबी २५१० कि.मी. इतकी आहे. ती हरिद्वार पासून मिर्झापूर पर्यंत आग्रेयेकडे व नंतर पूर्वेकडे वळते. अलाहाबाद (प्रयाग) येथे यमुना येऊन मिळते. गंगेस उजवीकडून यमुना, शोण, दामोदर ह्या उपनद्या तर डावीकडून रामगंगा, गोमती, घाग्रा (शरयू) गंडक, कोसी या उपनद्या येऊन मिळतात.

गंगेची सर्वात मोठी उपनदी – यमुना
गंगा भारतातील पाच राज्यांतून वाहते – उत्तराखंड, उ.प्रदेश, झारखंड, बिहार व प. बंगाल
दामोदर या हुगळीच्या उपनदीस बंगालचे दुःखाश्रु असे म्हणतात
गंगेची सर्वात मोठी दितरिका – हुगळी

अ) यमुना –
यमुना

यमुना

ही नदी यमुनेत्री येथे उगम पावते, ताजेवाला येथे मैदानी भागात प्रवेश करते. विंध्य पर्वतातून उगम पावणा-या चंबळ, बेतवा, केन, सिंद या नद्या यमुनेला येऊन मिळतात.

ब) कोसी –
कोसी

कोसी

कांचनगंगा (नेपाळ) येथे उगम पावते. सात छोट्या नद्यांच्या एकत्रीकरणातून तयार होते. छतरा येथे मैदानी भागात प्रवेश करते. हिच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. महापूर व अचानक मार्ग बदलणे यासाठी ती प्रसिध्द आहे. गेल्या २०० वर्षात ती ११० कि.मी. पश्चिमेकडे सरकली आहे. सध्या ती कारागोलाजवळ गंगेस मिळते. तिच्या या रुपामुळे तिला बिहारचे दुःखाश्र असे म्हणतात.

क) क्षिप्रा–
क्षिप्रा

क्षिप्रा

क्षिप्रा नदीकाठी उज्जैन येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो. (चंबळची उपनदी)

ड) घग्गर –
घग्गर

घग्गर

हरीयाणात हनुमानगढ येथे लुप्त होते.

२)ब्रम्हपुत्रा नदी प्रणालीः-

ब्रम्हपुत्रा नदी तिबेटमधील कैलास पर्वतात मानसरोवर जवळ चोमायांग दुंम येथे उगम पावते. तिबेटमधुन त्सांगपो नावाने वाहते. नामचा बारवा येथून दक्षिणेला वळून भारतात अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. दिहांग, दिबांग व लोहीत या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास ब्रम्हपुत्रा असे म्हणतात. गंगा व ब्रम्हपुत्राच्या एकत्रित प्रवाहास पद्मा असे म्हणतात. गंगा व ब्रम्हपुत्रेचा संगम ग्वालंदेजवळ होतो. गंगा – ब्रम्हपुत्रेच्या वितरिका – मधुमती, पद्मा, सरस्वती, हुगळी व भागिरथी ब्रम्हपुत्रेस मोठ्या प्रमाणावर येणा-या पुरामुळे तिला आसामचे अश्रू असे म्हणतात. तर जलवाहतुकीस उपयुक्त असल्यामुळे आसामची जीवनरेषा असे म्हणतात.

पठारावरील नद्या

पठारावरील नद्या

पठारावरील नद्या

१) बंगालच्या उपसागरास मिळणा-या नद्याः-

बंगालच्या उपसागरास मिळणा-या नद्या

बंगालच्या उपसागरास मिळणा-या नद्या

अ) गोदावरी – ही पठारावरील सर्वांत मोठी व भारतातील द्वितीय क्रमांकाची नदी आहे. हिला दक्षिण भारताची गंगा किंवा वृध्द गंगा असेही म्हणतात. हिचा उगम त्रंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतावर होतो. महाराष्ट्रात ती आंध्रप्रदेशमध्ये प्रवेश करते.

ब) कृष्णा – हिचा उगम महाबळेश्वर येथे होतो. पुढे कर्नाटकात प्रवेश करते. आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे तिच्या अनेक शाखा होतात. भारतातील एकुण लांबी १२९० कि.मी. आहे.

क) कावेरी - कर्नाटक मधील कुग जिल्ह्यात ब्रम्हगिरी येथे उगम पावते.कर्नाटक व तामिळणाडू या राज्यातून ६७० कि.मी. वाहत जाउन कावरीपट्टनम जवळ बंगालच्या उपसागरास मिळते. शिव समुद्र जवळ ११० मी. चा धबधबा आहे. या नदीत शिवसमुद्र व श्रीरंगपट्ट्नम ही दोन बेटे आहेत.

ड) महानदी - हिचा उगम छत्तीसगढ राज्यात अमरकंटक रागांत बस्तर टेकड्यांवर होतो. हि ओरिसातील सर्वांत मोठी नदी आहे. ८९० कि.मी. प्रवास करुन कटक जवळ बंगालच्या उपसागरास मिळते.

१) अरबी समुद्रास मिळणा-या नद्याः-

अरबी समुद्रास मिळणा-या नद्या

अरबी समुद्रास मिळणा-या नद्या

अ) लुनी - अरवली पर्वतात नाग डोंगरावर उगम पावून कच्छच्या रनास मिळते. हि वाळवंटातून लुप्त होते.

ब) मही – मध्यप्रदेशातील विंध्य पर्वतावर उगम पावते. ५३३ कि.मी. अंतरपार करुन खंबयतच्या आखातास मिळते.

क) साबरमती – राजस्थानच्या डूंगरपूर जिल्ह्यातील अरवली प्रर्वतात उगम पावून ३०० कि.मी. प्रवास करुन खंबायतच्या आखातास मिळते.

ड) नर्मदा - छत्तीसगढ राज्यात अमरकंटक पठारावर मैकल पर्वतरांगेत उगम पावते. पश्चिमेकडे वाहत जाऊन ती भडोच जवळ अरबी समुद्राला खंबायतच्या आखाताला जाऊन मिळते. प्रवाह मार्गात जबलपूरजवळ ती भेडाघाट येथे धुवाँधार धबधबा निर्माण करते. संगमवरी दगडांतून कपिल धारा धबधबा निर्माण करते. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून ५४ कि.मी. वाहते. ती खचदरीतून प्रवास करते. एकूण लांबी १२९० कि.मी. आहे.

इ) तापी – तापीचा उगम मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात महादेव डोंगररांगात मुलताई येथे उगम पावते. उत्तरेकडील सातपुडा व दक्षिणेकडील सातमाळा अजिंठा रांगातून वाहते. ही महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते. महाराष्ट्रात २१० कि.मी. वाहून नंदुरबारमधून गुजरात मध्ये प्रवेश करते. ७२४ कि.मी.चा प्रवास करून सुरतजवळ खंबायतच्या आखातास मिळते.

फ) पेरियार – ही तामिळनाडू उगम पाऊन केरळमध्ये जाते. पेरियार ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे.

सोन नदीची प्रमुख उपनदी - रिहांद
अरवली पर्वताचे विभाजन करणारी नदी - बनास.
पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक – क्यूसेक (घनफुट प्रती सेकंद), क्यूमेक (घनमीटर प्रतीसेकंद)
भारतातील सर्वांत मोठा धबधबा शरावती नदीवर आहे – गिरसप्पा/जोग/महात्मा गांधी धबधबा – २५३ मी. (कर्नाटक)

नदी प्रमुख उपनद्या
सिंधू रावी, बियास, चिनाब, सतलज, झेलम
गंगा यमुना, शोण, दामोदर, घाग्रा, रमगंगा, गोमती, गंडक, कोसी, शारदा, राप्ती
यमुना चंबळ, बेतवा, केन, सिंद, बाणगंगा
चंबळ सिंधू, पार्वती, बनास, काळी सिंधू, क्षिप्रा
ब्रम्हपुत्रा दिहांग, दिवांग, लोहित, मानस, घनसिरी, कापिली, तिस्ता, जयभोरेली
गोदावरी वैनगंगा, इंद्रावती, मांजरा, प्रवरा, कादवा, सिंदफणा, पूर्णा, वर्धा
कृष्णा कोयना, येरळा, दूधागंगा, मलप्रभा, भिमा, तुंगभद्रा, घटप्रभा, मुसी, पंचगंगा
नर्मदा डावीकडून – ब-हनेर, बंजार, शार, शक्कर, दुधी व तवा

उजवीकडून – हिरण, आरसांग, बारणा व कोलार
तापी पूर्णा, पांझरा, गिरणा, अनेर, बोरी, नळगंगा, चंद्रभागा, काटेपूर्णा
नदी काठावरील शहरे नदी काठावरील शहरे
गंगा हरिद्वार, कानपूर, मुंगे, मुर्शिदाबाद, बनारस (वाराणसी) पाटना चंबळ कोटा
तापी सुरत कावेरी तिरुचिरापल्ली, श्रीरंगपट्टनम
ब्रम्हपुत्रा दिब्रूगड, गुवाहाटी यमुना दिल्ली, आग्रा, मथुरा, इटावा
झेलम श्रीनगर शरयू (घाग्रा) अयोध्या
सतलज फिरोरपूर, लुधियाना हुगळी कोलकाता
कृष्णा विजयवाडा गोमती लखनौ
गोदावरी नाशिक, राजमहेंद्री, नांदेड साबरमती अहमदनगर
अलकनंदा उत्तरकाशी महानदी कटक
मुशी हैद्राबाद क्षिप्रा इंदोर
मांडवी पणजी तावी जम्मू
नर्मदा भरुच तुंगभद्रा कर्नुल

भारतातील प्रमुख नद्यांची माहिती
नदी उगम लांबी (कि.मी) मिळते
सिंधू कैलास पर्वतात मानसरोवर जवळ (तिबेट) २९००/७०९ (भारत) अरबी समुद्र
झेलम वैरीनाग (पीरपंजाल) ४०० सिंधू (पाकिस्थान)
रावी कुलू टेकड्या, रोहतांग खिंड (हिमाचल प्रदेश) ७२५ सिंधू (पाकिस्थान)
बियास बियास कुंड (हिमाचल प्रदेश) ४७० सतलज नदी
चिनाब लाहुल (बारा लापचा खिंड, हिमाचल प्रदेश) १८००/११८० सिंधू (पाकिस्थान)
सतलज राकस सरोवर (तिबेट) १५००/१०५० सिंधू (पाकिस्थान)
ब्रम्हपुत्रा मानसरोवर, चोमायांग दुंम हिमनदी (तिबेट) २९००/८८५ बंगालचा उपसागर
गंगा गंगोती (उत्तराखंड) २५१० बंगालचा उपसागर
यमुना यमुनेत्री (बंदरपु्छ) १३०० गंगा (अलाहाबाद)
घाग्रा (शरयू) मापचाचुंग हिमनदी (तिबेट) १०८० गंगा (छपरा) बिहार
कोसी कांचनजंगा पर्वत ७३० गंगा (कारागोला)
गंडक (नारायणी-नेपाळ) धवलगिरी (मध्य हिमालय) ४२५ गंगा (पटना)
रामगंगा बृहद हिमालय (गढवाल) ६०० गंगा (कनोज)
शारदा (काळी गंगा) मिलाप हिमनदी घाग्रा (बहरामघाट)
राप्ती रुकुम कोट (नेपाळ) ६५० घाग्रा (बरहज)
गोमती पिलीभीत ( उ. प्रदेश) गंगा (गाजिपूर)
चंबळ महू (म. प्रदेश) ९५० यमुना
बेतवा कुमरा (म. प्रदेश) विंध्य पर्वत ४७५ यमुना
सिंध सिरोज (गुना – मध्य प्रदेश) चंबळ ( उ.प्रदेश)
काली सिंध देवास (म.प्रदेश) चंबळ ( उ.प्रदेश)
केन विंध्य पर्वत यमुना( उ.प्रदेश)
क्षिप्रा काक्री बरडी डोंगर (इंदोर) चंबळ
बाणगंगा बैरट दोम्गर (जयपूर) यमुना (फतेबाद)
बनास कुंभगढ (खमनौर डोंगर) ४७५ चंबळ
सोन अमरकंटक (विंध्य) ७७५ गंगा (रामनगर-पटना)
गोदावरी ब्रम्हगिरी (त्रंबकेश्वर-नाशिक) १४५० बंगालचा उपसागर
कृष्णा महाबळेश्वर १२९०/२८० बंगालचा उपसागर
कावेरी ब्रम्हगिरी (कुर्ग, कर्नाटक) ७६० बंगालचा उपसागर
महानदी अमरकंटक (छत्तीसगढ) ८९० बंगालचा उपसागर
पेन्नार कोलार (कर्नाटक) ९७० बंगालचा उपसागर
तुंगभद्रा ग्म्गामुळ व काडूर (कर्नाटक) ६४० कृष्णा
नर्मदा अमरकंटक (छत्तीसगढ) १२९० अरबी समुद्र
तापी मुलताई (बैतूल) ७२४ अरबी समुद्र
बराक गोमुंडा टेकड्या (उदयपूर) १९० बनास नदी
तवा महादेव डोंगर (म. प्रदेश) नर्मदा
मणिपूर मणिपूर राज्य
इंद्रावती कालाहारी प्रांत (ओरिसा) गोदावरी (आंध्र प्रदेश)
भिमा भिमाशंकर ४५१ कृष्णा (रायपूर)
साबरमती जयसमुद्र सरोवर (उदयपूर-राजस्थान) ४०० खंबायतचे आखात
दामोदर तोरी (छोटा नागपूर) १३६६ हुळबी

संकिर्ण बाबी
धबधबा उंची (मी) नदी राज्य
गिरसप्पा धबधबा (जोग) २५३ शराबती कर्नाटक
शिवसमुद्र ९० कावेरी कर्नाटक
धुवाँधार १५ नर्मदा मध्यप्रदेश
चुलिया २० चंबळ कोटा ( राजस्थान )
वेण्णा १८० वेण्णा महाबळेश्वर

सरोवरे :-

सरोवरे

सरोवरे

हिमनदीद्वारा निर्मित सरोवरे – नैनिताल, भिमताल, राकसताल इ.
उल्कापातातून तयार झालेले सरोवर – लोणार (बुलढाणा-महाराष्ट्र) खारे
भूमंच विवर्तनाने निर्मित सरोवर – बुलर (सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर – काश्मिर)
कायले (लंगून) – ओरिसातील चिल्का हे सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर आहे. पुलीकत (आंध्रप्रदेश), बेंबनाद, इष्ठमुदी (क्विनान – केरळ)
वायुद्वारा निर्मित सरोवर - डिडवाना सांबर (राजस्थान)
गोड्या पाण्याची सरोवरे – वुलर, दाल, शेषनाग, अनंतनाग, गंधारवाल, नागिन (जम्मू काश्मिर), हुसेनसागर (आंध्रप्रदेश) नैनिताल (उत्तराखंड), पुष्कर (राजस्थान)
खा-या पाण्याची सरोवरे - चिल्का (पुरी ओरिसा) पुलीकत (आंध्रप्रदेश) बेंबनाद, इष्ठमुदी (केरळ) सांबर (राजस्थान) लोणार (बुलढाणा) दीडवाणा, मेंढा, खंडेल, हरियाणा (राजस्थान)
इतर – उदय सागर, पुछौला, फतेहसागर, जयसमुद्र, राजसमुद्र (राजस्थान), लोकटक (मणिपूर), हुसेनसागर (आंध्रप्रदेश)

भारताचे हवामान

भारत हा उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात होतो.
मान्सून या शब्दाची उत्पत्ती मौसिम या अरबी शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ ऋतू असा होतो. मान्सून प्रदेशातील वा-याच्या दिशेत ऋतूप्रमाणे परिवर्तन होते.
भारताच्या हवामानावर सर्वाधिक परिणाम करणारे घटक – हिमालय, हिंदी महासागर, भुपृष्ठ उठाव.
भारतात सर्वसाधारणपणे आढळणारे ऋतू – चार
भारतातील पावसाळा ऋतूचा कालावधी – जून ते सप्टेंबर
भारतातील एकूण पर्जन्यात नैऋत्य मोसमी वा-यांचा वाटा - ७५ ते ९० %
मान्सून्चा अंदाज घेण्यासाठी मान्सून मॉडेल तयार केले – डॉ. वसंतराव गोवारीकर
मान्सूनच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारा घटक – एल बिनो (द. प्रशांत महासागरातील उष्ण प्रवाह)
मोसमी वारे संपूर्ण देशात पोहचल्यानंतर ढगांचा गडगडाट व विजांचा चमचमाट होऊन पाउस पड्तो यास संज्ञा – मान्सूनचा विस्फोट
भारतात पडणारे वार्षिक सरासरी पर्जन्य – १२० सेमी
भारतात (जगातील) सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण – १) माउसिनराम – ११४२० मिमी. (गारो, खासी टेकड्या, मेघालय), २) चेरापुंजी – १०८७ मिमी. ( मेघालय, चेरापुंजीचे नवीन नांव सोहरा असे करण्यात आले आहे.)
पश्चिम घाटाच्या पवनविन्मुख बाजूस म्हणतात – पर्जन्य छायेचा प्रदेश
राजस्थानामधील जैसलमेर येथील वार्षिक पर्जन्य - ९ सेमी.
जगाचे सरासरी वार्षिक पर्जन्य – ९९ सेमी
भारतातील मान्सून परतीचा काळ – ऑक्टोंबर – नोव्हेंबर
मान्सून परतीच्या काळात आद्र जमीन व उच्च तापमान असते यास म्हणतात.
बंगालच्या उपसागरात कमी दाब निर्माण होऊन चक्रीवादळे येण्याचा काळ – नोव्हेंबर
पावसाळा व हिवाळा या ॠतूंचा संक्रमणाचा काळ – ऑक्टोंबर – नोव्हेंबर
भारतातील ईशान्य मोसमी वा-यांचा काळ/हिवाळा – डिसेंबर ते फेब्रुवारी
हिवाळ्यात भूमध्य सागर, इराण, अफगाणिस्थान पाकिस्थान मार्गे भारतात येणा-या पश्चिमी वा-यांमुळे पाऊस पडणारी राज्ये - पंजाब, राजस्थान (पाऊस), हि. प्रदेश, काश्मिर (हिम)
भारतात ईशान्य मोसमी वा-यापासून पाउस पडणारी राज्ये - तामिळणाडू, आंध्रप्रदेश
सार्वाधिक थंडीचा महिना – जानेवारी
भारताती उन्हाळ्याचा कालावधि - मार्च ते मे
उन्हाळ्यात उत्तर भारतात अत्याधिक तापमानामुळे वाहणारे अति उष्ण वारे – लू
केरळ व कर्नाटकच्या किना-यावर होणारी मान्सून पुर्व वर्षा - आम्रवृष्टी/वळवाचा पाऊस
वैशाख महिन्यात बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे व वायव्येकडील उष्ण व कोरडे वारे यांच्या संमिलनातून होणारी गडगडाटी वादळे (पं. बंगाल व ओरिसा) – नॉर्वेस्टर/काल बैसाखी
भारतातील सर्वात शुष्क प्रदेश - लेह (काश्मीर)
भारतातील सर्वाधिक दुष्काळ पडणारे राज्य – कर्नाटक
समुद्र सानिध्य लाभलेला प्रदेशात हवामान वर्षभर – सम असते
समुद्र सनिध्यापासून दूर अंतर्गत भागात हवामान असते – विषम
मान्सून न पोहोचल्यामुळे शुष्क असणारे प्रदेश – किन्नारे व लाहुल (हिमाचल प्रदेश) लडाख (जम्मू काश्मिर)
मोसमी वारे पोहोचुनही वाळवंटामुळे आर्द्रता ग्रहण केली जाऊन शुष्क झालेला भाग - पश्चिम राजस्थान

भारतातील नैसर्गिक संपत्ती

नैसर्गिक संपत्ती

नैसर्गिक संपत्ती

वनेः-

भारतात असणा-या एकूण वृक्षांच्या जाती – ४९०००
भारतात आढळणा-या वनस्पतींपैकी ४०% जाती तिबेट व चीन मधून आणण्यात आल्या आहे त्यांची जात – बोरिबल
फक्त भारतातच सापडणा-या वनस्पतींच्या जाती – ५०००
पर्यावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक जंगलांचे प्रमाण - ३३% (१९५२ चे वन धोरणानुसार)
भारतातील एकूण वनाखालील क्षेत्र – ६.३ को.हे. (१९.२७%), प्रत्यक्षात असणारी दाट वने – ४.६ को.हे. (११.५१%)
वनाखाली सर्वाधिक क्षेत्र असणारे राज्य – मध्यप्रदेश
वनाखाली सर्वाधिक क्षेत्र (टक्केवारी) असणारे राज्य – अरुणाचल प्रदेश (८२.२१)
भारतातील वनाखाली सर्वाधिक क्षेत्र – अंदमान निकोबार (९२.२%)
वनाखाली सर्वांत कमी क्षेत्र असणारे राज्य – गोवा
भारतात वनाखाली सर्वांत कमी क्षेत्र (%) – हरियाणा (३.८२%)
मॅग्रोव्ह जंगलांचे सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य - पं. बंगाल, गुजरात
भारतात दरदोई सर्वांधिक वनांचे प्रमाण असणारे राज्य – अरुणाचल प्रदेश

भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार प्रशासकीय दृष्टीने भारतीय वनांचे वर्गिकरणः-

वन

वन

१) राखीव वने (Reserved forest) – यांना राष्ट्रीय संपत्ती मानले जाते. वृक्षतोड व चराई यावर कडक प्रतिबंध असतात.

२) संरक्षित वन (Protected forest) - काही नियमांच्या आधारे लाकूड तोड व गुरे चराईला परवानगी असते.

३) अवर्गिकृत वने – काही फी आकारुन लाकुडतोड व गुरे चराईस स्वातंत्र्य असते.

४) इतर वने

वनांचे प्रकार – पर्जन्याची भिन्नता, समुद्र सपाटीपासून ऊंची, हवामानानूसार वनांचे प्रकार -

१) उष्णकटिबंधीय सदाहरित वने – वर्षभर समान तापमान व २०० सेमी पेक्षा पर्जन्याच्या प्रदेशात आढळतात. ही वने मिश्र असतात. पश्चिम घाटाचा उतार, मेघालय, अंदमान, निकोबार, प.बंगाल, ओरिसा ही जंगले आढळतात. ह्या वृक्षांचे लाकुड कठीण असते. उदाः मोहगनी, रोजवूद, आयर्नवूड, रबर, आबनुस, एबोनी, सिंकोना, नारळ, ताड, बांबू इ.

२) उष्णकटिबंधीय मोसमी पानझडी वने – भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतात. १०० ते २०० सेमी. पर्जन्य घडणा-या प्रदेशात आढळतात. या वनांना लवकर आग लागते. आर्थिक दृष्ट्या ही वने महत्वाची आहेत. या वनांत साग, सास्ल, चंदन, शिसव, मोह, पळस, अर्जुन, खैर इ. वृक्ष आढळतात. उन्हाळ्यात ६ ते ८ आठवडे ही वृक्ष पाने गाळतात. प्रत्येक जातीच्या पानळीची वेळ भिन्न असते. ही वने पश्चिम घाटाचा पूर्व उतार, पूर्व मध्यप्रदेश, द. बिहार, ओरिसा, शिवकालिक टेकड्या, पूर्वघाट तसेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, येथे आढळतात.

३) काटेरी वने - ८० सेमी. हन कमी पर्जन्य असणा-या प्रदेशात ही वने आढळतात. सौराष्ट्र ते पंजाब माळवा प्रांत, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सोलापूर, मराठवाडा इ. भागात आढळतात. या वृक्षाची मूळे खोल गेलेली असतात. यात बाभूळ, खजूर, निवडूंग, नागफनी इ. आढळतात.

४) मॅग्रोव्ह वने - हि वने नद्यांच्या त्रिभूज प्रदेशात आढळतात. या भागात सुंदरी वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याने त्यास सुंद्री वने असे म्हणतात. यात सुंद्री, चिप्पी, मारांडी, निपा, तिबर, उंडल इ. वृक्ष आढळतात. ही वने गोड्या व खा-या अशा दोन्ही पाण्यात वाढतात. यांचा सर्वाधिक विस्तार गंगा-ब्रम्हपुत्रेच्या त्रिभूज प्रदेशात आहे.

५) पर्वतीय वनेः-

१) आर्द्रपर्वतीय वने - १००० ते २००० मी. पर्यंत ही वने आढळतात. यात ओक, चेस्टनट, सफ रचंद, ऎश, बीच ही वृक्षे आढळतात.

२) समशीतोष्ण सूचिपर्णि वने - १६०० ते ३३०० मी. प्रर्यंत ही वने आढळतात. बीच, चीड, सिडार, देवदार, स्प्रुस इ. वृक्ष आढळतात.

३) ३६०० पेक्षा जास्त उंचीवर आल्फाईन वने आढळतात. यात सिल्व्हर, चीड, बर्च, जुनियर इ. वृक्ष आढळतात. यापेक्षाही अधिक उंचीवर गवताळ प्रदेश आढळतो.

जंगलांचा उपयोगः-

चीड, देवदार, स्प्रुस, फर सारख्या मऊ लाकडांचे वृक्ष फर्निचर रेल्वे स्लिपर्स, कागद, घर बांधणीसाठी वापरतात.
साग व साल यासारख्या कठीण वृक्षांचा वापर इमारतीसाठी करतात.
पलाश, कुसुम यासारख्या वृक्षांवरील किडा लाख स्त्रवतो. याचा उपयोग विद्युत यंत्रत्रात केला जातो.
खैर या वृक्षापासून कात काढला जातो.
रोशा (धुळे) गवतापासून औषधी पदार्थ, उसुगंधी द्रव्ये, साबण, जख्मा, चर्मोरोग व सांधेदुखीसाठी उपयुक्त तेल काढतात, तर सबई गवतापासून कागद तयार करतात.
पाईन वृक्षापासून राळ व टर्पेंटाईन तयार करतात.
निलगिरिच्या स्त्रावापासून टॅनिन व डिंक तयार करतात. तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्ये, औषधे, साबण, सिनिओल हे रोगप्रतिबंधक व वेदनाशमक औषध बनविण्यासाठी वापरतात.
बिंवापासून शाई, औषधी फळ, ज्वलनाचे तेल बनविण्यासाठी वापरतात.
तुळस व अष्टगंधा रक्तदाबावर उपयुक्त आहे.
विविध उपयोगी चंदन वृक्ष कर्नाटक राज्यात आढळते.
भारतातील आगपेट्यांचे कारखाने – धुबरी, आसाम, बरेली (उत्तर प्रदेश), दक्षिणेश्वर (पं. बंगाल) अंबरनाथ (महाराष्ट्र), शिमोगा (कर्नाटक)
मुंबई प्रांतासाठी पुण्यात पहिल्या वनाधिका-याचे कार्यालय सुरु – गिस्बन (१८४७)
डेहराडून वान विद्यालयाची स्थापाना – १८७८
मध्यवर्ती वनसंशोधन संस्थेची स्थापना – डेहराडून (१९०६)
भारतीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना - भोपाळ (१९८२)
राष्ट्रीय वनस्पती संरक्षण प्रशिक्षण संस्था - हैद्राबाद
निलगिरीच्या झाडापासून कागद निर्मिती संशोधन - डेहाराडून
महाराष्ट्राचे रंगलाबाबतचे दिद्यालय – अकोला
भारताचा वन विषयक महिला कायदा अस्तित्वात आला – १८६५
वन्यजीव संरक्षणाचा पहिला कायदा - १८८७
पहिले राष्ट्रीय वन धोरण – १८९२
भारतीय जंगलाची वर्गवारी करणारा कायदा – भारतीय वन (अधिनियम १९२७)
वनिकरणाची सर्वप्रथम आवश्यकता व्यक्त केली – रॉयल कमिशन फॉर ऑग्रिकल्चर (१९२८)
स्वातंत्रोत्तर काळातील पहिली वन नीती – १९५२
स्वातंत्रोत्तर काळातील दुसरी वन नीती - १९७६
सध्याचे नवे वन धोरण – १९८८
भारतात वन महोत्सवात सुरुवात झाली - के.एम.मुन्शी. (१९५२)
वन्यजीव संरक्षणाचा अधिनियम व अंमलबजावणी - १९७२-७३
राष्ट्रीय कृषी आयोगाने केलेली सामाजिक वनीकरणाची शिफारस लागू – २ ऑक्टोंबर १९८२
भारतीय वन संवर्धन कायदा - १९८०
जागतिक वन दिन साजरा करतात – २१ मार्च
वन्यजीव सप्ताह पाळ्ला जातो – १९७२ पासून १ ऑक्टों. ते ७ ऑक्टों.

प्राणी संपत्ती

प्राणी संपत्ती

प्राणी संपत्ती

भारतात सापडणा-या प्राण्यांच्या जाती – ८१,०००
भारतात सापडणा-या माशांच्या जाती - २५००
भारतात सापडणा-या पक्ष्यांच्या जाती – १२००
भारताचा राष्ट्रीय पक्षी – मोर
भारताचा राष्ट्रीय प्राणी – वाघ
भारताचे राष्ट्रीय फळ - आंबा
भारताचा राष्ट्रीय वृक्ष – बनायान ट्री
भारताचा राष्ट्रीय विरासत प्राणी – हत्ती
भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी – गंगा डॉल्फिन
भारताचा राष्ट्रीय फुल – कमळ
राजस्थान व माळवा प्रांतातून विलुप्त झालेला पक्षी – सोहन (ग्रेट इंडियन बस्टर्ड)
भारतातील जैवविविधतेला सुरक्षित ठेवण्यासाठी स्थापन झालेले पहिले जैव आरक्षित क्षेत्र – निलगिरी (कर्नाटक, केरळ, तामिळणाडू) १९८६ (५५०० चौ.कि.मी.)
इतर क्षेत्र - नंदादेवी (१९८८), नोक्रेक (मेघालय), ग्रेट निकोबार, मन्नारची खाडी (तामिळनाडू), मानस (आसाम), सुंदरबन, सिमलिपाल (ओरिसा), दिब्रू-सैखोवा, देहंग-देबंग, पंचमढी, कांचनगंगा, आगस्त मलई, आचाकमार-अमरकंटक असे एकूण १४ क्षेत्र आहेत.
टायगर प्रोजेक्टची सुरुवात – १९७३, वाघांची गणना – दर ४ वर्षांनी होते.
देशात वाघांसाठी आरक्षित क्षेत्र - ३९+८ नविन असे एकूण ३७ क्षेत्रे आहेत.
भारतातील सर्वात लहान व पहिला आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प – पेंच (नागपूर)
वाघांचे सर्वांत मोठे अभायारण्य - नागार्जुनसागर श्रीकौल्यम (आंध्र प्रदेश)
२००६ चा व्याघ्र गणनेत १४११ असणारी वाघांची संख्या २०१० च्या व्याघ्र गणनेत १२% ने वाढून झाली – १७०६
भारतात १०१ राष्ट्रीय उद्याने व ५१५ वन्यप्राणी अभयारण्ये आहेत. वन्यप्राणी अभयारण्ये नष्ट होणा-या प्रांण्यांच्या जातींना संरक्षण देण्यासाठी, तर राष्ट्रीय उद्याने नैसर्गिक टिकवून ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत.
भारताचे पहिले सागरी राष्ट्रीय उद्यान - कच्छच्या आखातात.
वन्य जीव संरक्षण अधिनियम तयार केला – १९७२
भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान – कार्बेट नॅशनल पार्क
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था – कोलकाता (१९१६)
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था – कोलकाता (१९८०)
डॉ. सलिम अली. पक्षी आणि नैसर्गिक इतिहास केंद्र – कोईमतूर
प्रोजेक्ट क्रोकोडाईल सुरु - १९७४

प्राणी आढळ प्राणी आढळ
हत्ती आसाम, केरळ, कर्नाटक उंट वाळवंट (राजस्थान)
जंगली गाढव कच्छचे रण एकशिंगी गेंडा आसाम व प. बंगाल
सिंह गिरचे जंगल (गुजरात ) वाघ सुंदरबन ( प.बंगाल )
चित्ता हिमालय सकिन (जंगली बकरी) हिमालय
पांडा व हिमचित्ते उंच हिमालयीन प्रदेश पांढरे वाघ बाघेलखंड ( म. प्रदेश)
मोर जम्मू काश्मिर, आसाम —– ——
राष्ट्रीय उद्यान/ अभयारण्ये कशासाठी राखीव ठिकाण व राज्य
एरबिकुलम राजमलय राष्ट्रीय उद्यान —– इदुक्की (केरळ)
बन्नरघट्टा राष्ट्रीय उद्यान हत्ती बंगळूर (कर्नाटक)
बांधवगड राष्ट्रीय उद्यान —– शहादोल ( म.प्रदेश)
बोरीवली राष्ट्रीय उद्यान —– मुंबई उपनगर ( महाराष्ट्र )
कर्बेट नॅशनल पार्क वाघ नैनिताल ( उत्तराखंड )
कान्हा (कृष्णा) नॅशनल पार्क वाघ मांडला ( म.प्रदेश )
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान गेंडे जोरहट (आसाम)
खांगचेंद झोंगा राष्ट्रीय उद्यान —– गंगटोक ( सिक्कीम )
गुगामल ( मेळघाट ) वाघ अमरावती ( महाराष्ट्र )
गिंडी राष्ट्रीय उद्यान —– चेन्नई ( तामिळनाडू )
दुधवा राष्ट्रीय उद्यान वाघ लखिमपूर ( उत्तराखंड )
नवेगांव राष्ट्रीय उद्यान वाघ गोंदिया ( महाराष्ट्र )
नागरहोल राष्ट्रीय उद्यान —– कुर्ग ( कर्नाटक )
पेंच राष्ट्रीय उद्यान —– नागपूर ( महाराष्ट्र ०
पुष्पावती राष्ट्रीय उद्यान —– चमोली घढवाल ( उत्तराखंड )
पन्ना राष्ट्रीय उद्यान —– पन्ना ( म. प्रदेश )
भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्षी भरतपूर ( राजस्थान )
ताडोबा राष्ट्रीय उद्यान —– चंद्रपूर ( महाराष्ट्र )
हजारीबाग राष्ट्रीय उद्यान —– हजारीबाग ( झारखंड )
शिवपुरी राष्ट्रीय उद्यान —– शिवपूरी ( म. प्रदेश )
रोहिया राष्ट्रीय उद्यान —– कुलू ( हि. प्रदेश )
वाल्वादार राष्ट्रीय उद्यान लांडगे भावनगर ( गुजरात )
सातपुडा राष्ट्रीय उद्यान —– होशिंगाबाद ( म. प्रदेश )
डेझर्ट राष्ट्रीय उद्यान —– थरचे वाळवंट ( राजस्थान )
पेरियार अभयारण्य हत्ती इदुक्की ( केरळ )
गीर अभयारण्य ( सर्वांत मोठे ) सिंह जुनागड ( गुजरात )
राधानगरी अभयारण्य गवे कोल्हापूर ( महाराष्ट्र )
देउळगाव रेहेकुरी अभयारण्य काळवीट अहमदनगर ( महाराष्ट्र )
इटांगकी अभयारण्य हत्ती कोहीमा ( नागालैंड )
गौतमबुध्द अभयारण्य वाघ गया ( बिहार )
दांडोली अभयारण्य वाघ धारवाड ( कर्नाटक )
गांधीसागर अभयारण्य चितळ मंदसौदा ( म. प्रदेश )
सुंदरबन अभयारण्य वाघ चोविस परगना ( प. बंगाल )
इंद्रावती अभयारण्य वाघ छत्तीसगढ
दाचिगम अभयारण्य हंगूल हरीण श्रीनगर ( जम्मू काश्मिर ०
दालमा अभयारण्य वाघ सिंघभूम ( झारखंड )
भद्रा अभयारण्य हत्ती चिकमंगळूर ( कर्नाटक )
नलसरोवर पक्षी अभयारण्य पक्षी अहमदाबाद ( गुजरात )
मेलपट्टू पक्षी अभयारण्य पक्षी नेल्लोर ( आं. प्रदेश )
पुलीकत पाण पक्षी अभयारण्य —– पुलीकत ( आं. प्रदेश )
रंगनभिट्टू पक्षी अभयारण्य —– म्हैसुर ( कर्नाटक )
घाना पक्षी अभयारण्य सैबेरियन सारस भरतपूर ( राजस्थान )
सुलतान लेक पक्षी अभयारण्य —– गुरगाव ( हरियाणा )
घटप्रभा पक्षी अभयारण्य —– बेळगाव ( कर्नाटक )
बैदंतगल पक्षी अभयारण्य —– चींगलपेट ( तामिळनाडू )
नालापाट्टी पक्षी अभयारण्य —– नेल्लोर ( आ. प्रदेश )
चंद्रप्रभा अभयारण्य गिरचा सिंह उत्तरप्रदेश
आंचकमार अभयारण्य वाघ बिलासपूर ( छत्त्तीसगढ )
भीमबंध अभयारण्य वाघ मोघीर ( बिहार )
दामपा अभयारण्य वाघ ऎजवाल ( सिक्कीम )

