Good Thoughts
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
मंगळवार, १ मे, २०१२
न्यायमंडळ
न्यायमंडळ
प्रियदर्शनी मट्टू खून प्रकरणात प्रमुख आरोपी संतोषकुमार सिंग याला दिल्ली हायकोर्टाने दिलेली फाशीची शिक्षा दिल्ली सुप्रीम कोर्टाने जन्मठेपेत परावर्तित केली.
प्रियदर्शनी मट्टू या तरूणीचा १९९६ साली दिल्लीमध्ये संतोषकुमार सिंग या आयपीएस अधिका-याच्या मुलाने बलात्कार करून खून केला होता.
सीबीआयने महाराष्ट्रात मुंबई येथे तीन कोर्ट , पुणे , अमरावती व नागपूर येथे प्रत्येकी एक कोर्ट स्थापन करण्यास मान्यता दिली.
महाराष्ट्रात नवीन २५ ग्राम न्यायालय सुरू :
सन २००९ साली महाराष्ट्रात ८ ग्राम न्यायालय सुरू करण्यात आली होती.
१) राळेगण सिध्दी, जि. अहमदनगर २) खरावली, जि. रायगड ३) सेवाग्राम , जि. वर्धा ४) उरूळी, कांचन , जि. पुणे, ५) गडचांदुर , जि. चंद्रपूर ६) निजामपूर , जि. धुळे ७) पाली, जि. रत्नागिरी ८) जव्हार, जि. ठाणे.
महाराष्ट्रात ही न्यायालय ग्राम न्यायालय कायदा २००८ नुसार स्थापन करण्यात आली.
सर्वोच्य न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला १० लाख रुपये दंड थोटावला.
विदर्भातील काँग्रेस आमदार दिलीप सानंदा यांच्या वडिला विरुध्दच्या एका फौजदारी खटल्यात पोलीस कार्यवाहीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. म्हणून हा दंड थोटावण्यात आला.
प्रसिद्ध मानवाधिकारवादी नेते डॉ. विनायक सेन यांना जन्मठेपेची शिक्षा :
रायपूर जिल्हा न्यायालयाने डॉ. विनायक सेन व माओवादी नेते पियुष गुहा व नारायण सन्याल यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली .
देशातील पहिले बाल न्यायालय दिल्ली येथे फेब्रुवारी २०११ मध्ये सुरु होईल .
बाबरी मस्जीद – रामजन्मभूमी विवाद :
या विवादाचे प्रमुख याचिका कर्ते – महंमद हाशिम अन्सारी
हिंदू महासभेतर्फे प्रमुख वकील म्हणून भाजपा नेते ऍड. रविशंकर प्रसाद यांनी काम केले.
दि. ३० सप्टेंबर २०१० रोजी अयोध्येतील २.७ एकर वादग्रस्त जागेचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने तीन भागात समान विभाजन करण्याचा निकाल दिला.
एक भाग सुन्नी वक्फ बोर्ड, एक भाग निर्मोही आखाडा, एक भाग राममल्ला मंदिरास समितीस देण्यात आला.
हा निकाल न्यायमुर्ती एस.यु.खान, न्यायमुर्ती डि.व्ही.शर्मा, न्यायमुर्ती सुधीर अगरवाल या तीन न्यायमुर्तीच्या खंडपीठाने दिला.
१९५० साली या वादग्रस्त जागेच्या मालकीबद्दल याचिका दाखल करण्यात आली होती.
हा निकाल तबद्दल ६० वर्षांनी देण्यात आला.
हा निकाल सुरुवातीला २४ सप्टेंबरला दिला जाणार होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून २८ सप्टेंबरला देण्याचे जाहीर केले. नंतर ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आला.
अयोध्या हे शहर शरयू/ घागरा या नदीच्या किनारी फैजाबाद जिल्ह्यात उत्तर प्रदेश या राज्यात आहे.
देशातील पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश – न्यायमुर्ती रेखा दोशीत . जून २०१० मध्ये पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी रेखा दोशीत यांची निवड करण्यात आली.
दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश – न्यायमुर्ती दिपक मिश्रा
राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीना राज्याचे राज्यपाल हे पद व गोपनियतेची शपथ देतात.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमुर्ती मोहित शहा यांची नियुक्ती करण्यात आली.
मोहित शहा हे मुंबई उच्च न्यायालयाचे ३८ वे मुख्य न्यायाधीश आहे.
केंद्रीय मंत्री मंडळाचे उच्च न्यायालयातील न्यायधीशांचे निवृत्तीचे वय ६२ वरून ६५ करण्याचे विधेयक मंजूर केले.
म्हणजे वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावर काम करू शकतील .
इव्हीनिंग कोर्ट देशात स्थापन करणारे पहिले राज्य गुजरात, दुसरे राज्य तामिळनाडू तर सातवे राज्य महाराष्ट्र ठरले .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा