Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

मंगळवार, १ मे, २०१२

प्रदुषण (Pollution)


प्रदुषण (Pollution)
प्रदुषण – वातावरणात होणारा नैसर्गिक आणी कृत्रिम बदलांचा खुद्द निसर्गावर होणारा परिणाम म्हणजे प्रदुषण होय. थोडक्यात ज्या घटकांनी निसर्ग व वातावरण दूषित केले जाते, त्यास प्रदुषण असे म्हणतात. पर्यावरणात निर्माण होणा-या किंवा केल्या जाणा-या अपायकारक पदार्थांना दुषितके असे म्हणतात.
काही वेळा प्रदुषण (Point Source Pollution) असे म्हटले जाते.
मोठ्या क्षेत्रातील प्रदुषणाला विस्तारीत प्रदुषण (Area Wide Pollution) असे म्हणतात.
प्रदुषन ही एक जागतिक समस्या आहे.

प्रदुषणाचे प्रकार

१. हवा प्रदूषण – (Air Pollution)

२. जल प्रदूषण – (Water Pollution)

३. ध्वनी प्रदूषण – (Sound Pollution )

१. हवा प्रदूषण ( Air pollution) –
हवा प्रदूषण

हवा प्रदूषण

सामान्यपणे हवा प्रदूषणास कारणीभूत असणारे घटक – कार्बन मोनॉक्साइड, मर्क्युरी, पाण्याची वाफ इ.

विटा भाजण्यासाठी भट्टी, मोटारीचा धूर, खत कारखाने, रासायनिक तेल शुध्दिकरण प्रकल्प इत्यादी कारखान्यांतून हवेत प्रदूषके मिसळली जातात. हायड्रोजन, क्लोरीन, प्लुओराईड हे सुध्दा हवा दुषित करतात.
भारतातील सर्वाधिक प्रदुषित शहर – कानपुर, तर सर्वात कमी प्रदुषित शहर – चेन्नई

१. कार्बन मोनॉक्साइड – या वायूची कार्बनी पदार्थाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्मिती होते. उदा – स्वयंचलित वाहनातून बाहेर पडणारा धूर, रंगहीन आणि गंधहीन असतो. रक्तातेल हिमोग्लोबीनशी तात्काल संयोग पावून रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे चक्कर येणे, तिव्र डोकेदुखी, बुध्दी भ्रम व मृत्यू होतो.

२. सूक्ष्म कण – जीवाक्ष्म इंधनाच्या ज्वलनातून कार्बनचे अतिसूक्ष्म (०.००२ हून कमी व्यासाचे) कण हवेत तरंगतात. डिझेलवर चालणारी वाहने व ट्रक्स इतर वाहनापेक्षा ३० ते १०० पट कार्बन कण सोडतात. त्यामुळे श्वसनाचे रोग, फुप्फुसाचा कर्करोग होतो.

३. ऍस्बेस्टॉस – ऍस्बेस्टॉसच्या खाणीतील कामगारांना यामुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो, सिंगभूम येथे या रोगाने अनेक लोक पिडित आहेत.

४. सिलीकॉसीस – सिलीकाचे सूक्ष्म कण फुप्फुसात साठल्याने सिलीकॉसीस हा कर्करोग होतो. खाण कामगार व काच कारखन्यातील मजूरांना या रोगाची बाधा होते.

५. सल्फरडायओक्साइड – हे गंधक व ऑक्सिजनचे संयुग आहे. हा वायू हुंगल्यावर श्वसन इंद्रियांचा दाह होतो. या वायूची पाणी, ऑक्सिजन आणि हवेतील इतर खनिज पदार्थांबरोबर प्रक्रिया होऊन गंधकयुक्त आम्ल तयार होते. गंधकयुक्त हवेत वनस्पतींची वाढ खुंटते, पोलादाची २ ते ४ पट झीज होते, इमारती व दगड झिजतात. यामुळे श्वसनाचे व फुप्फुसाचे रोग होतात.

६. नायट्रोजनची ऑक्साइड्स – स्वयंचलित वाहनांच्या इंजिनातून धूर, धूरके इत्यादी आढळते. नायट्रोजनची इतर संयुगाबरोबर प्रक्रिया होवून प्रकाशिय रासायनिक धूर, धूके(फोटो केमिकल स्मॉग) तयार होते. जेव्हा स्वयंचलित वाहनातून बाहेर पडणा-या धुरातील दोन दुषितके नायट्रोजन ऑक्साइड व हायड्रोकार्बन सूर्यप्रकाशात एकमेकांशी संयोग पावतात तेव्हा नायट्रोजन ऑक्साइड No2 व ओझोन O3 व पॅन PAN पॅराक्झिलॅसिटीक नायट्रेट हे संयुग तयार होते व पिवळसर तपकिरी रंगाचे विरळ धुक्यासारखे आवरण तयार होते यालाच प्रकाशिय रासायनिक धूर, धूके असे म्हणतात.

PAN – याचा वनस्पतीवर परिणाम होतो. झाडांची पाने पांढरट होतात वनस्पतींची वाढ खुंटते.
आम्ल पर्जन्य – सल्फर डायऑक्साइड (So2 ) व नायट्रोजनचे ऑक्साइड्स यांची वातावरणातील पाण्याशी अभिक्रिया होवून गंधक आम्ले (H2So4 ) व नायट्रिक आम्ल ( HNO3) तयार होते. (आम्लयुक्त पर्जन्याची आम्लता PH 3.0 to 5.6 ) त्याचप्रमाणे कार्बनडाय ऑक्साइड पाणयात मिसळून सौम्य कार्बनिक आम्ल तयार होते. अशा पावसाची PH 5.6 असते. आम्ल पर्जन्यामुळे जंगले उजाड होतात. Mg, ca क्षारांसारखे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषणद्रव्ये वाहून जातात. सरोवरातील जीवन नष्ट होते. ऍल्युमिनिअमची द्रवता वाढते. ऍल्युमिनिअमचा माशांच्या कल्ल्यांवर विपरित परिणाम होवून ते गुदमरून मरतात.
मथुरेच्या तेल शुध्दीकरण प्रकल्पामुळे ताजमहलचे संगमरवर पिवळे पडत चालले आहे.
हरितगृह परिणाम (ग्रीन हाऊस इफेक्ट) – जमिन व पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात ज्यामुळे वाढ होते त्याला हरितगृह परिणाम असे म्हणतात. कार्बनडायऑक्साइडमुळे उष्णता शोष्ली जाऊन पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १९५८ पासून आजपर्यंत उष्णतेत ६८% वाढ झाली आहे.
हरितगृह वायूंचा गट – कार्बन डायऑक्साइड, क्लोरो फ्ल्युरोकार्बन ( CFC ) नायट्रोजन ऑक्साइड, मिथेन, हायड्रोक्लोरोफ्लोरो कार्बन, ओझोन. इ.
स्मॉग- शहरातील हवा प्रदुषण ( Smog) प्रकारचे असते. हे घातक रासायनिक धुलीकणांनी बनलेले असते.

१९५२ मध्ये लंडनमध्ये धूर व धूरके यांचा संयोग होऊन (स्मॉग) निर्माण झाले. त्यात कार्बनचे कण व सल्फर डायऑक्साइड यांचा धुक्यातील पाण्याच्या कणांशी संयोग होऊन गंधकाम्लाचे थेंब तयार झाले. कार्बनच्या कणांबरोबर ते श्वासाबरोबर फुप्फुसात जाऊन अनेक लोक मृत्यूमुखी पडले.

D.D. D. फवा-याने त्याचे मातीत विघटन न होता १५ वर्षे ते तसेच राहते त्यामुळे उपयुक्त जीवाणूचा नाश होतो. पक्षांच्या पुररूत्पादनावर परिणाम होतो. अंडी ठिसूळ होतात.
भोपाळ दुर्घटना – युनियन कार्बाईड या कंपनीत ३ डिसे. १९८४ ला मिथिल आयसोसायनेट ( MIC ) ची गळती होऊन ३२०० लोकांचा मृत्यू झाला . अनेक लोक विकलांग झाले
ऍस्बेस्टॉस व सिमेंट कारखान्यात काम करणा-यांना अस्थमा होण्याचे प्रमाण जास्त असते.
हवा प्रदूषणाने मानसिक दौर्बल्य, निरूत्साह, मरगळणे, रक्तपेशीवर विपरीत परिणाम या समस्या उदभवतात.
अणु स्फोटामुळे हवेत किरणोत्सारी धूळींचे प्रदूषण होते.
चर्नोबिल दुर्घटना – (युक्रेन) २६ एप्रिल १९८६ यातील किरणोत्सर्जन युरोपपर्यंत झाले होते. त्यात ३१ जणांचा मृत्यू झाला.
आगपेट्यांच्या कारखान्यात काम करणा-या कामगारांना फॉसिजा (हनुवटी वकडी होणे ) हा रोग होतो.
प्लूटोनियम २३९ – २ लाख वर्ष्यापर्यंत किरणोत्सर्जन करतो.
ओझोन- आढळ – वातावरणाच्या स्थितांबर थरात समुद्रसपाटीपासून १६ ते २३ कि. मी. दरम्यान आढळतो.
सूर्यापासून निघालेले अल्ट्राव्हायलेट किरणे शोषली जाऊन पृथ्वीला वाचविण्याच्या कार्यामुळे ओझोन वायूच्या थरास पृथ्वीचे संरक्षण कवच असे म्हणतात.
ओझोनच्या श्वसनाने छाती दुखी, खोकला, घशाचा दाह, श्वास कोंडणे, डोळे जळजळ , सर्दी, न्युमोनिया, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इ. परिणाम होतात.

ओझोनचा क्षय –

१. क्लोरो फ्युरो कार्बन (CFC)

२. हॅलोजन

३. नायट्रोजन ऑक्साइड

१९३० मध्ये शास्त्रज्ञांनी नायट्रोजन ऑक्साइडप्रमाणे क्लोरीन अणुमुळे ओझोनचा क्षय होतो हे सिध्द केले.

क्लोरो-फ्युरो कार्बन संयुगे वातानुकुलीत यंत्रणेत द्रव्य स्वरूपात, उत्साहवर्धक फवा-यात, कॉस्मेटिक मध्ये औद्योगिक द्रावण म्हणून वापरतात. CFC चा एक अणू १ लाख ओझोन कण नष्ट करतो. ओझोनचा थर नष्ट झाल्याने पृथ्वीवर येणा-या अतिनिल किरणांचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास त्वचेचे कर्करोग, पिकांचे नुकसान, ऑक्सिजन चक्रात व्यत्यय, हवामानात विकृत बदल इ. दुष्परिणाम होतात.

ओझोन विवर – १०८२ साली अंटार्टिका खंडावर ओझोन थरास मोठे भगदाड पडल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. १९८७ च्या मॅट्रिअल कराराने व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोनचा –हास थांबविण्याचे कार्य सुरू झाले आहे.
हवा प्रदूषण ओळखण्यासाठी वापरतात – लायकेन (दगडफुल)
जल प्रदूषन ओळखण्यासाठी वापरतात – जलकुंभी
अतिजास्त प्रदूषण क्षमता असणारे वायू – NO2, CO2, SO2

२)जल प्रदूषण (Water Pollution) –

जल प्रदूषण

जल प्रदूषण

जल प्रदूषण हे हवेतील प्रदूषणाइतकीच गंभीर समस्या आहे.