अभयारण्ये स्थळ व राज्ये
तुंगभद्रा बेल्लारी ( कर्नाटक )
किन्नेरसानी ख्माम ( आं. प्रदेश )
कावल आदिलाबाद ( आं. प्रदेश )
जालपाडा जलपैगुडी ( प.बंगाल )
रणथंबोर सवाई माधवपुर ( राजस्थान )
श्रीशैलेशम आं. प्रदेश
सोनलरुपा तेजपूर ( आसाम )
वायनाड कन्नानोर व कोझाईकोड ( केरळ )
नाकोंडम अंदमान निकोबार
डाम्प ऎंजेल ( मिझोराम )
भैरमगड बस्तर ( छत्त्तीसगढ )
नरसिंहगढ राजगढ ( म. प्रदेश )
पंचमढी होशिंगाबाद ( म. प्रदेश )
पारवाल वारंगळ ( आं. प्रदेश )
मुकांबिका कर्नाटक
तडवाई वारंगळ ( आं. प्रदेश )
शिकारदेवी मंडी ( हि. प्रदेश )
मदुमलाई निलगिरी ( तामिळनाडू )
मानस बारपेटा ( आसाम )
सिमलीपाल मयुरगंज ( ओरिसा )
शरावती खोरे शिमोगा ( कर्नाटक )
तानसा ठाणे ( महाराष्ट्र )
बंदिपूर कर्नाटक व तामिळनाडू
रास आयलंड अंदमान निकोबार
दंडेली धारवड ( कर्नाटक )
रातापानी रायसे ( म. प्रदेश )
परांबिकुलम पालघाट ( केरळ )
सरिसका अलवर ( राजस्थान )
कुंभलगड राजस्थान
शांतीघाट केरळ

मृदा

वनस्पती उगवण्यासाठी व वाढीसाठी आवश्यक असणारा भूपृष्ठाचा सर्वांत वरचा थर म्हणजे मृदा होय. यातूनच वनस्पतीस खनिजे व अन्नद्रव्ये मिळतात. भारतीय कृषी संशोधन संस्थेचे मृदेचे मुख्य ८ व उपमुख्य २७ प्रकार केले आहेत. यापैकी काही प्रकार पुढीलप्रमाणेः-

१) गाळाची मृदाः- देशातील ४०% भाग या मृदेचा आहे. ही मैदानी व त्रिभूज प्रदेशात आढळते. हि मृदा सर्वाधिक सुपीक असते, यात पोटॅश, चुना, फॉस्फॅरिक आम्ल विपुल प्रमाणात असते. प्रचीन गाळाच्या मृदेस भांगर, नवीन गाळाच्या मृदेस खादर तर प्राचीन भरड व दगड्गोटेयुक्त मृदेस कंकर म्हणतात. या मृदेत नायट्रोजन व जैविक घटाकांची असते. शुष्क प्रदेशात यात क्षार जास्त आढळतात.

२) वाळवंटी मृदाः - यात रेतीचे प्रमाण जास्त व ह्यूमस कमी असते. राजस्थान नैऋत्य पंजाब व नैऋत्य हरियाणात आढळते.

३) काळी (रेंगूर) मृदाः - टिटेनिफेरस मॅग्नेफेरसमुळे या मृदेस काळा रंग प्राप्त झाला आहे. ही मृदा कापसासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हिचे स्थानिक नाव रेंगूर असून ती प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागात आढळते. हिची निर्मिती बेसॉल्ट ह्या खडकापासून झाली आहे. हिची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जस्त असते. यात कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशियम कर्बोनेट, पोटॅश व चूना ही प्रमुख पोषक असतात. परंतु फॉस्फरसची कमतरता असते. हिला उन्हाळ्यात भेगा पडतात. त्यामुळे हवेचे मिश्रण होऊन आपोआप मशागत होते. ही माती ओली असताना मशागत करणे कठीण असते. या मृदेला नॅशनल ऍटलास मध्ये मंडालीय मृदा म्हणतात.

४) लाल मृदाः - ही मृदा काळ्या मृदेच्या विभागाच्या भोवती आढळते. लोहाच्या आधिक्यामुळे लाल रंग प्राप्त होतो. यात फॉस्फरस, सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजनची कमतरता असते. तर लोह, कॅल्शिअम व अँल्युमिनिअमचे प्रमाण जास्त असते. छोटा नागपूरचे पठार, छ्त्त्तीसगढ, तेलंगना, निलगिरी, तामिळनाडूचे पठार व महाराष्ट्रात कोकणात आढळते. ज्या मृदेचे कण मोठे असतात ती नापीक तर ज्या मृदेचे कण लहाण असतात ती मृदा सुपीक असते. हिला लोम प्रकारची मृदा म्हणतात. या मृदेतील बाजरी हे प्रमुख पीक घेतले जाते.

५) लॅटेराईट मृदाः - उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात मातीचा पोषक तत्त्त्वांचा थर वाहून गेल्यामुळे ही मृदा तयार होते. यात ह्युमसचे प्रमाण कमी असते. त्यामूळे कमी सुपीक असते. मेघालय, पश्चिम किनारपट्टी तसेच तामिळनाडू, ओरिसा व छोटा नागपूरच्या काही भागात आढळते. यात लोह व अँल्युमिनिअम जास्त तर चूना नायट्रोजन, पोटॅश व फॉस्फरस कमी अढळते. उंच भागातील लालमृदा जास्त आम्लयुक्त असतात.

६) पर्वतीय मृदाः- हि मृदा प्रामुख्याने हिमालयीन क्षेत्रात आढळते. हि मृदा अपरिपक्व मृदा म्हणून ओळखली जाते. ही मृदा चहाच्या मळ्यांसाठी उपयुक्त आहे. यातील करड्या रंगाची पॉटझॉल मृदा आम्लधर्मी असते. तसेच तांबूस तपकिरी वनमृदा व अल्पाईन मृदा हे तिचे उप प्रकार आहेत.

मृदा धूप

पाऊस, चराई, चुकीची मशागत, पाण्याचा अति वापर यामुळे मृदा नापीक बनत आहे. सध्या ९० लाख हे. गाळाची मृदा व ७० लाख हे. काळी मृदा आम्लीयता व क्षारतेने ग्रस्त आहे.
मुसळधार पाऊसामुळे हिमालय, पश्चिम घाट अशा पर्वतीय भागातून मातीचा वरचा थर वाहून जातो. ती धुप - भूपृष्ठ धूप
पावासामुळे वनस्पती नसलेल्या भागात खोल ओहोळ तयार होतो. (यमुना व चंचळ खोरे) – घळई धूप
मृदेची होणारी धूप थांबविणे - मृदा संवर्धन
भारत सरकारने यासाठी केंद्रिय भूमी संरक्षण बोर्डची स्थापना केली – १९५३

कृषी

कृषी

कृषी

भारतातील स्थलांतरीत शेती स्थानिक – झुम (आसाम, इशान्य भारत), कुमरी (प. घाट, द. भारत), डाहया बेवर (म. प्रदेश), खिल (हिमालय), पोनाम, पोडू, माशा.
कृषीचे हंगाम – खरीप (पावसाळी) व रब्बी (हिवाळी)

जलसिंचन

जलसिंचन

जलसिंचन

जगातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली असणारा देश - भारत (९.४७ को हे.)
भारतात विहिरी व कूपनलिकेद्वारे होणारे जलसिंचन – ५३.९६%
विहिरी व कूपनलिकेद्वारे गुजरात मध्ये सर्वाधिक ८०% जलसिंचन होते. यानंतर राजस्थानचा क्रम लागतो - ६३%
कालव्यांमुळे राज्याचा एकुण सिचीत क्षेत्रांपैकी सर्वाधिक – जम्मू काश्मिर (९४%)
भारतात तलाव सिंचनाखाली क्षेत्र - ६.१३%
भारतातील सर्वात प्राचीन धरण कावेरी नदीवर – कालानाई (तामिळणाडू २ रे शतक)
तलावांमुळे सिंचीत क्षेत्र एकूण सिंचनाच्या ३४% असणारे राज्य – तामिळनाडू, आंध्रप्रदेश (२६%)

बहूउद्देशीय नदी योजना -

१) दामोदर खोरे योजना – स्वतंत्र भारताची ही पहिली योजना आहे. ही अमेरिकेतील टेनेसी व्हॅली प्रोजेक्ट वर आधारीत आहे. ही योजना १९४८ मध्ये सुरु झाली. या योजनेचे पूरनियंत्रण, विद्युत निर्मिती, जलसिंचन, मृदाधूप नियंत्रण इ. उद्देश होतो. या अंतर्गत दामोदर नदीच्या उपनद्यांवर तालैया, कोनार, मैथान व पांचेत ही धरणे जलविद्युत निर्मितीसाठी बांधली. तर बोकोरो, दुर्गापूर, व चंद्रपूर येथे औष्णिक विद्युत प्रकल्प सुरु होते. दुर्गापूरच्या धरणातून २५०० कि.मी. चा कालवा काढून वाहतुक सिंचनासाठी वापरतात.

२) भाक्रा नानगल योजना – हा पंजाब, हरियाणा व राजस्थानचा संयुक्त प्रकल्प आहे. या अंतर्गत हिमाचल प्रदेशात भाक्रा येथे सतलज नदीवर २२६ मी. उंचीचे व ५१८ मी. लांबीचे भारताती सर्वांत उंच धरण आहे. याच्या जलाशयास गोविंद सागर जलाशय म्हणतात. या धरणापासून ११०० कि.मी. लांबीचे कलवे व ३४०० कि.मि. लांबीच्या वितरीका काढून १४ लाख हेक्टर क्षेत्र सिंचित केले अहे. पंजाब मधील नांगल येथे दुसरे धरण बांधून १२०४ मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्प उभारला गेला आहे.

३) राजस्थानचा कालवा – यानुसार बियास व रावी नदीचे पाणी स्सतलज नदीत सोडले आहे. बियास नदीवर पोंग येथे धरण बांधले आहे. सतलज व बियास नद्यांच्या संगमावर हरिके येथे धरण बांधून राजस्थान कालवा काढला आहे. यामुळे पंजाबचा काही भाग व राजस्थानचा वाळवंटी भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. याच्या मुख्य कालव्याला इंदिरा गांधी कालवा या नावाने ओळखतात. या कालव्याची लांबी ४६८ कि.मी. असून हा जगातील सर्वांत लांब कलव्यांपैकी एक आहे.

४) कोसी योजना – बिहारचे अश्रु असणा-या कोसी नदीवर पूर नियंत्रणाच्या उद्देशाने उभारलेला बिहार व नेपाळ सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे. या अंतर्गत नेपाळमध्ये हनुमान नगर येथे धरण बांधले आहे.

५) हिराकुड योजना – ओरिसा राज्यात संबळपूर जवळ १९४८ मध्ये महानदीवर हा प्रकल्प उभारलेला आहे. या अंतर्गत ४८०० मी. लांब व ६१ मी. उंचीचे धरण बांधले असून दोन्ही बाजूस मिळून २१ कि.मी. संरक्षक भिंती बांधल्या आहेत. हे भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण आहे.

६) नगार्जुन योजना – आ. प्रदेशात कृष्णा नदीवर हैद्राबादपासून १४४ कि.मी. वर नंदिकोना येथे धरण बाधले आहे. या ठिकाणी प्रचीन मंदिरे होती. ती स्थालांतरित केली होती.

७) चंबळ योजना - ही राजस्थान व मध्यप्रदेश सरकारची संयुक्त योजना आहे. या अंतर्गत मध्यप्रदेश मध्ये गांधी सागर, राजस्थानमध्ये कोटाजवळ धरण व रावताभाटा येथे राणाप्रताप सागर हे कोटापासून २१ कि.मी. वर धरणे उभारली आहेत.

८) फराक्का योजना - या योजने अंतर्गत पश्चिम बंगालमध्ये गंगा नदीवर फराक्का व भागिरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहे. हुगळीचा प्रवाह कायम ठेवून कोलकाता बंदर कायम ठेवण हा या योजनेचा उद्देश आहे.

९) नर्मदा प्रकल्प – या प्रकल्पातील ३००० लहान मोठी धरणे बांधण्यात येणार आहे. मध्यप्रदेशात इंदिरा सागर (नर्मदा धरण) हे निमार जिल्ह्यात व गुजरात राज्यात सरदार सरोवर हे धरण बांधले आहे.

१०) तिहारी प्रकल्प - उत्तराखंडमध्ये भारत सरकार व उत्तराखंड यांच्या सहकार्याने भागिरथी नदी व मिलनगंगा नदीवर तिहारी जिल्ह्यात हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात रशियाने सहाय्य केले आहे. याचा जलाशय रामतिर्थ सागर म्हणून ओळखतात. तिहारी पासून २२ कि.मी. वर कोटेश्वर धरण आहे.

११) जायकवाडी प्रकल्प – जपानच्या सहकार्याने पैठण जवळ गोदावरी नदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. (१९६५) यातून वीज निर्मिती केल्यानंतर पाणी पुन्हा धरणात सोडले जाते. अशी ही देशातील एकमेव योजना आहे.

१२) पेरियार प्रकल्प – केरळमध्ये पेरियार या पश्चिम वाहिनी नदीवर धरण बांधून पुर्वेकडे वाहणा-या वैगई नदीत पाणी सोडले आहे. या प्रकल्पामुळे तामिळणाडूच्या मदुराई व केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यांना लाभा झाला आहे.

१३) सायलेंट व्हॅली प्रोजेक्ट - पर्यावरणास घातक असल्यामुळे रद्द (केरळ)

१४) नद्या जोडण्याचा प्रकल्प – डॉ. के.एल. राव यांनी १९७२ मध्ये गंगा कावेरी या नद्यांच्या कालव्याने जोडण्याची कल्पना मांडली. १९७७ मध्ये के. दस्तुर यांनी अशाओ प्रकारची योजना माडली. सध्या हिमालयातील १४ व पठारावरील १६ नद्या जोडण्यासाठी सुरेश प्रभु यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट नेमण्यात आला होता. न्यायालयाने ही योजना २०१६ पर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. यास५, ६०, ००० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

१५) रिहांद धरणाच्या जलाशायास नाव आहे – गोविंद वल्लभपंत सागर.
प्रकल्प धरण, नदी व स्थळ सहयोगी राज्य मुख्य उद्देश
श्री शैलेशम् कृष्णा नदी आंध्रप्रदेश वीज
नागार्जुन सागर कृष्णा नदीवर नंदिकोना येथे आंध्रप्रदेश सिंचन
तुंगभद्रा तुंगभद्रा नदिवर मल्लारपुरम येथे आंध्रप्रदेश व कर्नाटक सिंचन
मुचकुंद मुचकुंद नदीवर जलपुत येथे आंध्रप्रदेश व कर्नाटक वीज
पोचमपाड पोचमपाड नदीवर (गोदावरी) आंध्रप्रदेश जलसिंचन
कृष्णराज सागर कावेरी नदीवर कर्नाटक जलसिचन
घटप्रभा घटप्रभा नदीवर बेळगाव व निजामपुर कर्नाटक
अप्पर कृष्णा कृष्णा – नारायणपुर व अलमाती कर्नाटक
भद्रा भद्रा नदीवर कर्नाटक बहुउद्देशीय
शरावती शरावती नदिवर निंगनमक्की येथे कर्नाटक व गोवा सिंचन
मैचूर कावेरीवर कर्नाटक व तामिळनाडू
पैकारा पैकारा नदीवर कर्नाटक, केरळ व तामिळनाडू
उकाई तापी नदिवर गुजरात बहुउद्देशीय
साबरमती घरी (मेहेसाना) वासना (अहमदाबाद) गुजरात सिंचन
पनाम पनाम नदिवर केलडेझार (पंचमहल) गुजरात सिंचन
करजन पनाम जितगड ( जिल्हा भडोच येथे) गुजरात सिंचन
काक्रापारा तापी नदीवर केल्डेझार (पंचमहल) गुजरात
मही वनाकबोरी व कडाणा धरणे गुजरात
इदुक्की इदुक्की नदीवर केरळ
पेरियार पेरियार नदीवर केरळ व तामिळनाडू
बार्गी जबलपूर जिल्ह्यात बार्गीनदीवर म. प्रदेश बहुउद्देशीय
तवा तवा नदीवर होशिंगाबाद येथे म. प्रदेश
मातातिला बेतवा नदिवर झाशीजवळ (यूपी) म. प्रदेश व यूपी
नर्मदा नर्मदा म. प्रदेश
सुवर्णरेखा सुवर्णरेखा नदीवर दोन धरणे ओरिसा व बिहार जलविद्युत
मयुराक्षी गंगा बिहार व प. बंगाल जलविद्युत व सिंचन
गंडक भारत व नेपाळ जल व वीज
कोसी कोसी नदिवर बिहार व नेपाळ बहुउद्देशीय
महानदी महानदीवर रवीशंकर सागर म. प्रदेश
नाथ्प्पा झाकरी सतलज नदीवर हि. प्रदेश सिंचन व जलविद्युत
बियास बियास नदीवर पोम्ग येथे धरण व बियास – सतलज जोड कालवा पंजाब – हरियाण – राजस्थान
मही बजाज सागर मही नदीवर बरखेरा येथे राजस्थान
वानसागर सोन नदी उ. प्रदेश, बिहार, म. प्रदेश
रिहांद रिहांद नदीवर मिर्झापूर जिल्ह्यात पिंपरी उ. प्रदेश
राजघाट बेतवा नदीवर म. प्रदेश व उ. प्रदेश
केन छत्तरपूर व पन्ना जिल्हा म. प्रदेश व उ. प्रदेश बहुउद्देशीय
रामगंगा गढवाल जिल्ह्यात रामगंगा नदीवर उत्तरांचल सिंचन पूर नियंत्रण
उर्मिला उर्मिला नदीवर विरोबा येथे म. प्रदेश व उ. प्रदेश बहुउद्देशीय
कोयना सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर शिवाजी सागर धरण महाराष्ट्र वीज
कुकडी कुकडी नदीवर मणिकडोह, डिंभे, येडगांव, वडज व पिंपळगांव जोगा महाराष्ट्र
पूर्णा येलदरी (परभणी), सिध्देश्वर (हिंगोली) महाराष्ट्र
कृष्णा सातारा जिल्ह्यात, धोम, वारणा व कन्हेर येथे धरणे महाराष्ट्र सिंचन
भिमा पवना नदीवर महाराष्ट्र
कोलडम सतलज हि. प्रदेश
चुखा वम्ग चू भारत-भूतान जलविद्युत
हिडकल घट्प्रभा कर्नाटक
दलहस्ती चिनाब (जम्मू काश्मिर) जलविद्युत
तुलबुल योजना झेलम (जम्मू काश्मिर) जलविद्युत
निजामसागर मांजरा आं. प्रदेश
पापनाशम् ताम्रपर्णी तामिळणाडू

विविध राज्ये व जलविद्युत प्रकल्प

जलविद्युत प्रकल्प

जलविद्युत प्रकल्प
राज्ये प्रमुख जलविद्युत प्रकल्प
महाराष्ट्र खोपोली, भिरा, भिवपुरी, कोयना, वैतरणा
आंध्रप्रदेश नागार्जुनसागर, मुचकुंद, श्रीशैलशम, सिलेरु
कर्नाटक शरावती, काळी, शिवसमुद्र, जोग, भद्रावती
तामिळनाडू केत्तुर, पैकारा, कुंदा, पापनाशम
केरळ इदुक्की, साबगिरी, पेन्नीयार, सेलगुम, शोलयार
जम्मू काश्मिर दाल, दलहस्ती (चिनाब) बारामुल्ला, सिंधू खोरे
राजस्थान राणाप्रताप सागर, कोल (हि.प्रदेश)
हि. प्रदेश पार्वती, भाक्रा, मंडी
उ. प्रदेश मलेरी, यमुना, रामगंगा, रिहांद, शारदा
बिहार गंडक, कोसी, दामोदर
नागालॅंड दोयांग
आसाम बारपानी, कोपिली
ओरिसा हिराकुड, बाल्लीमेळा
गुजरात कदाना, उकाई
म. प्रदेश गांधी सागर

जलविद्युत निर्मितीची सर्वाधिक क्षमता असणारे नदी खोरे – ब्रम्हपुत्रा
भारतातील ८०% जलविद्युत निर्मिती होणारे क्षेत्र – पश्चिम घाट
भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प - १) दर्जिलींग – १९९८ २) शिव समुद्र – १९००

भारतातील अणु विद्युत प्रकल्प
प्रकल्प राज्य प्रकल्प राज्य प्रस्तावित प्रकल्प राज्य
तारापूर महाराष्ट्र राणाप्रताप सागर राजस्थान उमरेड (नागपूर) महाराष्ट्र
कैगा कर्नाटक —— (रावता भाटा) जैतपूर (रत्नागिरी) महाराष्ट्र
कल्पकम तमिळणाडू कुंडकुलम तामिळनाडू फतेहाबाद हरियाणा

भारतातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प
राज्य औष्णिक विद्युत प्रकल्प
उ. प्रदेश ध्रुवण, हरदुआगंज, पंकी, परिच्छा, ओबरा, दोरहीघाट, रेणुसागर, अरैया
प. बंगाल विरभूम, दुर्गापूर, कोलकाता, टिटाधर, बांदेल
म. प्रदेश सातपूडा, सिंग्रोली, भोपाळ, इंदोर
छ्त्तीसगड कोर्बा, अमरकंटक
तमिळनाडू एन्नूर, नैबेली, तुतिकोरीन
आं. प्रदेश विजयवाडा, रामगुंडम, कोथयागुंडम, नेल्लोर
बिहार बरौनी, चंद्रपूर
ओरिसा तालचेर, बालिमेला, कटक
हरियाणा पानिपत, बरापूर, फरिदाबाद
पंजाब भटींडा, रुपनगर
झारखंड बोकारो, सिंद्री, जमशेदपूर
मणिपूर लोकटक
कर्नाटक रायचुर
दिल्ली बरादपूर, राजघाट, इंद्र्प्रस्थ
काश्मिर कालाकोट

म्हत्वाच्या गॅस विद्युत योजना -

१) कैथलगुडी – आसा

२) आगर तळा – त्रिपुरा

३) कवास – गुजरात

४) गंधार – गुजरात

५) अरैय्या – उ. प्रदेश

६) अत्रा – राजस्थान

७) दादरी – उ. प्रदेश

८) मैथान – बिहार

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना - १९७५
भारताची स्थापित विद्युत उत्पादन क्षमता १, ६५, ००० मेगावॅट इतकी आहे. दरवर्षी ७ ते ८% ने वाढत आहे.
भारताचा विद्युत वापर सध्या दरडोई दरवर्षी ६१२ किलोवॅट इतका आहे.
भारतात आसणारे औष्णिक विभाग – पाच
भारत विद्युत निर्मितीचे - औष्णिक – ६८.३२%, जलविद्युत – २६.१२%, अणु विद्युत – ३.३४%, पवन विद्युत – ४%
केंद्र सरकारने वीज निर्मिती क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी पास केलेला नवा विद्युत अधिनियम – १० जून २००३

खनिजे व शक्तीसाधने

१) लोह - जागतिक लोह खनिजाच्या साठ्यांपैकी भारतात २५% साठे आहेत. सिंगभूम (झारखंड), केओझार, बोनाई, मयुरभंज, सुंदरगड (ओरिसा), दुर्ग (म. प्रदेश), बैलादिला (छत्तीसगड), बरद्वान व वीभूम (प. बंगाल), बाबा बुदान टेकड्या (कर्नाटक).

प्रमुख उत्पादक राज्य - १) छ्त्तीसगड २) गोवा ३) झारखंड
लोहाचे मॅग्नेटाईट प्रकारचे ७४% साठे कर्नाटकमध्ये आहे.
बस्तरच्या बैलादिला खाणींचा जपानच्या सहकार्याने विकास करुन लोहखनिज विशाखापट्टनम बंदरात आण्ते जाते व तेथून जपानला निर्यात करतात.
लोहखनिज नियात करणारी इतर बंदरे – मार्मागोवा, पराद्विप, कोलाकाता व मंगलोर इ.

२) मॅगनीज – याचा उपयोग पोलाद निर्मितीत करतात. म. प्रदेशामधील प्रमुख खाणी बालाघाट, झाबुआ, छिंदवाडा, मांडला (म. प्रदेश) सिंगभूम (झारखंड), केंदुझारगड, मयुरभंज, तालचेर व सुंदरगड (ओरिसा), नागपूर, भंडारा, गोंदिया (महाराष्ट्र) शिगोगा, चित्रदुर्ग, बेल्लारी (कर्नाटक) इ.

मॅगनीज उत्पादनात भारत जगात तिस-या क्रमांकावर आहे. भारतातील सर्वाधिक मॅगनीज उत्पादन करणारे राज्य हे ओरिसा आहे. प्रमुख उत्पादक राज्ये – १) ओरिसा २) महाराष्ट्र ३) म. प्रदेश

३) टंगस्टन – सिंगभूम (झारखंड), बाकुडा (प. बंगाल) नागपूर इ.

४) बॉक्साईट – बॉक्साईटच्या उत्पादनात भारत पाचव्या क्रमांकाचा देश आहे. यापासून अल्युमिनिअम हा धातू मिळतो. बॉक्साईट रांची, पालाम (झारखंड) जबलपूर, बालाघाट (म. प्रदेश), कोल्हापुर, व सिंधुदुर्ग (महाराष्ट्र), जामनगर व सुरत (गुजरात) इ ठिकाणी सापडते.

प्रमुख उत्पादक राज्ये - १) ओरिसा २) गुजरात ३) झारखंड ४) महाराष्ट्र
क्रोमाईटचे ९५% साठे एकट्या ओरिसा राज्यात आहेत. (२१३ दशलक्ष टन)
आधुनिक फ्रासिसी तंत्रज्ञानावर आधारीत आशियातील सर्वांत मोठा अल्युमिनिअम प्रकल्प – कोरापूत (ओरिसा)
भारत बॉक्साईड निर्यात करतो – जपान व युरोपियन देशांना

५) अभ्रक – अग्निजन्य व रुपांतरीत खडकात सापडते. भाततात जगाच्या ९०% अभ्रक उत्पादन केले जाते. याचा उपयोग विद्युतरोधक म्हणून करतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताच्या अभ्रकाचा ६०% अर्धासाठा झारखंड९हजारिबाग) बिहारच्या गया व मुंगेर जिल्ह्यात सापडतो. तसेच नेल्लोर (आंध्रप्रदेश) व भिलवाडा (राजस्थान) येथेही खाणी आहेत. निर्यातीत ब्राझिल हा भारताचा प्रतिस्पर्धी आहे. प्र्मुख उत्पादक राज्य – १) आं. प्रदेश २) झारखंड

६) तांबे – हा मानवाने शोधलेला पहिला धातू आहे. ताब्याचे उत्पादन राजस्थान राज्यात होते.

७) जिप्सम – याचा उपयोग खते, सिमेंट, कागद व निर्मितीसाठी करतात. राजस्थानमध्ये देशाच्या ९०% जिप्सम चे उत्पादन होते.

प्रमुख उत्पादक राज्ये – १) राजस्थान २) जम्मू काश्मिर ३) गुजरात

८) कोळसा - भारतातील ९८.५% कोळसा गोंडवाना क्षेत्रात सापडतो. भारतात पश्चिम बंगालमधील राणिगंज येथे १७७४ साली पहिली खाण खोदण्यात आली. कोळसा उत्पादनात भारत जगात चीन व अमेरिकेनंतर तिस-या क्रमांकावर लागतो. भारतात सर्वाधिक कोळसा झारखंड राज्यात सापडतो. तेथे बोकारो, गिरिध, करणपूर व झारिया या ठिकाणी तर म. प्रदेशात सिंगरौली, छिंदवाडा, पथरखेडा (बैतुल) व सोहागपूर (शाहदोल) येथे, छत्तीसगढ राज्यात कोर्बा, सरगुजा येथे, प्रदेशात सिंगोरानी येथे, महाराष्ट्रात वर्धा – पेंच – कन्हान नदी खो-यात कोळसा सापडतो. लिग्नाइटच्या सर्वाधिक खाणी तामिळणाडू राज्यात नेवेली क्षेत्रात आहेत.

कोळसा खाणीचे राष्ट्रीयीकरण – १९७२, कोळाशाचा सर्वांत शुध्द प्रकार – अं`न्थ्रासाईट
प्रमुख उत्पादक राज्ये – १) झारखंड २) ओरिसा ३) छत्तीसगढ

९) सोने - सोन्याच्या खाणी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात कोलार व हट्टी येथे आह्ते. कोलार ही जगातील सर्वांत खोल खाण आहे. तसेच रामगिरी, अनंतपुर जिल्हा (आंध्रप्रदेश) येथेही उत्पादन होते. भरत हा जगातील सर्वांत मोठा सोन्याचा उप्भोक्ता देश आहे.

१०) खनिज तेल व नैसर्गिक वायू – भारतात खनिजतेल दिग्बोई, नहरकाटीया, रुद्रसागर, नुनमती, लकवा, सुरमा नदी खोरे (आसास) खंबायत, अंकलेश्वर, ओलपाड, क्लोल, नवगाव (गुजरात), बॉम्बे हाय (मुंबई जवळ) इ. ठिकाणी मिळते. बॉम्बे हाय मुंबईच्या किना-यापासून ११५ कि.मी. वर आहे. जपानहून आलेल्या सागर सम्राट या प्लॅट्फार्मच्या सहाय्याने ८४२ विहिरीतून तेल व १०३ नैसर्गिक वायू शोधले जाते. याशिवाय वसई हाय येथेही तेलक्षेत्र आहे. तसेच गोदावरी कृष्णा कावेरीच्या त्रिभूज प्रदेशात खनिजतेलाचे साठे सापडले आहेत.

पाईपलाईनद्वारे लोणारी गॅस वाहतूक यात हाजीरा-बिजयपूर-जगदिश्पूर ही पाईपलाईन १८३० कि.मी. लांब आहे.
भारतात एकुण १४ तेल शुध्दीकरण केंद्र आहेत. ते प्रामुख्याने समुद्र किना-यावर आहेत. कारण आयात होणारे कच्चे तेल समुद्रामार्गे येथे. प्रमुख तेल व नैसर्गिक वायू उत्पादक राज्ये – १) महाराष्ट्र २) गुजरात ३) आसाम
Oil and Natural Gas Commissioin (ONGC) ची स्थापना – १९६५
भारताती पहिला तेल शुध्दीकरण कारखाना – दिग्बोई (आसाम), ८ ऑक्टोंबर, १९८९
समुद्र किना-यावर असणारे शुध्दीकरण प्रकल्प – ट्रॉम्बे (महाराष्ट्र), मंगलोर (कर्नाटक), कोची (केरळ), चेन्नई (तामिळनाडू), विशाखापट्टनम (आंध्रप्रदेश) हल्दिया (प. बंगाल) इ.
अंतर्गत भागातील तेल शुध्दीकरण केंद्र – दिग्बोई, बोंगाईगाव व गुवाहाटी (आसाम), मथुरा (उत्तर प्रदेश), कोयाली (गुजरात), बरौनी (बिहार), पानीपत (हरियाणा)
जगातील सर्वांत जुना तेल शुध्दीकरण प्रकल्प – दिग्बोई
नैसर्गिक वायूचा भारतातील सर्वाधिक साठा – बॉम्बे हाय
भारतात चेरालाईट व जिरकोनियम या किरणोस्तारी खनिजांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.
भारतातील मिठागरे – मिठापूर, जामगर, धारासना, बलसाड (गुजरात), उरण, भाईंदर, भांडूप (महाराष्ट्र)
अपारंपारिक उर्जा स्त्रोत – यात पवन उर्जा, भारती आहोटीचे उर्जा, भूऔष्णिक उर्जा, गोबरगॅस इ. उर्जाचा समावेश होतो.
पवन उर्जेमार्फत वीज निर्मिती करणारे मोठे केंद्र – चाळकेवाडी सातारा (महाराष्ट्र)
हिमाचल प्रदेशातील उष्ण पाण्याच्या झ-यांपासून उर्जा निर्मितीचा प्रयत्न – मणिकरण (५ कि.वॅट)
निर्धुर चुलीमुळे होणारी लाकडाची बचत - २० ते ३५%
नागरी टाकाऊ पदार्थांपासून वीजनिर्मिती केली जाते – तिमापूर (दिल्ली)
भारतातील सौरउर्जा केंद्रे - कल्याणपूर, माउ (उ. प्रदेश), जोधपूर (राजस्थान) इ.
जगातील सर्वांत मोठी सौर वाफ प्रणाली – माऊंट आबु (राजस्थान)
सागरी लाटांच्या उर्जा प्रकल्पाचे नियोजित ठिकाण – कच्छ्चे आखा्त
हिरा सर्वप्रथम भारतात काढला गेला व उपयोगात आणला त्यानंतर या देशाने काढला.
ऑईल अँन्ड नॅचरल गॅस कमिशनचे नविन तेल शुध्दीकरण प्रकल्प - १) मंगलोर २) काकीनाडा (आंध्रप्रदेश)३) बाडमेर- राजस्थान
सर्वाधिक क्षमतेची खाजगी क्षेत्रातील रिफायनरी – रिलायन्स पेट्रोलियम लि., जामनगर, गुजरात
सर्वाधिक क्षमतेची सरकारी क्षेत्रातील रिफायनरी - इंडियन ऑईल कार्पोरेशन

खनिज मुख्य उत्पादक खनिज मुख्य उत्पादक
मँगनीज ओरिसा अभ्रक झारखंड
तांबे मोसावनी कोळसा झारखंड
सोने कोलार हट्टी (कर्नाटक) सोने रामगिरी (आंध्रप्रदेश)
कोबाल्ट जिप्सम राजस्थान कायनाइट बिहार, महाराष्ट्र
सिलिमेनाइट मेघालय एल्मेनाइट केरळ
मँग्नोसाईट उत्त्राखंड मोनासाईट केरळ
युरेनियम जादूगोडा (सिंधभूम) टंगस्टन प. बंगाल, राजस्थान
थोरियम केरळ अँस्बेस्टॉस राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक
संगममरवर राजस्थान हिरे पन्ना, (म. प्रदेश), रायपूर
बराईट आ. प्रदेश, हि. प्रदेश ग्राफाईट ओरिसा, तामिळनाडू
चुनखडी म. प्रदेश क्रोमाईट ओरिस, कर्नाटक, झारखंड
कथिल म.प्रदेश, बिहार चांदी गुजरात, गोल्ड फिल्ड
मीठ मंडी (हि. प्रदेश) चुनखडी म. प्रदेश, महाराष्ट्र
ग्रॅनाईट कर्नाटक, आंध्रप्रदेश काळा दगड महाराष्ट्र
धारवाड दगड कर्नाटक लुकण आंध्रप्रदेश
बेरेलियम बिहार, म. प्रदेश डोलोमाईट ओरिसा, छत्तीसगढ
सल्फर हरियाणा, गुजरात चिनी माती केरळ, सिंघभूम
तांबडा दगड जोधपूर (राजस्थान) सिलीका उ. प्रदेश
शिसे राजस्थान, झारखंड टीन हजारीबाग (झारखंड)
थोरियम श्रावणकोर (केरळ) जस्त राजस्थान
प्लॅटिनम आसाम फॉस्फेट राजस्थान
अँटीमनी पंजाब व कर्नाटक बॉक्साईट झारखंड, छ्त्तीसगढ
फेलस्पार आ. प्रदेश, राजस्थान लोह छत्तीसगढ, गोवा

उद्योगधंदे

कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक विकासाच्या पातळीवर असते.औद्योगिकणात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.

१) सुती वस्त्रोद्योग – हा भारतातील सर्वांत मोठा उद्योग आहे. या उद्योगाने भारतात सर्वांधिक रोजगार कुत्पन्न केला आहे. (६.४ कोटी

कापड गिरण्यांची संख्या – गुजरात – ११२, महाराष्ट्र – १०४
भारतात स्थापन झालेली पहिली सुती कापड गिरणी – फोर्ट ग्लोस्टार (१८१८) कोलकाताजवळ
भारतातील पहिली वास्तविक (यशस्वी) कापड गिरणी – दि बॉम्बे स्पिनिंग अँण्ड विव्हिंग मिल – कावसजी दावर यांनी १९५४ मध्ये मुंबईत उघडली.
हातमागापासून भारतात होणारे कापड उत्पादन – ७३%
१९९९ मध्ये भारतातील कापड गिरण्यांची संख्या – १८२४
भारताचे मँचेस्टर किंवा बोस्टन म्हणून ओळखतात - अहमदाबाद (पहिली गिरणी १९६१) एकूण ६६ गिरण्या
वस्त्रांची राजधानी “Cotton Polis of India” - मुंबई ५४ गिरण्या
कापड उद्योगाचे स्थानिकीकरण होते - बाजारपेठेजवळ
भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य – तामिळनाडू

२) लोकर उद्योग -

भारतातील पहिला लोकर उद्योग (ब्रिटीश भांडवल) – लाल इमली (कानपूर १८६७)
दुसरा लोकर उद्योग – लुधियाना (पंजाब १९०२)
भारतातील सर्वाधिक लोकर गिरण्या असणारे राज्य – पंजाब
लोकर उद्योगाची इतर केंद्रे – मुंबई, बंगलोर, जामनगर, कानपूर, श्रीनगर, लुधियाना, अमृतसर

३) रेशीम उद्योग -

सर्वाधिक रेशीम उद्योग करणारे देश – चीन, भारत, रेशीम उद्योगाची सुरवात चीनमध्ये झाली.
भारतात सर्वाधिक रेशीम उत्पादन करणारे राज्य – कर्नाटक
रेशीम उत्पादनाची भारतातील प्रमुख केंद्रे – म्हैसुर, कांचीपुरम, वाराणसी, श्रीनगर, मुर्शिदाबाद, अमृतसर, आसाम
देशातील पहिला रेशीम उद्योग - हावडा (प. बंगाल १८३२)
भारतात जगाच्या १६% रेशम उत्पादन होते. त्यात मलबेरी ९१.७%, तसर – १.४% व मुगा – ०.५%

४) कृत्रिम वस्त्रोद्योग -

प्रमुख कृत्रिम धागे – रेयॉन, नॉयलॉन, टेरीन, डेकरोन
प्रमुख केंद्रे – मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, सुरत, कोलकाता
देशातील पहिला रेऑन प्रकल्प - केरळ (१९५०)

५) ज्यूट उद्योग -

भारतात स्थापन झालेली पहिली ज्यूट गिरणी – १८५९ साली कोलकाताजवळ हुगळी नदिकाठी रिसरा येथे
जागतिक ज्यूट निर्यातीत भारताचा क्रमांक -द्वितीय
सर्वाधिक ताग गिरण्या असणारे राज्य - प. बंगाल

६) साखर उद्योग -

आधुनिक पध्दतीचा पहिला साखर कारखाना – बिहार (१९०३), दुसरा – उ. प्रदेश
सर्वाधिक साखर कारखाने असणारे राज्य – महाराष्ट्र
सर्वाधिक सहकारी साखर कारखाने व साखर उत्पादन करणारे राज्य – महाराष्ट्र
साखर करखान्यांचे स्थनिकीकरण होते - कच्या मालाच्या क्षेत्रात
देशातील पहिला सहकारी साखर कारखाना – प्रवरानगर (१९४९) महाराष्ट्र

७) वनस्पती तेल -

तेलबिया व वनस्पती तेल यांच्या सर्वांत मोठा उत्पादक व उपभोक्ता देश – भारत
शेंगदाणा तेल उत्पादनात अग्रेसर राज्य - गुजरात
भारत खाद्यतेलाची आयात करतो – ऑस्ट्रेलियाकडून

८) कागद उद्योग -

भारतात पहिल्यांदा यंत्रावर कागद उत्पादन करण्यात आले - १८१२
भारतातील पहिला कागद कारखाना – सोहरानपूर (प.बंगाल), १८३२
भारतात १९९७ पर्यंत असणा-या कागद गिरण्या – ३८०
भारताला एकूण आयात करावा लागणारा कागद – १०%
वृत्तापत्राचा कागद निर्माण करणारा पहिला कारखाना - नेपानगर (म. प्रदेश) १९५५
वृत्तपत्र कागद निर्मितीत आघाडीवरचे रज्य – प.बंगाल, महाराष्ट्र
देशातील प्रमुख कागद उद्योग – टिटाघर, राणीगंज, दाल्मियानगर, आलमबाजार, चंद्रहरी, त्रिवेणी, शिवराफुली (प.बंगाल)
बल्लारपूर, मुंबई, चंद्रपूर, ओगलेवाडी, कल्याण, भिवंडी, कामठी, मुंढवा, इगतपूरी (निलगिरीपासून) (महाराष्ट्र), सोनगड, नवसारी, पोरबंदर (गुजरात), राजमहेंद्री, सिरर, तिरूपती (आंध्रप्रदेश), भद्रावती, दांडेली, रामनगर (कर्नाटक), शहडोल, नेपानगर, होशिंगाबाद, रतलाम (म. प्रदेश)
देशातील सर्वांत मोठी पेपर मिल - टिटाघर
चलनी नोटांचा कागद तयार करतात – होशिंगाबाद (म. प्रदेश)

९) आगपेटी -

आधुनिक आगपेट्यांचा उद्योग सुरु झाला - १८९५
१९२४ ला वेस्टर्न इंडिया मॅच कंपनीने कारखाने उघडले - बरेली, कोलकाता, चेन्नई व मुंबई येथे

प. बंगाल - चोविस परगणा, दक्षिणेश्वर, अलीपूर, मुर्शिदाबाद

तामिळनाडू - रामनाथपुरम, सालेम, तिरुनेलवेली व चेन्नई

महाराष्ट्र - अंबरनाथ, पुणे, मुंबई, नागपूर, चंद्रपुर

कर्नाटक - शिमोगा, बेल्लारी, बंगलोर

इतर - धुबरी (आसाम) बरेली, मेरठ (उ.प्रदेश), विजयवाडा (आंध्रप्रदेश)

१०) लोह पोलाद उद्योग -

लोह पोलाद उद्योगाचे स्थनिकीकरण होते – कच्च्या मालाच्या क्षेत्राजवळ
भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना – बेंगाल आयर्न वर्क्स – कुल्टी (प.बंगाल) १८७०
मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारा टाटांचा स्वदेशी कारखाना – साक्ची (जमशेदपूर) १९०७
भारतातील पहिला सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद उद्योग – भद्रावती (१९२३) (विश्वेश्वरैया आयर्न अँन्ड स्टील कंपनी)
लोहपोलाद उद्योगाचे केंद्रीकरण झाले आहे. – छोटा नागपूरचे पठारावर
टिस्को (जमशेदपूर-झारखंड) या कारखान्याशिवाय इतर सर्व कारखाने स्टील अँथॉरोटी ऑफ इंडियाच्या अखत्यारीत येतात.
दक्षिण भारतातील समुद्रकिना-यावरील पहिला कारखान्यात आयात व निर्यात सुलभ होते. – विशाखापट्ट्णम

प. बंगाल – आसनसोल, कुल्टी, बर्नपूर, दुर्गापूर

कर्नाटक – भद्रावती, विजयनगर, बेल्लारी

तामिळनाडू – सालेम

नियोजित - बैलादिला (छत्तीसगढ), सुरजगड (महाराष्ट्र)
कारखाना स्थापन राज्य सहकार्य वैशिष्ट्ये
रुरकेला १९५९ ओरिसा प. जर्मनी सुवर्णरेखा नदीकाठी
भिलाई १९५९ छत्तीसगढ रशिया —–
दुर्गापूर १९६२ प. बंगाल ब्रिटन —–
बोकारो १९६४ झारखंड रशिया सर्वाधिक उत्पादन

११) सिंमेंट उद्योग -

भारतातील सिमेंटचा पहिला कारखाना – चेन्नई (१९०४)
सर्वाधिक दिमेंटचे कारखाने आसणारे राज्य - झारखंड
भारतातील पहिला यशस्वी सिमेंट कारखाना – इंडियन सिमेंट कंपनी लि. पोरबंदर (१९१४)
असोसिएटेड सिमेंट कंपनीची (एसीसी) स्थापना - १९३४
प्रमुख सिमेंट उत्पादन केंद्र - दालमिया नगर, सिंद्री, बंजारी (झारखंड) कटनी, सतन, जबलपूर (म. प्रदेश), दुर्ग व मंधार (छत्तीसगढ) लखेरी, चित्तोडगड (राजस्थान), चंद्रपूर, राजुरा व कोल्हापूर (महाराष्ट्र)
नायट्रोजनयुक्त खते उत्पादनात भारत जगात ३ -या क्रमांकावर आहे.

उद्योग उत्पादन केंद्रे व वैशिष्ट्ये
अभियांत्रिकी १) हेवी इंजिनियरिंग – लोह पोलाद – रांची, झारखंड (१९५८), दुर्गापूर, विशाखापट्टनम, तिरुचिरापल्ली, नैनी, मुंबई, अहमदाबाद इ.

२)हिंदुस्थान मशिन्स व टूल्स- बंगलोर (टेलिफोन व घड्याळे), पिंजोर, श्रीनगर, हैद्राबाद, कालामसेरी (केरळ) इ.

३) कृषी मशिनरी - सिरमौर (हि. प्रदेश), पिंजोर (हरियाणा), प्रतापगड (उ. प्रदेश) इ.
रेल्वे १) डिझेल इंजिन – वाराणसी

२) विद्युत इंजिन – चित्तरंजन १९५०

३) मोटरगेजचे इंजिन – टेल्को (जमशेदपूर) १९५२

४) प्रवासी गाड्यांचे डबे – पेरांबूर (तामिळनाडू), बंगळूर (कर्नाटक), कपूरथळा (पंजाब) इ.

५) रेल्वे चाके व अँक्सल – बंगलोर, जमशेदपुर इ.

६) डिझेल इंजिन व सुटे भाग – कपुरथळा इ.

७) रेल्वे वर्कशॉप – मुंबई, बर्नपूर, गोरखपूर, झाशी, रतलाम, कोटा, अजमेर इ.
मोटार उद्योग १) तीनचाकी वाहन उत्पादनास भारत जगात – द्बितीय२) देशात मोटार गाड्यांच्या उत्पादनास सुरुवात - १९२६

३) प्रमुख केंद्र - मुंबई, कोलकाता, चेन्नई, गुरगाव इ.

४) मारुती उद्योगाचे केंद्र – गुरगाव (हरियाणा)

५) सेनेची वाहने – जबलपूर
चलनी नोटा १) नाशिक, देवास (म. प्रदेश), हैद्राबाद इ.

२) नवीन – म्हैसूर, साल्वोनी (प. बंगाल)
टांकसाळ

हस्तिदंत

सायकल

मोटार सायकल
मुंबई, हैद्राबाद, कोलकाता, नोएडा (उ. प्रदेश) इ.

केरळ, कर्नाटक, राजस्थान व उ. प्रदेश इ.

भारतातील पहिला कारखाना – कोलकाता, इतर – लुधियाना, मुंबई, पटना, सोनपत, दिल्ली, हैद्राबाद

फरिदाबाद, लखनौ, चेनई, सातारा, आकुर्डी, पिंपरी (पुणे), पनकी (कानपूर), ओधवा (अहमदाबाद)
विमाने निर्मिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स नो. – बंगलोरची स्थापना – बालचंद्र हिराचंद्र – एकूण १२ कारखाने – बंगलोर (५), कानपूर, नशिक, हैद्राबाद, लखनौ, कोरापुत, (ओरिसा) करवा, बराकपूर

- भारतीय जेट प्रशिक्षण विमान - किरण एम के – २
जहाज निर्मिती -सिंधीया स्टीम नेव्हीगेशन कंपनीने १९४१ मध्ये विशाखापट्टनमला हिंदुस्थान शिपवार्डची स्थापना केली. १९६२ ला सार्वजनिकीकरण केले.- कोचीन शिपयार्डच्या निर्मितीस सहाय्य – जपान

- सरकारी जहाज कारखाने – कोचीन, विशाखापट्टनम, मुंबई, कोलकाता इ.

- आगबोट दुरुस्ती - माझगांव डॉक (मुंबई)
रासायनिक द्रव्य मुंबई, अंबरनाथ, पनवेल (महाराष्ट्र), मिठापूर (गुजरात), धंग्रधा इ.
रासायनिक खत भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिला कारखाना – सिंद्री

(झारखंड) १९५१, नानगल व भाटींडा (पंजाब), गोरखपूर (उ. प्रदेश), अलवाये, उद्योगमंडल व कोची (केरळ) बरौनी (बिहार), नामरुप (आसाम), तुर्भे व थलवायशेत (महाराष्ट्र), पानिपत (हरियाणा), तालचेर व पराद्विप (ओरिसा) हाजिरा, कलोल, कांडला (गुजरात), काकीनाडा (आंध्रप्रदेश), दुर्गापूर, हल्दिया (प. बंगाल), चेन्नई इ.
डि.डि.टी. दिल्ली व अलवाये (केरळ)
रबर रबराचा पहिला कारखाना – डनलॉप – बाहिगंज (प. बंगाल) १९२०

इतर - मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई, दिल्ली इ.
वीज बल्बस म्हैसूर, कोलकाता, मुंबई इ.
हेवी इलेक्ट्रिकल भोपाळ ( म. प्रदेश), रामचंद्रपुरम व हैद्राबाद (आंध्रप्रदेश), हरिद्वार (उत्तराखंड), बंगळूर, त्रीची, रानीपेट, हैद्राबाद व जगदिशपूर इ.
फोटो फिल्म उधगमंडल (तामिळनाडू)
काच कारखाने तळेगाव दाभाडे (पुणे), ओगलेवाडी (सांगली), वडोदरा (गुजरात), सालेम, कोईमतूर (तामिळनाडू), फिरोजपूर (उ. प्रदेश), कोलकाता, राणीगंज (प. बंगाल)
रंग कोलकाता व मुंबई – पहिला कारखाना १९०२ कोलकात्याजवळ गोबरिया
शस्त्रक्रियेची उपकरणे गिंडी (चेन्नई – तामिळनाडू)
औषधे सिंथेटीक ड्रग – हैद्राबाद

पेनिसिलीन – पिंपरी (पुणे), हृषिकेश (उत्तराखंड)

इतर - मणिपूर, नागपूर, कानपुर, नखनौ, गुरगाव, मुझफफरपूर, जयपूर, मुंबई, दिल्ली इ.
पेट्रोकेमिकल मुंबई, वडोदरा (गुजरात) इ.
खेळ साहित्य पतियाळा व अमृतसर (पंजाब), मीरत, जालंध इ.
खेळणी सावंतवाडी (सिंधुदुर्ग), पेण (रायगड), रतलाम (म. प्रदेश), तिरुपती, निर्मल, कोडापल्ली (आंध्रप्रदेश) इ.
युध्दसामुग्री - अवजड वाहन (रणगाडा, शक्तीमान व सारथ ट्रक) – आवडी (तामिळनाडू) मेडक (आंध्रप्रदेश)

- दारुगोळा व लष्करी साहित्य – खडकी (पुणे), वाडी (नागपूर), जबलपूर (म. प्रदेश) इ.

- काडतुसे व बंदुका – कानपूर

दारुगोळा – वाडी (नागपूर), वरणगांव (भुसावळ), जवाहरनगर (भंडारा), भद्रावती, चंद्रपूर, गोमिया (बिहार)
कातडी वस्तू चेन्नई, कोईमतूर (तामिळनाडू) कानपुर व आग्रा (उ. प्रदेश), कोलकाता व भाटनागर (प. बंगाल), मुंबई
टेलिफोन केबल इंडस्ट्रिज – बंगळूर, केबल – रुपनारायनपूर (पं. बंगाल)
ट्रॅक्टर फरिदाबाद व पिंजोर (हरियाणा), दिल्ली, मुंबई व चेन्नई इ.
अँल्युमिनिअम मुबलक वीजेमुळे स्थनिकीकरण वीज क्षेत्राजवळ होते.

हिंदुस्थान अँल्युमिनिअम – रेणूकूट (उ. प्रदेश), कोरबा (छत्तीसगढ), कोरापुत, (ओरिसा) ठाणे, मेत्तूर, अलवाये (केरळ) इ.
यंत्रोद्योग - खाणकाम यंत्र - रांची, मुंबई, पुणे, बंगळूर, दिकंदराबाद, दुर्गापूर इ.

- घासण्याची व भोके पाडण्याची यंत्रे – प्रागा टुल्स (हैद्राबाद)

- स्क्रु व डिझेल इंजिनाचे भाग, विजेची यंत्रसामुग्री – राणीपूर (भोपाळ)

- टेलिफोन व संदेशवहन यंत्रे – बंगळूर

- महाराष्ट्रातील यंत्रोद्योग - इंजिने व शेती पंप (पुणे) सातारा, कोल्हापूर, कीर्लोसकर वाडी (सांगली), पहिला डिझेल इंजिन कारखाना – सातारा
लाकूड कटाई - लाकूड कटाईची अत्याधुनिक गिरणी – आसाम

इतर – मुंबई, म. प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, कर्नाटक इ.
धातुवरील नक्षीकाम पितळी भांडी – मुरदाबाद

भंडी व सुरया - हैद्राबाद, वाराणाशी, दिल्ली, लखनौ, मलबार, जयपूर इ.

भारतातील लघुद्योगासाठी प्रसिध्द ठिकाणे
लघुद्योग ठिकाण लघुद्योग ठिकाण
रेशीम सोलकुची (आसाम) कापड छापकाम लखनौ, फारुदबाद
कुलुपे अलिगड हस्तिदंती वस्तु तिरुअनंतपूरम
अत्तरे कनोज दागिने गया व पटना
पादत्राणे जयपूर, जोधपूर कौले मंगलोर
माती व वेतकाम त्रिपुरा पितळी भांडे जयपूर
सुरया मुरादाबाद लोकर जालंधर, अमृतसर
धातुवरील नक्षीकाम कंटक शाली व गालीचे श्रीनगर
विड्या दिंडुगल (तामिळनाडू) मधुमक्षिकापालन कुर्ग (कर्नाटक
बांगड्या फिरोजपूर लोकरी शाली मदुराई
कलाबूत आलिगड दुग्ध उत्पादने आनंद (गुजरात)
सिमेंट कारखाने गुंटूर जैविक खते गाझियाबाद
हि-यास पैलू पाड्णे जयपूर तांबे गाळणे (सार्वजनिक कारखाना) घाटशिला
सतरंज्या वारंगळ, एट्टरु (आंध्रप्रदेश), भवानी (तामिळनाडू), मिर्झापूर( उ. प्रदेश)

वाहतूक व दळणवळण

रस्ते मार्ग

रस्ते मार्ग

रस्ते मार्ग

वाहतुकीच्या मार्गांपैकी रस्ते वाहतूक सर्वांधिक लवचिक असते. रस्ते मार्गांचे १) राष्ट्रीय महामार्ग २) राज्य महामार्ग ३) जिल्ह्यातील रस्ते ४) ग्रामीण रस्ते असे प्रकार पडतात. रस्ते मार्गाची लांबी एकूण मार्गाच्या ८५% आहे. सध्या ३३ लाख कि.मी. हून जास्त लांबीचे आहे. त्यामध्ये १) राष्ट्रीय महामार्ग – ७०,५८४ कि.मी. २) राज्य महामार्ग – १, २८,००० कि.मी. ३) जिल्हा रस्ते – ४, ७०,००० ४) ग्रामीण रस्ते – २६, ५०,०००कि.मी. होते.
रस्त्यांचे वर्गीकरण करणारी योजना – नागपूर योजना (१९४३)
राष्ट्रीय महामार्ग – यांना देशाचा धमन्या म्हणतात. यांची लांबी ७०,५४८ कि.मी. होती. एकूण रस्त्यांच्या २% लांबी असली तरी देशाच्या वाहतुकीत ४०% वाटा आहे. या मार्गाचे व्यवस्थापन केंद्राच्या अखत्यारीत आहे.
भारतातील सर्वांत जुना महामार्ग ग्रँन्ड ट्रंक मार्ग हा आहे. या रस्त्याने कोलकाता व अमृतसर ही शहरे जोडली आहेत. हा २५०३ कि.मी. चा शेरशहा सुरी याने बांधला.

देशातील प्रमुख महामार्ग

देशातील प्रमुख महामार्ग

देशातील प्रमुख महामार्ग
महामार्ग भारतातील प्रमुख महामार्ग महाराष्ट्रातून जाणारे महामार्ग
क्रमांक कोठून कोठे जातो महामार्ग क्र. कोठून कोठे जातो राज्यातील लांबी
१ दिल्ली-जालंधर-अमृतसर ३ मुंबई-नाशिक-आग्रा ३९१
२ दिल्ली-कोलकाता ४ ठाणे-पुणे-चेन्नई ३७५
४ अ बेळगांव-पणजी ४ ब न्हावाशेवा-कळंबोली-पळस्पे २७
५ बारगोरा-कटक-चेन्नई ६ धुळे-नागपूर-कोलकाता ६६८
१० दिल्ली-फजिल्का ७ वाराणशी-नागपूर-कन्याकूमारी २३२
२४ दिल्ली-लखनौ ८ मुंबई-अहमदाबाद-दिल्ली १२८
९ पुणे-सोलापूर-विजयवाडा ३३६
१३ सोलापूर-चित्रदुर्ग-मंगलोर ४३
१६ निझमाबाद-जगदाळपूर ५०
१७ पनवेल-पणजी-एडापल्ली ४८२
५० पुणे-नाशिक १९२
६९ नागपूर-अद्दल्लागंज ५५
२०४ रत्नागिरी-कोल्हापुर १२०
२११ सोलापूर-धुळे ४००
२२२ कल्याण-परभणी-नांदेड

भारतातील सर्वाधिक लांबीचे महामार्ग असणारे राज्य – उ.प्रदेश (५,८७४ कि.मी.)
महाराष्ट्रात ४,४७२ कि.मी. लांबीचे महामार्ग असून महाराष्ट्रातून एकूण राष्ट्रीय महामार्गांची संख्या - १६
भारतातील सर्वांत लांब असणारा राष्ट्रीय महामार्ग – वाराणशी-नागपूर-कन्याकूमारी (२३६९ कि.मी.)
भारतातील सर्वात कमी लांब असणारा राष्ट्रीय महामार्ग ० क्र. ४७-ए (विलिंग्टन बेट ते कोचीन बाय पास – ६ कि.मी.)
भारतात सर्वाधिक लांबीचे रस्ते – महाराष्ट्र (३६१८९६ कि.मी.)
भारतातील एकूण महामार्गाची संख्या २२१
२००९-१० मध्ये भारतात प्रति १०० वर्ग कि.मी. ला रस्त्यांची लांबी – घनता (९७ कि.मी.)
भारतातील रस्त्यांची सर्वाधिक घनता असणारे राज्य - दिल्ली (१९९३ कि.मी.), केरळ (५२७ कि.मी.)
रस्त्यांची सर्वाधिक लांबी – १) यूएसए २) भारत
जगातील सर्वात उंचावरील सडक – लेह मनाली मार्ग (४२७० मी.)
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ५४,००० कोटी रु. खर्चाचा महत्त्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प (एन.एच.डी.पी.) हाती घेण्याची घोषणा केली. या प्रकल्पात पहिल्या ५६६४ कि.मी. लांबीचा दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता ही महानगरे जोडण्याचा प्रकल्प २००४ पर्यंत पूर्णं होणे अपेक्षित होते. त्याला सुवर्ण चतुःकोण म्हणतात.
दुस-या टप्प्यात ७३०० कि.मी. लांबीचे महामार्ग श्रीनगर ते कन्याकुमारी व पश्चिमेकडील सिल्वर ते पोरबंदर ही भारताची चार टोके जोडते.
याव्यतिरिक्त देशातील ८ प्रमुख बंदरांना जोडणा-या १००० कि.मी. लांबीच्या मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजना जाहिर - २५ डिसेंबर, २००० अपेक्षित खर्च ६०,००० कोटी यानुसार हजार पेक्षा जास्त लोकसंख्येची गावे २००३ पर्यंत रस्त्याने जोडणे व ५०० हून जास्त लोकसंख्येची गावे २००७ पर्यंत जोडणे.
सीमा रस्ते संघटना (बी.आर.ओ) स्थापना १९६०, द्वारे सीमा प्रदेशात कार्यक्षम वाहतुकीसाठी रस्ते बांधणी, देखभाल व वाहतूक नियंत्रण करण्याचे काम केले जाते.
भारतातील ८०% प्रवासी वाहतूक व ६५% वाहतूक रस्त्याने होते.

रेल्वे मार्ग

रेल्वे मार्ग

रेल्वे मार्ग

भारतीय रेल्वे आशिया खंडात प्रथम तर जगात एकाच व्यवस्थापनाखालील द्वितीय क्रमांकाची आहे. भारतीय रेल्वे ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठा उपक्रम आहे.
१६ एप्रिल १८५३ रोजी ठाणे ते मुंबई या दरम्यान ३४ कि.मी. अंतरावर पह्ली रेल्वे धावली.
नुकतेच रेल्वेचे १५० वर्ष पूर्ण झाले. रेल्वेचा मॉस्कॅट – भोलू
लोहमार्गाच्या लांबीनुसार जगात भारताचा क्रमांक – सहावा
भारतातील रेल्वे मार्गांची एकूण लांबी ६४,७५५ किमी होती.
स्वातंत्रोत्तर काळातील मोठा उपक्रम म्हणजे मुंबई ते मंगलोर या मार्गावरील ८४३ कि.मी. ची कोकण रेल्वे होय. या मार्गावर ६८ स्टेशन, ७३ बोगदे व १२६ मोठे १३५९ लहान पूल आहेत.
देशातील सर्वात मोठा बोगदा याच मार्गावर आहे. – करबूडे (रत्नागिरी ६.४५ कि.मी.)
देशातील सर्वात उंच रेल्वे पूल - पानवल (रत्नागिरी) ६५ मी.
कोकण रेल्वेत भाग भांडवल – केंद्र शासन - ५१%, महाराष्ट्र -२२%, कर्नाटक – १५%, गोवा – ६% व केरळ ६%
भारतातील पहिली भुयारी रेल्वे – कोलकाता ते एक्सेलनाड - १६.४५ कि.मी. (१९८४)
लोकल रेल्वे सेवा असणारी शहरे - चेन्नई व मुंबई
प्रस्तावित लोकल रेल्वे सेवा – बंगळूर
मेट्रो रेल्वे सेवा असणारी शहरे – कोलकाता व दिल्ली
भारतातील सर्वाधिक अंतर कापणारी रेल्वे – १) हिमसागर एक्सप्रेस – कन्याकुमारी ते जम्मू (१२ राज्यांतून जाते) (३७२६ कि.मी. २) गुवाहाटी ते त्रिवेंद्रम – ३५७४ कि.मी.
भारतातील सर्वात मोठे जंक्शन स्टेशन – इटारसी
भारतातील सर्वात मोठा वाहतुकीचा रेल्वे विभाग - उत्तर
पहिली जनशताब्दी एक्सप्रेस धावली १६ एप्रिल २००२ रोजी – मुंबई-मडगांव दरम्यान

रेल्वे मार्गाचा प्रकार रुंदी (मीटरमध्ये) प्रमाण
ब्रॉड्गेज १.६७६ ७६%
मीटरगेज १.०० ९.२७%
नॅरो गेज ०.७६२ १४.८०%
लाईट गेज (स्पेशल गेज) ०.६१०

भारतातील पहिले विद्युत रेल्वे इंजिन – लोकमान्य (१९६१)
भारतात असणारे एकूण विभाग – जुने ९+नवे ७ = १६

लोहमार्ग विभाग मुख्यालय लोहमार्ग विभाग मुख्यालय
उत्तर विभाग दिल्ली ईशान्य विभाग गोरखपूर
पुर्व विभाग कोलकाता ईशान्य सीमा विभाग मालीगाव – गुवाहाटी
अग्नेय विभाग कोलकाता दक्षिण विभाग चेन्नई
मध्य विभाग मुंबई दक्षिण मध्य विभाग सिकंदराबाद
पश्चिम विभाग मुंबई दक्षिण-पश्चिम विभाग हुबळी
पश्चिम मध्य विभाग जबलपूर दक्षिण पुर्व मध्य रेल्वे बिलासपूर
उत्तर मध्य विभाग अलाहाबाद पुर्व किनारपट्टी विभाग भुवनेश्वर
उत्तर-पश्चिम विभाजन जयपूर मध्य पूर्व विभाग हाजीपूर

भारतातील विद्युतीकरण झालेले एकूण लोहमार्ग - ३०%
भारतातील सर्वात मोठा विद्युतीकरण झालेला रेल्वे मार्ग – दिल्ली-कोलकाता
भारतातील पहिली वीजेवरील रेल्वे धावली - व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला (३ फेब्रुवारी १९२५)
रेल्वेचा अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्यास सुरुवात – १९२३-२४
रेल्वे संशोधन केंद्र – लखनौ
दिल्ली येथे मेट्रो रेल्वे सुरुवात – १७ डिसेंबर २००२ (६२.१६ कि.मी.) हा प्रकल्प जपान व कोरियाच्या मदतीने पूर्ण होत आहे.
भारतातील राज्यांच्या राजधानीच्या शहरांना देशाच्या राजधानीशी जोडणा-या व ताशी १३० कि.मी. वेगाने धावणा-या राजधानी
१९८ मध्ये सुरु झालेली ताशी १४० कि.मी. वेगाने धावणारी रेल्वे – शताब्दी एक्सप्रेस (दिल्ली भोपाळ)
एकही रेल्वे मार्ग नसणारे राज्य – मेघालय
रेल्वे कोच फॅक्टरी - लालगंज (रायबरेली उत्तर प्रदेश), कपूरथळा (पंजाब)
एक्सप्रेसची सेवा सुरु - १९६९
काश्मिर खो-यात प्रथमच रेल्वे धावली - बडगाम ते अनंतनाग दरम्यान (१२ ऑक्टोंबर २००८)

विमान मार्ग

विमान मार्ग

विमान मार्ग

सर्वात जलद, आरामशीर परंतू महाग वाहतूक मार्ग - विमान मार्ग
भारतात प्रथम नोंदणीकृत हवाई उड्डान – १९१०
भारतात विमान वाहतुकीस सुरुवात झाली – १९२७
भारतातील पहिली डाक सेवा – अलाहाबाद ते नैनी (हेन्री पेक्वेट)
भारतातील पहिली व्यावसायिक डाक सेवा – १५ ऑक्टो. १९३२
भारतात हवाई वाहतुकीचा फायदा अस्तित्वात आला – १९३४
भारतातील अंतर्गत वाहतूक व जवळच्या १९ देशांना हवाई सेवा पुरवणारी कंपनी – इंडियन एअर लाईन्स
इंडियन एअर लाईन्सचे मुख्यालय – नवी दिल्ली
भारताची परदेशी विमान वाहतुकीची सेवा देणारी कंपनी – एअर इंडिया (मुंबई – १९५३)
एअर इंडिया व इंडियन एअर लाईन्सचे एकत्रिकरण करुन एअर इंडिया ची स्थापना करण्यात आली असून त्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे.
इंटरनॅशनल एअरपोर्ट ऍथॉरिटी ओफ इंडियाची स्थापना – १९७२, नॅशनल एअरपोर्ट ऍथॉरिटी ओफ इंडियाची स्थापना १९८६ ला करण्यात आली. त्यांचे एकत्रिकरण करुन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. याच्या व्यवस्थापनाखाली १६ अंतरराष्ट्रीय, ८७ देशांतर्गत व २९ नागरी विमान सेवा असे १२६ विमानतळे आहे.
देशांतर्गत वाहतूकीत खाजगी विमान वाहतूक सेवा - ३७%
ईशान्येकडील दुर्गम प्रदेशासाठी विमान सेवा सुरु – वायुदूत (१९८१)
तेल व नैसर्गिक वायू माहामंडळाला मदत सुरु केलेली हेलीकॉप्टर सेवा – पवन हंस.
हेलीकॉप्टर कार्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना – १९८५
इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अँकडमी – फुरसत गंज (उ. प्रदेश १९८६)
फ्लाईम ट्रेनिंग स्कूल - गोंदिया
बेंगलोर जवळ देवनहल्ली येथे बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बी.ओ.टी.) या तत्वावर ग्रीन फिल्ड (हरित क्षेत्र) विमानतळ उभारले जात आहे. तसेच अशाच प्रकारचे विमानतळ हैद्राबाद जवळ शमशाबाद येथे उभारले जात आहे.

भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळे

भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळे

भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळे

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ सहार, मुंबई
नेताजी सुभाष चंद्रबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ डमडम, कोलकाता
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पालम, दिल्ली
मिनाबक्कम (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ) चेन्नई
के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुअनंतपुरम, केरळ
राजा सान्शी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर (पंजाब)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर
डबेलीयम आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा (कोपा)
लोकप्रिय गोपिनाथ बोर्डोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैद्राबाद
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कोचिन
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद
आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळूर बंगळूर
आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर जयपूर
श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ श्रीनगर
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे
माल वाहतुकीचे सर्वात मोठे विमानतळ - नागपूर (कार्गो हब व मिहान प्रकल्प)
देशातील खाजगी क्षेत्रातील पहिले विमानतळ – कोची
गगन प्रकल्प – इस्त्रो व भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांचा संयुक्त प्रकल्प, ्चा वापर वाढण्याबाबत.

जलमार्ग

जलमार्ग

जलमार्ग

सर्वात स्वस्त व निर्नितीचा खर्च नसणारे वाहतूक साधन म्हणजे जल वाहतुक होय.
अंतर्गत जलमार्ग – देशातील नद्या व कालव्यांमध्ये ही वाहतूक चालते. देशातील नद्यांची एकूण लांबी २९,००० कि.मी. आहे. त्यापैकी २००० कि.मी लांबीचे प्रवाह यांत्रिक बोटींसाठी उपयुक्त आहेत. परंतू सध्या त्यापैकी फक्त १७०० कि.मी. प्रवाह वापरले जातात.
तामिळनाडू व आंध्रप्रदेशातील बंकिगहॅम व कंबरजुआ हे कालवे जल वाहतुकीस वापरतात.
सर्वाधिक लांबीचा जलमार्ग - अलाहाबाद ते हल्दिया. (एन.डब्ल्यु – १-१६२० कि.मी.)
एन. ड्ब्ल्यू – २, सदरी ते धुबरी – ८११ किमी. , एन. ड्ब्ल्यू – ३ कोट्टापुरम ते कोल्लाम – १६८ किमी.
प्रस्तावित एन.ड्ब्ल्यु. – ४, काकीनाडा ते सरकानम या दरम्यान असून त्याची लांबी ११०० कि.मी. आहे.
किना-यालगतचे जलमार्ग - भारताला सुमारे ७५१६ कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे.
सागरी मार्ग – भारताच्या किना-यावरील आंतरराष्ट्रीय बंदरातून आंतरराष्ट्रीय वाहतूक चालते. भारतात १३ प्रमुख बंदरे असून २०० लहान बंदरे आहेत. मोठ्या बंदरांचे व्यावस्थापन केंद्र सरकार तर लहान केंद्रांचे व्यावस्थापन रज्य सरस्कारकडे आहे. देशाच्या एकूण व्यापारांपैकी ९०% व्यापार बंदरातून होतो. रायगड जिल्ह्यातील प. जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) बंदराच्या निर्मितीनंतर भारताच्या प्रमुख बंदरांची संख्या १२ झली तर पार्टब्लेअरच्या सावेशाने ही संख्या १३ झाली आहे. न्हावाशेवा बंदर हे भारतातील सर्वाधिक मोटारींची निर्यात करतो.
स्वातंत्रोत्तर काळात मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी उभारले गेलेले पहिले बंदर – कांडला (गुजरात)
कांडला हे भारतीचे बंदर असून याच्या विकासासाठी येथे मुक्त व्यापार क्षेत्र स्थापन केले आहे.
प्रमुख बंदरामध्ये सर्वांत मोठे बंदर – मुंबई (१/४ व्यापार)
समुद्रात बांधलेला द. आशियातील सर्वांत मोठा पूल – वांद्रे वरळी (५.६ कि.मी.)
व्यापारी दृष्टीकोनातून चौथ्या क्रमांकाचे लोह खनिज निर्यात करणारे बंदर - मार्मागोवा (गोवा)
सर्वप्रकारच्या हवेच्या स्थितीत उपयुक्त बंदर – कारवार (कर्नाटक)
कर्नाटकमधील केंद्रमुखचे लोहखनिज निर्माण करण्यासाठी विकसित केलेले बंदर – मंगलोर

पश्चिम किना-यावरील वेबनाद या कायलाच्या प्रवेशद्वारावर असणारे नैसर्गिक बंदर (व्यापार, पेट्रोलियम, खते इ.) – कोची (केरळ)
पुर्व किना-यावरील जुने कृत्रिम बंदर - चेन्नई (द्वितीय क्रमांक)
आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने विकसित केलेले चेन्नई जवळील बंदर – एन्नोर
सर्वाधिक खोल व सुरक्षित असणारे बंदर (भूवेष्टीत) - विशाखापट्टनम (आंध्रप्रदेश)
समुद्रकिना-यापासून जवळ जवळ १२५ कि.मी. दूर असणारे हुगळी नदीवर दक्षिणेस उभारलेले बंदर – कोलकाता (डायमंड हार्बर)
कोलकाता बंदरावरील ताण कमी करण्यासाठी हुगळी नदी वर दक्षिणेस उभारलेले बंदर- हल्दिया (सहाय – रुमनिया व फ्रांस)
सुएझ कालव्यामुळे भारत व ल्म्डन मधील कमी झालेले अंतर – ७००० कि.मी.
अंतर्गत जलमार्गाची सर्वाधिक लांबी – चीन, भारत (सातवा)

पाईपलाईन वाहतूक

हाजीरा (गुजरात) पासून विजयपूर (म. प्रदेश) वरुन जगदीशपूर (उ.प्रदेश) प्रर्यंत १७३० कि.मी. ची नैसर्गिक वायूची पाईपलाईन आहे. यापासून ६ खत कारखाने व २ औष्णिक वीद्युत केंद्रांना वायू पुरवठा होतो.
गुवाहाटी ते बैरोनी अशुध्द तेल वाहतूक पाईपलाईन - ११५७ कि.मी.
मुंबई पासून पानेवाडी (मनमाड – महाराष्ट्र) पर्यंत पेट्रोलिअमची पाईप लाईन आहे.

राज्य बंदरे

केरळ - अलेप्पी, कालिकत, क्विलॉन, कोचीन

गुजरात – भावनगर, ओखा, कांडला

तामिळनाडु – कडनोर, काकीनाडा, मच्छलीपट्टन्म,धनुषकोडी, कुराईकल ओरिसा – गोपलपूर, बारादिले, कटक, चांथली

संदेशवहन

डाकसेवा -

भारतात जनतेसाठी पहिल्यांदा डाकसेवा सुरु झाली - १८३७
पहिले तिकीट कढले - कराची (१८५२)
भारतामध्ये स्पीड पोस्टरची सुरुवात झाली - १ ऑगस्ट १९८६
पोस्टाद्वारे मनिऑर्डर्ची सुरुवात - १८७२
भारतीय टपाल सेवा जगातील सर्वांत मोठी टपाल सेवा असून ३१ मार्च २०६ पर्यंत एकूण १,५५,५१६ कार्यालये होती. यापैकी ग्रामीण भागात ८९% कार्यालये होती. तर महाराष्ट्रात २००७-०८ मध्ये १२,५९५ कार्यालये होती. पैकी ग्रामीण भागात ११,३११ कार्यालये होती.
आज एक पोस्ट ऑफिस ६६१५ लोकसंख्येस व २१.१३ चौ. कि.मी. क्षेत्रास सेवा पुरविते.
हेच प्रमाण महाराष्ट्रात ६००० लोकसंख्या व २६ चौ. कि.मी. क्षेत्र आहे.
भारतात ६ आकडी नंबर असणारे ८ पिनकोड विभाग निर्माण केले – १९७२. पिनकोड मधील पहिला अंक विभात दर्शवितो. पहिले दोन अंक उपविभाग दर्शवितात, पहिले तील अंक मिळून जिल्हा दर्शविला जातो. तर शेवटचे तीन अंक वितरण पोस्ट कार्यालय दर्शवितात.
भारत प्रतिभुती मुद्रालय तिकिटे छ्पाई – १९२५
भारत Universal Postal Union (IPU) चा १८७६ पासून व Asian Postal Union (APU) सदस्य आहे.
भारताची २१७ हून अधिक देशासोबत पोस्टल सेवा सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक मनिऑर्डर सेवा सुरू – १९८६
देशात इतर पोस्ट सेवा सुरु - ३० जानेवारी २००४

तार व दूरध्वनी -

भारतात सर्वप्रथम तार सेवा सुरु – कोलकाता ते डायमंड हार्बर (१८५१)
भारतातील सर्वात मोठी तार कचेरी – मुंबई
भारतात टेलेक्स विभाग सुरू - १९६३
देवनागरी भाषेतून टेलेक्सची सुविधा – १९६७
पहिली बिनतारी संदेशवहन सेवा - कोलकाता ते आग्रा (१८५३)
दूरध्वनीचा शोध लावणारा शास्त्रज्ञ – अलेक्झांडर ग्राहम बेल (१८७५)
भारतात दूरध्वनी सेवेची सुरुवात - कोलकाता – (१८८१-८२)
प्रथम मोबाईल सेवा - कोलकाता (२२ मार्च १९९५)
भारतात पहिले स्वयंचलित केंद्र – सिमला (१९१३-१४)
पहिली एस.टी.डी. सेवा सुरु – कानपूर ते लखनौ दरम्यान (१९६०)
भारत ते लंडन पहिली आंतरखंडीय सेवा सुरु - १८७३
भारतात पहिले वाई-फाई शहर बनणार – पुणे
भारत संचार निगम लि. ची स्थापना - १ ऑक्टोंबर २०००
भरतील दूरसंचारचा जगात चीन नंतरचा क्रमांक - दुसरा
भारतात सर्वाधिक इंटरनेट धारक - १) महाराष्ट्र २) दिल्ली
भारतात मोबाईल दुरध्वनी ग्राहकांची संख्या मार्च २०१० पर्यंतच्या आकडेवाडीनुसार ५८.४३ कोटी असून भारताने भारताने अमेरिकेला मागे टाकून चीन नंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतात मोबाईल संभाषणाचे दर जगात सर्वांत स्वस्त आहे.
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड सेवा पुरविते - मुंबई व दिल्ली (१९८६)
विदेश संचार निगम लिमिटेडची स्थापना - १ एप्रिल १९८६ (सध्या खाजकीकरणाने टाटांकडे)

रेडीओ -

भारतात रेडिओवरील पहिले बातमीप्रत्र – मुंबई (१९२७)
ऑल इंडिया रेडिओची स्थापना – १९३६
ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणीत रुपांतर व विविध भारताची सुरुवात झाली - १९५७
ए.आय.आर. ची पहिलि एफ.एम. सेवा – १९७७ मद्रास
देशात २२५ आकाशवाणी केंद्र होती ती ९९.१३ लोकसंख्या व १९.४२ क्षेत्रफळास पुरविते.
पहिले एफ.एम. केंद्र सुरु – दिल्ली

दूरदर्शन -

भारतात प्रायोगिक स्वरुपात दूरदर्शन सुरु – दिल्ली (१५ सप्टेंबर १९५९)
दूरदर्शनची नियमित सेवा सुरु – १९६५
मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात – २ ऑक्टोंबर १९७२
दूरदर्शन आंतरराष्ट्रीय वाहिनी – १४ मार्च १९९५
दूरदर्शन ऑल इंडियापासून वेगळे केले – १९७६
उपग्रहाद्वारे नियमित प्रसारण, रंगीत प्रसारण व राष्ट्रीय कार्यक्रम सुरु - १९८२
पहिले भारतील चॅनल सुरु – झी.टी.व्ही. (१९९९)
डि.डी. स्पोर्टस – १९९९
डी.डी. इंडिया – १४ मार्च १९९५
डी.डी. भारती - २५ जानेवारी २००२
डी.डी. लोकसभा व राज्यसभा चॅनल - १४ डिसेंबर २००४
सांस्कृतीक चॅनल – २६ जानेवारी २००२
२४ तास दूरदर्शनच्या बातम्या देणारा डी.डी. न्यूज सुरु – ३ नोव्हेंबर २००३
१६ डिसेंबर २००४ रोजी दूरदर्शनचे डी.टी.एच. सेवा सुरु केली तिचे नाव - डी.डी. डायरेक्ट प्लस
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटी तर्फे ज्ञानदर्शन हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु – २६ जानेवारी २०००
सध्या रेडिओ व दूरदर्शनवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त संस्था – प्रसार भारती
सध्या दूरदर्शनच्या ८९७ ट्रान्समीटरद्वारे कार्यक्रम ८७% लोकांपर्यंत पोहोचतात.
दूरदर्शनचा सर्वात उंच टॉवर – प्रितमपूरा टॉवर (दिल्ली २३५ मी.)

चित्रपट -

सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश – भारत
भारतातील पहिला चित्रपट - राजा हरिशचंद्र १९१३ (दादासाहेब फाळके – धोंडीराज गोविंद फाळके)
भारतातील पहिला बोलपट -आलम आरा (आदैशिर इराणी) १९३१
पहिला रंगीत चित्रपट – बिल्ब मंगल
भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके
मराठी चित्रपट सृष्टीचे जनक - बाबूराव पेंटर
मराठी नाटकाचे जनक – विष्णू भावे

वृत्तपत्र -

भारतातील पहिले वृत्तपत्र - बेंगॉल गॅझेट (जेम्स हिकी – १७८०)
भारतीय भाषेतील पहिले वृत्तपत्र - दिग्दर्शन (बंगाली – १८१८)
अजुनही सुरु आसणारे सर्वात जुने वृत्तपत्र – मुंबई समाचार (गुजराती – १८२२)
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया २७ ऑगस्ट १९४७ रोजी झाली. कामकाजास प्रारंभ १ फेब्रुवारी १९५० पासून झाला. ही भारतातील सर्वात मोठी समाचा एजन्सी आहे.
३१ मार्च २००७ पर्यंत नोंदणीकृत प्रिंट मिडीयाची संख्या - ६५,०३२
यूनायटेड न्यूज ऑफ इंडिया – नोंदणी – १९५९ – कार्यास प्रारंभ २१ मार्च १९६१
इंडियन प्रेस कौन्सिलची स्थापना – १९६६ (पुर्नस्थापना – १९७९)
सर्वाधिक दैनिक प्रकाशन व वितरणात प्रथम क्रमांक – उत्तर प्रदेश
सर्वाधिक १८ भाषांतून वर्तमानपत्र प्रकाशित करणारे राज्य – ओरिसा

भारतातील पर्यटन स्थळे
पर्यटन स्थळ ठिकाण व राज्य पर्यटन स्थळ ठिकाण व राज्य
गेट वे ऑफ इंडिया मुंबई इंडिया गेट दिल्ली
आनंद भुवन अलाहाबाद आगाखान पॅलेस येरवाडा (पुणे)
चार मिनार हैद्राबाद गोल घुमट विजापूर
लिंगराज मंदिर भूवनेश्वर (ओरिसा) जगन्नाथ मंदिर पुरी (ओरिसा)
मिनाक्षी मंदिर मदुराई (तामिळनाडू) सुर्य मंदिर कोणार्क (ओरिसा)
दाल सरोवर श्रीनगर अमरनाथ जम्मू काश्मिर
कुतूबमिनार दिल्ली हूमायुनची कबर दिल्ली
हवामहल जयपूर ताजमहल आग्रा
खजुराहो लेणी भोपाळ एलीफंट गुहा रायगड
दिलवाडा जैन मंदिरे माउंट अबू (राजस्थान) अकाल तख्त सुवर्णमंदिर (अमृतसर)
कन्याकुमारी मंदिर केप कामोरिन (तामिळनाडू) गंगासागर कोलकाता
शांतीवन दिल्ली शांतिनिकेतन कोलकाता
अंबर पॅलेस जयपूर जंतरमंतर दिल्ली
गोमटेश्वराचा पुतळा श्रवणबेळगोळ (कर्नाटक) राजघाट दिल्ली
शक्ती स्थळ दिल्ली लाल किल्ला दिल्ली
जामा मशीद दिल्ली हावडा ब्रीज कोलकाता
वीरभूमी दिल्ली त्रिमुर्ती भवन दिल्ली
वेरुळ, अजिंठा औरंगाबाद नटराज मंदिर चिदंबरम (तामिळनाडू)
बुध्द गया बिहार मार्बल रॉक जयपूर
टॉवर ऑफ सायलेट मुंबई गिरणार पर्वत जुनागड
लक्ष्मी विलास पॅलेस बडोदा पिचळा सरोवर सांची
व्हिक्टोरीया गार्डन मुंबई ख्वाजा मुइनुद्दीन चीस्ती दर्गा अजमेर
ज्वालामुखी कांगडा बृहदेश्वर मंदिर कुंभकोणम (तामिळनाडू)
कुशिनगर उत्तर प्रदेश सारनाथ उत्तर प्रदेश
वृषभदेव चुलगिरी (म.प्रदेश)

भारतात अढळणा-या जमाती
जमात राज्य जमात राज्य
लेपचा सिक्कीम चकमा, लुसिया त्रिपूरा
बोडो आसाम कोळम आंध्रप्रदेश
गारो मेघालय, आसाम, नागालँन्ड हो छोटा नागपूरचे पठार
भुतिया कुमाउ गढवाल कुकी मणिपूर
जारवा छोटे अंदमान मुंडा बिहार
संथाल विरभूम प. बंगाल, हजारीबाग (झारखंड) भिल्ल राजस्थान, महाराष्ट्र गुजरात, छत्तीसगढ
उरली, सोपला केरळ कोल मध्य प्रदेश
अभोर, अप्तानी अरुणाचल प्रदेश मुरिया, बैगा बस्तर (छत्तीसगढ)
कुरुख झारखंड, ओरिसा आओ, अंगामी नागालँन्ड
भोट, गड्डी, गुज्जर हिमाचल प्रदेश वारली महाराष्ट्र
जयंती मेघालय, आसाम तोडा, कोटा, बदगा निलगिरी (तामिळनाडू)
गोंड छत्तीसगढ, झारखंड चेंचू आंध्रप्रदेश

भारतातील सण
सण राज्य सण राज्य
पोंगल केरळ ओनाम केरळ
बिहू आसाम खराची पुजा त्रिपूरा
नाडहब्द कर्नाटक दुर्गापुजा प. बंगाल
जनाष्टमी उ. प्रदेश वैषाखी पंजाब

राष्ट्र ध्वज – राष्ट्र ध्वजाचा वरचा केशरी रंग, मधला पांढरा व खाली हिरवा रंग आहे. राष्ट्र ध्वजाची लांबी व रुंदी३ः२ या प्रमाणात आहे. त्या मध्यभागी २४ आरे असणारे निळ्या रंगाचे चक्र आहे. यातील केशरी रंग शौर्याचे प्रतीक असून पांढरा रंग शांतीचा संदेश देतो तर हिरवा रंग समृध्दीचे प्रतीक आहे.
राजमुद्रा – सारनाथ येथील अशोक स्तंभावरुन घेतलेली सिंहशीर्ष ही भारताची राजमुद्रा आहे. त्यावर ४ सिंह आहेत. मुद्रेवर मुंडक उपनिषदातून घेतलेले “सत्यमेव जयते” हे ब्रीद वाक्य आहे. राजमुद्रेत खाली बाजुस मध्यभागी अशोक चक्र असून त्याच्या उजव्या बाजूस घोडा व डाव्या बाजूस बैलाची प्रतिकृती आहे. यातील सिंह हा सामर्थ्यांचे प्रतीक आहे. चक्र गति व्यक्त करते, घोडा उत्साह व वेगाचे महत्त्व दाखवितो, तर बैल कामसू आणि खंबीर असले पाहिजे.
राष्ट्र्गीत – जन-गन-मन हे रविद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या गिताचे एक कडवे. ते २४ जानेवारी, १९५० रोजी राष्ट्र गीत म्हणून स्वीकारले.
राष्ट्रीय गाणे – वंदे मातरम हे बंकिमचंद्र चॅटर्जी याच्या आनंद मठ कादंबरीतून घेतले आहे.

भारत राजकीय

भारतात सध्या असणारे राज्य व केंद्रशासित प्रदेश – २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश
दोन राज्यांची राजधानी असणारा केंद्रशासित प्रदेश – चंदीगढ
भारताचे क्षेत्रफळाने सर्वांत मोठे असणारे राज्य – १) राजस्थान २) मध्यप्रदेश ३) महाराष्ट्र राज्य
उत्तर प्रदेशचे जुने नाव – ब्रम्हर्षी देश
तिन्ही बाजुने बाग्लादेश असणारे राज्य – त्रिपुरा
सर्वाधिक राज्यांना सीमा असणारी राज्ये – उत्तर प्रदेश (८), आसाम (७), मध्यप्रदेश (६)
भारताती सर्वांत मोठे राज्य – राजस्थान
भारतातील सर्वात लहान राज्य – गोवा
भारतातील सर्वात मोठा जिल्हा – लडाख (जम्मू काश्मिर)
भारतातील सर्वात लहान जिल्हा – गारो (मेघालय)
नेपाळ व भूतानशी संलग्न राज्य – सिक्कीम व प. बंगाल
अरुणाचल प्रदेशचे जुने नाव – नॉर्थ इस्ट फ्रॅटियर एजन्सी
तीन देशांना सीमा भिडतात – प. बंगाल, जम्मू व काश्मिर
सुमदोरांग चु खोरे – तवांग जिल्हा (अरुणाचल प्रदेश)
आंतरराष्ट्रीय सीमा असणारी भारतातील एकूण राज्ये – १७
भारताचे अति पुर्वेकडील राज्य – अरुणाचल प्रदेश
पाकिस्तानच्या सीमेवर असणारी राज्ये – पंजाब, राजस्थान, गुजरात, जम्मू-काश्मिर
चीन बरोबर सीमा असणारी राज्ये – उत्तराखंड, हि. प्रदेश, जम्मू-काश्मिर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम इ.
बांग्लादेश बरोबर सीमा – आसाम, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल इ.

राज्य राजधानी राज्य राजधानी
आंध्रप्रदेश हैद्राबाद नागालँड कोहीमा
अरुणाचल प्रदेश इटानगर ओरिसा भुवनेश्वर
आसाम दिसपूर पंजाब चंदीगढ
बिहार पाटना राजस्थान जयपूर
छत्तीसगढ रायपूर सिक्कीम गंगटोक
गोवा पणजी तामिळणाडू चेन्नई
गुजरात गांधीनगर त्रिपूरा आगरतळा
हरीयाणा चंदीगढ उ.प्रदेश लखनौ
हि. प्रदेश सिमला उत्तरांचल डेहराडून
जम्मू काश्मिर श्रीनगर (उन्हाळी) प. बंगाल कोलकाता
जम्मू (हिवाळी) झारखंड रांची
मणिपूर इंफाळ कर्नाटक बंगलोर
मेघालय शिलाँग केरळ तिरुअनंतपूरम
मिझोराम ऐजवाल मध्यप्रदेश भोपाळ
महाराष्ट्र मुंबई

केंद्रशासित प्रदेश
राजधानी संघराज्य प्रदेश राजधानी संघराज्य प्रदेश
अंदमाव निकोबार बेटे पोर्ट ब्लेअर लक्षद्वीप कावरती
चंदीगड चंदीगड पाँडीचेरी पाँडीचेरी
दादरा व नगर हवेली सिल्वासा दिल्ली दिल्ली
दमण व दीव दमण

विकसित देश व राज्ये शहरांची बदललेली नावे
जुने नाव नवीन नाव जुने नाव नवीन नाव
सिलोन श्रीलंका ब्रम्हदेश म्यानमार
रंगून यांगून मोसोपोटेमिया इराक
त्रिवेंद्रम थिरुअनंतरपुरम बॉम्बे मुंबई
पाँडीचेरी पुदुच्चेरी बंगलोर बंगळूर
मंगलोर मंगलूर गोहत्ती गुवाहटी
उटकमंट / उटी उधगमंडलम कोचीन कोची
भडोच भरुच बडोदा वडोदरा
खंबायत खँभात पाटना पटना
ऑबिसिनिया इथिऑपिया बनारस वाराणशी
कॉन्स्टेटिनोपल इस्तंबूल फार्मोसा तैवान
उत्तर –होडेशिया झांबिया हॉलंड नेदरलँड
कालिकत कोझीकोड मादागास्कर मालागासी
पेकिंग बिजिंग गोल्ड कोस्ट घाना
डच इस्ट इंडिया इंडोनेशिया पंजिम पणजी
प्रयाग अलाहाबाद द. आफ्रिका नामिबिया
उडीसा ओडीशा प. बंगाल पश्चिम बंगा

भौगोलिक उपनामे
रत्नांची भूमी - मणिपूर गिरिस्थानांची राणी - मसुरी
मंदिराचे शहर - भुवनेश्वर मंदिराचे माहेर - बनारस
राजवाड्यांचे शहर - कोलकाता हि-यांचे शहर - कोलकाता
स्पेस सिटी - बंगलोर उद्यानाचे शहर - बंगलोर

भारतातील बारा जोर्तिलिंग
जोर्तिंलिंग ठिकाण जोर्तिंलिंग ठिकाण
काशी दिश्वेश्वर बनारस (वाराणसी) केदारनाथ उत्तराखंड
ओंकारेश्वर खांडवा (म.प्रदेश) सोमनाथ गुजरात
महाकालेश्वर उज्जैन (म. प्रदेश) रामेश्वर रामेश्वर (बेटावर) तामिळनाडु
भीमाशंकर भीमाशंकर (पुणे) परळी वैजनाथ बीड
त्रंबकेश्वर त्रंबकेश्वर (नाशिक) औंढ्या नागनाथ हिंगोली
घृष्णेश्वर वेरुळ (औरंगाबाद) श्री शैल्यमलिकार्जुन आंध्रप्रदेश

भारतातील सर्वांत लांब/उंच/मोठे/पहिले

सर्वांत लांब नदी – गंगा नदी २५१० कि.मी.
सर्वात मोठे गुरुद्वार – सुरर्णमंदीर (अमृतसर)
सर्वात मोठा जिल्हा – लडाख (काश्मिर)
सर्वात लहान जिल्हा – गारो हिल्स (मेघालय)
आकाराने सर्वात मोठे राज्य – राजस्थान
सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई (१०६४ कोटी)
लोकसंख्येने सर्वांत मोठे राज्य – उत्तरप्रदेश
सर्वात मोठा प्लॅटफार्म - खरपूर (प. बंगाल)
सर्वात मोठी मशीद - जामा मसीद (दिल्ली)
सर्वात मोठा घुमट - गोल घुमट (विजापूर)
सर्वात खोल खाण - कोलार (कर्नाटक)
सर्वात मोठी आदिवासी जमात – संथाल (प. बंगाल)
सर्वात मोठा धबधबा - गिरसप्पा (जोग) शरवती नदी २५३कि.मी.
रेल्वे मार्गावरिल सर्वात लांब पुल - नेहरू सेतू (शोण – ३.०६५ किमी.)
रस्त्यावरील सर्वांत लांब पूल - गांधी सेतु (गंगा) पटना ५.५७ कि.मी. सर्वात उंच दरवाजा - बुलंद दरवाजा (फत्तेपूर सिक्री – उ.प्रदेश)
सर्वात मोठे वस्तुसंग्रहालय - इंडियन म्युझियम (कोलकाता)
सर्वात वेगवान रेल्वे - शताब्दी एक्सप्रेस १४० इ.मी./तास
सर्वात मोठे गुंफा मंदिर - कैलास लेणे (वेरुळ-औरंगाबाद)
सर्वांत लांब धरण - हिरकुड धरण (ओरिसा) २५.४० कि.मी
सर्वात उंच मिनार - कुतुबमिनार (दिल्ली)
सर्वात मोठे कालवा – इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)
सर्वात उंचीवरील रेल्वेस्टेशन - धूम (दार्जिलिंग- प.बंगाल)
सर्वात मोठे सरोवर - वुलर सरोवर (काश्मिर)
सर्वात उंच धरण - भाक्रा (हिमाचल प्रदेश) २२६ कि.मी.
सर्वाधिक पावसाचे ठिकाण - मावसिनराम (मेघालय)
सर्वात मोठे वाळवंट - थरचे वाळवंट (२.५ लक्ष चौ.कि.मी.)
सर्वात लांब मार्ग – ग्रँड ट्रक (कोलकाता – अमृतसर)
सर्वात मोठे चर्च - सेंट कॅथेड्रल चर्च (गोवा)
सर्वात उंच मुर्ती - ॠषभदेव – चुलगिरी ( मध्यप्रदेश)
सर्वात उंच पर्वत शिखर - के – २ (गॉडविन ऑस्टीन)

भारत संकीर्ण

भारताती पहिली महापौर - अरुणा असफ अली.
भारतातील पहिली आय.पी.एस. अधिकारी - किरण बेदी
शांतता काळातील शौर्याचे सर्वोच्य पदक - अशोक चक्र
सर्वात उंच मूर्ती – ऋषभदेव – चुलगिरी (म.प्रदेश)
सर्वात मोठा कॉरिडोर - रामेश्वर मंदिर (तामिळनाडू)
भारतातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - जुबरहट्टी (हि.प्रदेश)
पहिली वैमानिक स्री - सौदामिनी देशमुख.
शौर्याबद्दलचे भारतातील सर्वात मोठे पदक - प्ररमवीर चक्र
भारतातील सर्वात मोठा सन्मान – भारत रत्न
भारतातील सर्वात मोठा सन्मान - ज्ञानपीठ पुरस्कार
भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण - गंगानगर (राजस्थान)

भारतातील पहिले

भारताचे पहिले महान्यायवादी - एम.सी.सेटलवाड
भारतील्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष - गुलझारीलाल नंदा
लोकसभेचे अध्यक्ष - गणेश वासुदेव माळवणकर
जड पाणी प्रकल्प - नानगल (पंजाब १९६१)
भारताचे पहिले सरन्यायाधिश - न्या. हिरालाल जे. कानिया
वित्त आयोगाचे अध्यक्ष - के.सी.नियोगी
भारतरत्न मिळविणारे पहिले राज्यपाल - सी. सुब्रमण्यम
भारतील फूटबॉल क्लब - मोहन बागान
अंतरिक्ष स्थानक केंद्र - आर्वी (पुणे १९६७)
भारतीय आय.सी.एस. अधिकारी - सत्येंद्रनाथ टागोर
ब्रिटिश हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल - वॉरन हेस्टिंग्ज
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी
बॅरिस्टर पदवी मिळविणारे - ज्ञानेंद्रमोहन टागोर
स्वतंत्र भारताचे भारतीय सरसेनानी - जनरल करिअप्पा
अंटार्टिकावर जाणारे - ले. रामचरण (१९६०)
रॅमन मॅगसेसे मिळविणारे - विनोबा भावे
पहिले नोबेल पारितोषिक - रविंद्रनाथ टागोर (१९१३ – साहित्य)
पहिले भौतिक शास्त्राचे जनक - सी.व्ही.रामन (१९३०)
एव्हरेस्टरवर सर्व प्रथम पाऊल - तेनसिंग नोर्के (१९५३)
प्राणवायुशिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट सर - फु. दोरजी (१९८४)
स्वतंत्र भारताचे भारतीय गव्हर्नर जनरल - सी. राजगोपालचारी
भारतास भेट देणारा पहिला अमेरिकन अध्यक्ष - आयसेन हॉवर
भारतास भेट देणारा पहिला रशियन पंतप्रधान - निकोलाय बुल्गानिन
भारतास भेट देणारा पहिला ब्रिटिश पंतप्रधान - हॅरॉल्ड मॅकमिलन
भारतास भेट देणारा पहिला चिनी नेता - माओत्से तुंग
भारतातील पहिले हिंदी वृत्तपत्र - उदंत मार्तंड
भारताचे पहिले संरक्षण मंत्री - एन. गोपालस्वामी अय्यंगार
भारताचे पर्यटन विकास माहामंडळ स्थापन - १ ऑक्टोंबर १९६६
पर्यटन विभागास स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा - २३ मे १९९८
ब्रिटिश हिंदुस्थानचे व्हॉईसरॉय - लॉर्ड कॅनिंग
भारताचे पहिले उपपंतप्रधान - सरदार वल्लभभाई पटेल
अँटार्टिकावर पदार्पन करणारा प्रथम भारतीय – ले. रामचरण
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले सहन्ययाधि - दॉ. नागेश सिंग
निवडणुक आयोगाचे पहिले निवडणुक आयुक्त - सुकुमार सेन
पहिला भारतीय आकाशवीर - राकेश शर्मा
नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय - रविंद्रनाथ टागोर
रिझर्व बँकेचे पहिले भारतील गव्हर्नर - चिंतामणराव देशमुख
उच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधिश - न्या. लैला शेठ
पहिली महिला सभापती - सुशिला नायर
सर्वौच्य न्यायालयाच्या महिला न्यायाधीश - मिरासाहीब फातिमाबीबी (१९८९)
पहिली महिला महापौर – अरूणा आसफअली
पहिली महिला राष्ट्रपती - प्रतिभाताई पाटील
पहिली महिला एअर व्हाईस मार्शल - पद्मा बंडोपाध्याय
आय.सी.एस. पास होणारे - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
भारताचे उपपंतप्रधान, गृहमंत्री – सरदार वल्लभभाई पटेल
स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल - लाँर्ड माउंट बॅटन
उच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश – न्या. लैला शेठ
उच्च न्यायालयाचे न्यायाधिश - शंभूनाथ पंडीत
पहिले भारतीय वैमानिक - जे.आर.डी. टाटा (१९२९)
दक्षिण ध्रुवावर जाणारा - कर्नल जे.के.बजाज (१९८९)
भारताची पहिली महिला अंतराळवीर - कल्पना चावला
पहिली भारतीय जगत विश्वसुंदरी - रीटा फारिया (१९६०)
पहिली भारतीय विश्वसुंदरी - सुश्मिता सेन
पहिली नोबेल मिळविणारी महिला - मदर तेरेसा
ऑलंपिक मध्ये पदक मिळविणारी महिला - कर्नाम महेश्वरी
एव्हरेस्टवर सर्वप्रथम पाऊल ठेवणारी - प्रा. बचेंद्री पाल
दुसरी व दोनवेळा एव्हरेस्ट पार केला - कु. संतोष यादव
पहिली भारतीय महिला राजदूत - सी.बी.मुथम्मा
पहिली महिला मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी
पहिली महिला राज्यपाल - सरोजिनी नायडू
पहिली महिला कॅबिनेट मंत्री - राजकुमारी अमृतकौर
आमसभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा - विजबालक्ष्मी पंडीत
इंग्लिश खाडी पोहून जाणारा - मिहीर सेन
इंग्लिश खाडी पोहून नाणारी - आरती सहा गुप्ता

नृत्य राज्य प्रसिध्द कलाकार्स
कथ्थक उ. प्रदेश गोपीकृष्ण, शंभू महाराज, बिरजू महाराज, सितारा देवी, महाराज कृष्ण कुमार, ॠची शर्मा, रोहीणी भाटे
ओडिसी ओरिसा गुरु केलूचरण महाराज, मधवी मुदगल, सोनल मानसिंह, संयुक्ता पाणिग्रही
कथकली केरळ कुंजु कुरुप, शांताराव, टी.टी.रामकुट्टी नायर,
कुचीपुडी सत्यनारायण शर्मा, राधा रेड्डी, रोजा रेड्डी, चिना सत्यम
मणिपुरी मणिपूर झवेरी भगीनी, रिटा देवी, उदयशंकर, सविता मेहता
मोहिनीअट्ट्नम केरळ —–
भरतनाट्यम तामिळनाडू इंद्राणी रहेमान, रुक्मिणीदेवी अरुंडेल, अलार्मेल, टी बालसरस्वती
ओट्ट्मथुल्लल केरळ

व्यंग चित्रकार - सुधीर रहेमान, रूक्मिणीदेवी अरूंडेल, अलार्मेल वली, टी बालसरस्वती.

लोकनृत्य
नृत्य राज्य नृत्य राज्य
भांगडा पंजाब रास दांडिया राजस्थान
चामर गिंदाद राजस्थान कायंगा-बाकयंगा हि.प्रदेश
वागला लाहो मेघालय बिडेसिया बिहार
चक्री जम्मू काश्मिर चिराब मिझोराम
गरबा गुजरात गिड्डा पंजाब, हरियाणा
कजरी उ. प्रदेश बिहू आसाम
पांडवंणी म. प्रदेश लोटा म. प्रदेश
नौटंकी उ. प्रदेश कोट्ट्म आंध्रप्रदेश

११ टिप्पण्या:

  1. अत्यंत महत्वाची व उत्तम माहिती.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान माहिती आहे
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. धन्यवाद सर सोप्या भाषेत माहिती असल्यामुळे धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. थोडक्यात पण मुद्देसुद माहीती आपण देणेचा चांगला प्रयत्न
    बदल काही आहेत , ते करावेत

    उत्तर द्याहटवा