जल प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक – नायट्रोजन, फॉस्फरस, पारा, आर्सेनिक, शिसे, झिंस, ऍल्युमिनिअम इ. रासायनिक पदार्थ कारखान्याच्या सांडपाण्यातून नैसर्गिक जलाशयात सोडले जातात.
जहाजांमुळे नद्यात व समुद्रात डिझेल, वंगण सांडते किंवा जहाजांना अपघात होऊन पाण्यावर कित्येक मैल तेलाचा तवंग पसरतो. त्यामुळे त्या पाण्यातील जलचरांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होतो व परिणामी ते मरतात.
काही कारखान्यातून उष्ण पाणी जलाशयात सोडले जाते त्यामुळेही प्रदूषण होते.
शहरातील जलाशयांत मोठ्या प्रमाणावर मलमूत्रांचे सांडपाणी सोडले जाते.
खतांचा अतिप्रमाणात वापर केल्याने भूगर्भातील पाणी दुषीत होते.
डिटर्जंट मधील अनेक घटक पाण्यात मिसळत नाही त्यामुळे जल जलप्रदुषण होत.
जमिनीत खड्डे खोदुन त्यात दूषित पाणी सोडल्याने हळह्ळू आजुबाजुची सर्व जमिन नापिक होते.
जहांजांना असलेल्या रंगामुळेही पाणी प्रदुषण होते.
पाण्यात प्रति लिटर ०.१ मिलीग्राम एवढ्या प्रमाणात जरी तांब्याचे प्रमाण वाढले असले तरी पाणी विषारी होते.
फोटोग्राफी, चिनी मातीची भांडी, चिनी मातीच्या अन्य उपयोगी वस्तु बनवणा-या कारखाण्यात कॅडिमियमचा वापर केला असतो. कॅडिमियम मिश्रीत पाणी अत्यंत विषारी असते.
शिसे मिसळलेले पाणी प्यायल्याने मळमळणे, भुक मीदावणे, डोके जड होणे इत्यादी प्रकार उदभवतात.
पारा पाण्याद्वारे पोटात गेल्याने कर्करोग होतो.
दुषित पाण्यामुळे पटकी व काविळ यांसारखे रोग होतात.
पाण्यात ३mg पेक्षा टाकावू पदार्थ असल्यास पाणी प्रदूषित मानले जाते. -WHO -नायट्रेट 45 gngपेक्षा कमी असावे.
दर लिटर पाण्यासाठी आवश्यक ऑक्सीजनचे प्रमाण -4 mg.
फॉस्फोरस व नायट्रेत पाण्यात सतत सोडल्याने सरोवरातील प्राणी जीवन नष्ट होते. उदा –अमेरीकेतील एरि सरोवर
१९५० मधील मिनिमाटा उपसागरात मिथाईल कर्क्युरीचे प्रदूषण झाल्याने जीभ, ओठ बधिर होंणे, स्नायुंवर ताबा सुटणे इ. दूष्परीणाम दिसुन येतात.
शैवालाची बहूपोषणाची समस्या वाहत्या पाण्याशी संबधीत नसून फक्त तलाव सरोवर अशा स्थिर जलाशी संबधीत आहे. जल प्रदूषणात आघाडीवर असणारे शहर – कोल्हापूर, कानपूर
ग्रीन पोल्युशन – पाण्यातील शेवाळाची वाढ होते.
बॉयोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD);- मध्ये पाण्यात जैव –हास योग्य सेंद्रीय द्रव किती आहे त्यावरुन पाण्याची शुध्दता कळते यानुसार १) उत्तम पाणी – १ ते २ मिलिग्राम / लिटर २) मध्यम पाणी – ३ ते५ मिली लिटर ३) साधारण प्रदुषित पाणी – ६ते ९ मिलीग्राम /लिटर ४) खुप प्रदूषित पाणी – १० पेक्षा जास्त मिलीग्राम लिटर् पेक्षा जास्त.

ध्वनी प्रदूषण :-

ध्वनी प्रदुषण

ध्वनी प्रदुषण


आवाजाची तीव्रता ठराविक मर्यादे पलिकडे गेली म्हणजे तो आवाज नकोसा होतो त्यालाच ध्वनी प्रदूषण असे म्हणतात. ध्वनी प्रदूषण ही पूर्णपणे मानव निर्मीतीस समस्या आहे.
ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी अलेक्झांडर बेल यांच्या स्मृती प्रित्यर्थ डेसिबल हे युनिट प्रचलित आहे.
केवळ एकू येण्याजोग्या कमीत कमी आवाज म्हणजे( नाडीचे ठोके) १० डेसिबल असे गृहीत धरुन त्या नुसार आवाजाची तीव्रता ठरविली जाते.
साधारणपणे ५० ते ६० डेसिबल पर्यंतचा आवाज हा सुसह्य असतो. ८० डेसिबल नंतरचा आवाज मानवास असह्य होत जातो तर १२० डेसिबल नंतरचा आवाज शरीरास हानीकारक ठरतो.

शहरी भागात लोकांचा गोंगाट वाहनाचा आवाज, कारखान्यांचा आवाज ह्यामुळे ध्वनीची तीव्रता ८० ते ८५ डेसिबल इतकी नेहमीच असते.

साधारण माणूस १०५ डेसीबल ध्वनी १ तासापेक्षा जास्त एकू शकत नाही.

सामान्य संभाषण

कारखाना

जेट विमान

ग्रंथालय

निरव शांतता
६० डेसिबल

८५ डेसिबल

१४० ते १४५

४० डेसिबल

२० डेसिबल
रेडिओ

मोटार गाड्या

डेसि. मोटार सायकल

ट्र्क, ट्रॅक्टर
६० डेसिबल

७५ डेसिबल

८० ते ८५ डेसि.

८० डेसिबल

दुष्परिणाम – रक्तदाब वाढ, ऍसिडीटी (आम्लपित्त), भय, चिडचिडेपणा, डोके जड होणे, ह्रदयाचे ठोके वाढणे, गर्भावर परिणाम, रक्तपेशीवर आघात होणे इ.
मुंबईत ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी १९८५ साली एक समिती नेमली गेली.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वात स्वस्त आणि जास्त योग्य उपाय – लोकांमध्ये प्रदुषणाविरोधी जागृती निर्माण करणे.
प्रदूषण होणार नाही किंवा पर्यावरणाबरोबर अनुकूल उत्पादनांवर लावले जाणारे लेबल – इको मार्क (१९९१ पासून )

पर्यावरण प्रदूषण नियंत्रण
पर्यावरण प्रदूषण नियंत्रण

पर्यावरण प्रदूषण नियंत्रण

संपूर्ण भारतात शिसे विरहीत पेट्रोल विकण्यास सुरूवात – १ फेब्रु, २०००
०.२५% सल्फरयुक्त पेट्रोल मिळण्यास सुरूवात – जाने २०००
पेट्रोल व डिझेलवर चालणा-या सर्व चारचाकी वाहनांना १ जून १९९९ च्या युरो – १ उत्सर्जन मानक च्या समक्षक / समायुक्त लागू केलेले नियम, इंडिया स्ट्रेज – १ सर्व भारतात लागू – १ एप्रिल २०००
युरो – २ चे समतुल्य मानक भारत स्ट्रेज -२ भारतात लागू – १ एप्रिल २००५
युरो -३ ची सुसंगत निकष चार चाकी गाड्यांबाबत भारत स्ट्रेज -३ ११ शहरात लागू -१ एप्रिल २००५
चार महानगरात शिसे विरहित पेट्रोल मिळते – १ एप्रिल १९९५
दिल्लीत २ T ऑइल बंदी – ३१ डिसे. १९९८
दिल्लीत शिसेरहित पेट्रोल सुरू – १ सप्टेंबर १९९८, संपूर्ण भारतभर सुरू – १ फेब्रु २०००
मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणारे उद्योगांची यादी – १७
केंद्रीय प्रदूषण बोर्ड व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डानुसार महाराष्ट्रातील गंभीर प्रदूषणाचे ठिकाण – चेंबूर
धोकादायक टाकाऊ पदार्थ (रसायने इ. ) संबंधी संयुक्त राष्ट्राची पर्यावरण संरक्षण करार – बासेल (स्वित्झरलँड) सन १९८९, सदस्य देश – भारतासह १२६ देश
धोकादायक टाकाऊ पदार्थ उत्पादन किंवा साठवण किंवा आयात संबंधी नियम (१९८९) त्यामध्ये सुधारणा – १९९४ तसेच त्याच्या अधिसुचना – २० जाने २००० पासून अंमलबजावणी सुरू.
राष्ट्रीय पडिक जमिन महामंडळ – १९८५
PVC चा शोध लावणारी जगातील सर्वात मोठी किटकनाशक उत्पादक कंपनी – मोन्सेटो
केंद्रीय गंगा शुध्दीकरण प्रकल्प – पहिला टप्पा – १९८५ ते ३१ मार्च २०००
राष्ट्रीय तलाव संरक्षण योजनेअंतर्गत तीन तलावांचे प्रस्ताव स्विकारले आहेत.

१. पवई (महाराष्ट्र)

२. उटी

३. कोडाईकॅनॉल

४. ग्रीन हाऊस गॅस कमीत कमी करून १९९० च्या पातळीत आणण्याचे उदिष्ट २००८ ते २०१२ पर्यंत गाठणे

क्योटो प्रोटोकॉल करार – १९९७, जपान

क्योटो प्रोटोकॉल कराराची अंमलबजावणी सुरू झाली – १६ फेब्रु २००५.
डिसेंबर २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाने क्योटो करारावर सही केल्याने हा करार मान्य करणा-या देशाची संख्या झाली – १७६
जी. बी. पंत हिमालय पर्यावरण व विकास संस्था – अल्मोडा १९८८ (उत्तरांचल)
राष्ट्रीय वनरोपन आणि परिस्थिती विकास बोर्डाची स्थापना – १९९२
इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार – १९८६
१ लाखाचा इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार – १९८७
ओझोन नष्ट करणा-या पदार्थावर नियंत्रण करण्यासाठी हिवेन्ना विएन्ना करार – १९८५
केंद्रीय मृदा संरक्षण बोर्ड – १९६२
D.D.T च्या वापरावर निर्बंध घालण्यात आले. – २६ मे १९८९
संयुक्त राष्ट्रसंघाची मानवी पर्यावरणविषयक पहिली परिषद – स्टॉकहोम (स्विडन) (१९७२)
नॅशनल इको. डेव्हलपमेंट बोर्ड – १९८१
प्रदूषणविषयक बाबींची दखल घेते- केंद्रीय जल प्रदूषण प्रतिबंधक व नियंत्रण बोर्ड
महाराष्ट्र पर्यावरण विकास संचनालय – १९६६
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ – ऑक्टोबर (१९६६)
भारतीय पर्यावरण खाते – १ नोव्हे. १९८०
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाची स्थापना – १९७४
पर्यावरण व वन मंत्रालय – ४ जाने. १९८५ हे मंत्रालय पुढील कायदे राबविते
वन्यजीव संरक्षण कायदा – १९७२
केंद्रीय जलप्रदूषण नियंत्रण कायदा – १९७४ (The Water Prevention & Control Of Pollution )
द वॉटर सेस ऍक्ट – १९७७
जंगले संवर्धन कायदा – १९८१
वायू प्रदूषण नियंत्रण कायदा – १९८१ सुधारीत – १९८७ – The air pollution & control of pollution act.
पर्यावरण संरक्षण कायदा – १९ ऑक्टो. १९८६ नोव्हे.
धोकादायक टाकाऊ पदार्थ विल्हेवाट कायदा – १९८९
The public Liability Act – 1991
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था – NEERI नागपूर
राष्ट्रीय पर्यावरण धोरण – २००६
महाराष्ट्र – महाराष्ट्राचे प्रदूषण नियंत्रण आणि संरक्षण यासाठी नियंत्रण मंडळ – १९७०
१९९२ ला पहिली वसुंधरा परिषद भरविण्यात आली. – रिओ दी जानिरो ( ब्राझिल) (विषय अजेंडा २१)
२००२ मध्ये वसुंधरा परिषद – जोहान्सबर्ग ( द. आफ्रिका )
परिषदेचे बोधवाक्य – वर्ल्ड समेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (WSSD)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा