Answer Sheet
1) टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे?
न्या. बच्छावत आयोग
न्या. राम प्रधान समिती
न्या. श्रीकृष्ण समिती
न्या. शिवराज पाटील
2) हे आंब्याचे झाड आहे. [सर्वनामाचा प्रकार ओळखा]
पुरूषवाचक सर्वनाम
दर्शक सर्वनाम
संबंधी
सामान्य सर्वनाम
3)एका सांकेत भाषेत CAT=BZS तर RAT = ?
QZS
ZST
TSZ
ZTS
4) दोघा भावांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे, त्यातील एक भाऊ दुसर्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, तर या मोठ्या भावाचे वय किती असेल?
10
15
20
25
5) धातूसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते.
सहाय्यक क्रियापद
संयुक्त क्रियापद
साधित क्रियापद
सकर्मक क्रियापद
6) 225 चे वर्गमूळ किती?
25
35
15
20
7)सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह कोणता?
मंगळ
शनि
पृथ्वी
गुरू
8)पं. भीमसेन जोशी यांना कोणत्या वर्षी भारतरत्न हा पुरस्कार मिळाला?
2006
2007
2008
2009
9) महाराष्ट्रातील विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती?
545
78
288
250
10) 16 10 5 - 3 = ?
32
34
29
40
11) 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?
PICEP
CEPRJ
PIRCE
PRICE
12)भारतातील सर्वांत दक्षिणेकडील ठिकाण / टोक कोणते?
इंदिरा पॉंईट
कन्याकुमारी
रामेश्वरम
त्रिवेंद्रम
13) .......... धाव कुंपणापर्यंत.
वाघाची
मांजरीची
कुत्र्याची
सरड्याची
14) सतीशचे पंधरा वर्षापूर्वी वय तीस होते, तर तो किती वर्षांनी साठ वर्षांचा होईल?
10
15
25
30
15)1, 9, 25, 49, 81, 121, ........, 225, 289 यातील रिकाम्या जागी कोणती संख्या येईल?
172
169
168
171
16)GI_T, WI_E, KNI_E, _ACE. पुढील चारही शब्दातील रिकाम्या जागी एक अक्षर लिहिल्याने सर्व शब्द अर्थपूर्ण होणार आहेत हे अक्षर कोणते?
N
F
G
R
17) ट्रॅफिक पोलिस अतिवेगाने जाणार्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात?
स्पीड मीटर
स्पीड अॅनालायझर
स्पीड अॅपरेटस्
स्पीड गन
18)आंबेमोहर कोणत्या पिकाची जात आहे?
भात
ज्वारी
आंबा
बाजरी
19) सीता गीतापेक्षा तीन दिवसांनी लहान आहे आणि सीताचा जन्म शनिवारी झाला असल्यास गीताचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?
मंगळवार
बुधवार
सोमवार
रविवार
20) 31 ते 40 पर्यंत येणार्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणार्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
5
10
20
15
21)महाराष्ट्रात ताडोबा व्याघ्रप्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
चंद्रपूर
ठाणे
अमरावती
गडचिरोली
22) 30 आणि 45 यांचा लसावि किती?
15
60
1350
90
23)खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
शिवकुमार शर्मा - संतूर
हरिप्रसाद चौरसिया - बासरी
झाकीर हुसेन - सितार
बिसमिल्ला खान - शेहनाई
24)हरी गोविंदापेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे. हरीचा जन्म 27 फेब्रुवारी 2005 रोजी झाल्यास गोविंदाचा जन्म खालीलपैकी कोणत्या तारखेस झाला आहे?
29
31
24
25
25) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
ठाणे
रायगड
अमरावती
सातारा
Good Thoughts
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
बुधवार, २ मे, २०१२
कृषी
कृषी
सन २००९ -१० साली देशात सर्वाधिक आंबा उत्पादन उत्तर प्रदेशात झाले.
आंध्र प्रदेश दुस-या क्रमांकावर तर कर्नाटक तिस-या क्रमांकावर तर महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर राहिले.
केंद्र सरकारने सन २०१० -११ या सालासाठी जाहीर केलेल्या आधारभूत
किंमती :
गहू – प्रति क्विंटल – ११२० रूपये
मसूर दाळ – प्रति द्विंटल – २२५० रुपये
चनादाळ / हरबरादाळ – प्रति क्विंटल – २१०० रूपये
कापूस प्रति क्विंटल – ३००० रूपये
देशात सर्वाधिक टोमॅटो उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते.
मोसंबी पिकावर महाराष्ट्रात हायटोकथोरा हा रोग २०१० मध्ये पडला होता.
नारळ विकास बोर्ड – कोचीन ( केरळ ) येथे आहे.
कोकण कृषी विद्यापीठाने नारळ बागायत दारासाठी ट्रॅक्टर माउंटेड कोकोनट क्लाइंबरची निर्माती केली.
याच्या माध्यमातून झाडावरून नारळ काढणे सोयीचे होईल .
देशातील दुसरी सर्वात मोठी गुळाची बाजार पेठ– अंक पाले ( आंध्रप्रदेश ) येथे आहे.
महाराष्ट्र येथे देशातील सर्वात मोठी गुळाची बाजार पेठ आहे.
सन २००९ -१० साली देशात सर्वात जास्त उसाचे उत्पादन उत्तर प्रदेशात झाले. व दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा तर तिसरा क्रमांक तामिळनाडूचा लागतो.
सुवर्ण सब – १ ही भाताची संकरित जात महापुराच्या परिस्थितीतही टिकाव धरू शकते.
ही तांदूळाची नवीन जात भारतीय भात संशोधन संस्थेने विकसित केली आहे.
सन २००९ -१० यापूर्षी महाराष्ट्रात सरासरी साखर उतारा १०.५ टक्के मिळाला होता.
सन २००९-१० साली देशात सर्वाधिक गहु उत्पादन उत्तर प्रदेशात झाले. दुसरा क्रमांक पंजाबचा तर तिसरा हरियाणाचा व आठवा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो .
सन २०१० – ११ या साली महाराष्ट्र राज्य कापूस फणन आणि उत्पादक महासंघाच्या स्थापनेस २५ वर्ष ( रौप्य महोत्सवी वर्ष ) पुर्ण झाली.
महाराष्ट्र कापूस उत्पादन :
महाराष्ट्राच्या एकूण शेती क्षेत्रापैकी सर्वाधिक क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे.
देशाच्या एकूण कापूस उत्पादनापैकी २५ टक्के उत्पादन होते.
कापूस पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने कापूस एकाधिकार योजना सुरू केली.
सन २००९ -१० साली देशात सर्वाधिक दुध उत्पादन उत्तर प्रदेशात झाले.
दुसरा क्रमांक आंध्र प्रदेशाचा तर महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागला.
सन २००९-१० साली देशात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात झाले.दुसरा क्रमांक कर्नाटक आणि तिसरा गुजरात लागतो.
पंजाब गहू उत्पादन :
देशातील एकूण गहू उत्पादनापैकी सुमारे २५ टक्के गहू उत्पादन या राज्यात घेतले जाते.
देशाच्या एकूण तांदूळ उत्पादनापैकी १५ टक्के तांदूळ उत्पादन या राज्यात घेतले जाते.
हेमांगी ही काकडाची तर प्राची ही घेवडा या भाजीपाला पिकाची संकरित जात आहे.
स्ट्रॉबेरी या पिकाला ब्रँड नेम मिळाले
महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असे ब्रँड नेम देण्यात आले.
व्रँड नेम मिळालेली इतर उत्पादने – दार्जिलिंगचा चहा ( पश्चिम बंगाल),
येवला येथील पैठणी , जि. नाशिक ( महाराष्ट्र ), पुणेरी पगडा ( महाराष्ट्र)
अपेडा म्हणजे=
ऍग्रीकल्चरल अँण्ड प्रोसेस्ड फुड प्रॉडक्टस एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऍथॉरिटी
भरताचा जगात फळे, दुध, भाजीपाला उत्पादनात प्रथम क्रमांक आहे.
भारताचा जगात गहू उत्पादनात दुसरा तर चीनचा प्रथम क्रमांक लागतो .
चहा उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक आहे.
काजु उत्पादनात केरळचा प्रथम क्रमांक आहे.
काजू, चहा, – भारत प्रथम ( PSI पूर्व २२/०९/२००८)
कॉफी = प्रथम = ब्राझील , ६ वा = भारत
तांदूळ : पहिला = चीन , दुसरा = भारत
भारत उत्पादन राज्य :
१)गहू : उत्तरप्रदेश = प्रथम , दर हेक्टरी = पंजाब
२) तांदूळ = पश्चिमबंगाल = प्रथम, दरहेक्टरी = पंजाब
३) भुईमूग = गुजरात = प्रथम
कापूस = गुजरात
नारळ = प्रथम = भारत ( जगात)
द्राक्ष उत्पादन
महाराष्ट्रात सर्वात जास्त द्राक्ष उत्पादन नाशिक या जिल्ह्यात होते.
याशिवाय सांगली, सोलापूर ,पुणे , उस्मानाबाद, लातूर इत्यादी जिल्ह्यात द्राक्ष उत्पादन होते.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी कोकणामध्ये विजय बंधारे बांधले आहेत.
विजय बंधारा हा दगडधोंडे आणि प्लॅस्टीकचे अवरण यापासून बांधला जातो.
कोकण कृषी विद्यापीठाच्या या विजय बंधा-याची संकल्पना केनिया देशाने स्वीकारलेली आहे.
कच्ची केळी, आंबे पिकविण्यासाठी कॅलशियम काबाईट या रासायनाचा वापर केला जातो.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, जि. अहमदनगर यांनी हरभरा या पिकाच्या फुले जी- ५ , फुले जी- १२ विजय , विशाल, विराट, विहार, दिग्विजय या जाती विकसित केल्या.
भारतीय कृषी संशोधन संस्थेचे महासंचालक – डॉ. एस. अय्यपन हे आहेत.
फुले ०२६५ ही ऊसाची संकरीत जात आहे.
मिडो ऑर्चर्ड ही तंत्रज्ञान पध्दती पेरू झाडाच्या लागवडीसाठी वापरली जाते
पेरुच्या संकरित जाती – सरदार , ललित , अलाहाबाद, सफेदा इत्यादी.
केंद्रीय समशीतोषण कटिबंधीय फळ संशोधन संस्था – लखनौ ( उत्तर प्रदेश).
भारतातील सर्वात प्रमुख पीक – भात.
देशाच्या एकूण कृषी उत्पादनापैकी ६५ टक्के उत्पादन भारताचे होते.
भारतात ४५ दशलक्ष हेक्टरहून अधिक जमीन भात शेती खाली आहे.
शेतक-यांसाठी ग्रीन एफएग ९०.४ हे आकाशवाणी केंद्र सुरु करण्यात आले.
कापसावर मावा, तुडतुडे , पांढरी माशी , फुलकिडे,पिट्या ठेकून , हिरवी उंट आळी, पाने गुंडाळणारी आळी इत्यादी रोग पडतात.
कापूस , सोयाबीन , मुग , उडीद इत्यादी पिकांसाठी पिक विमा योजना लागू आहे.
पश्चिम बंगालमध्ये देशात सर्वात जास्त बटाटा उत्पादन घेतले जाते.
देशात सर्वात जास्त फळबागाखालील क्षेत्र महाराष्ट्रात आहे.
नाशिकचे द्राक्षे , नागपूरची संत्री, सांगोल्याचे डाळिंब प्रसिध्द आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त आंबा पीका खालील क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे. तर दुसरा क्रमांक सिंधूदूर्गाचा लागतो.
महाराष्ट्रात काजू पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक सिंधूदुर्ग जिल्ह्यात आहे.
संत्री या फळपिकावर डिंक्या हा रोग पडतो.
गिरीराज व कलींगा ब्राऊन या कोंबड्यांच्या संकरित जाती आहेत.
देशातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ – सांगली.
मध्यवर्ती उस संशोधन केंद्र पाडेगांव यांनी को.एम. ०२६५ हि उसाची संकरीत जात निर्माण केली आहे.
कृषी पर्यटनाचे जनक पांडूरंग तावरे यांना म्हटले जाते.
भारतातील वाईन निर्मितीचे जनक शामराव चौगुले यांना म्हटले जाते.
भारतात सर्वाधिक पॉली हाऊस ( ग्रीन हाऊस ) चा वापर करणारे राज्य – महाराष्ट्र
ऑपरेशन फ्लड/ श्वेतक्रांती धवलक्रांती ही दुध उत्पादनाशी संबंधित आहे.
श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरीयन हे आहेत.
भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.
रत्ना ही संकरित आंबा जात हापूस व निलम या दोन जातीच्या संकरातून तयार करण्यात आली.
नाफेड (NAFAD) : नॅशनल ऍग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. नाफेडचे अध्यक्ष : श्री. संजीव चोपडा .
देशातून कृषी मालाची निर्यात करण्याचे व्यवस्थापन पाहते.
भारतातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ : लासलगाव जि. नाशिक.
भारतातील उत्पादनानुसार पीक ,क्रमांक – तांदुळ , गहू, मका.
सेंट्रल इन्स्टिट्युट फॉर कॉटन रिसर्च – नागपूर
नॅशनल रिसर्च सेटर फॉर प्लान्ट बायोटेक्नॉलॉजी – नवी दिल्ली
चलन
चलन
१ रुपयाच्या नोटा नाणे त्या पेक्षा कमी मुल्याची नाणे छापण्याचे व उत्तरदायित्व भारतीय अर्थ खात्याचे आहे.
१ रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव केंद्रीय अर्थ खाते यांची सही असते.
२ रुपये व त्यापेक्षा किंमतीच्या नोटा छापण्याचा अधिकार RBI चा आहे.
१ रुपयाच्या नाण्यासाठी शुध्द निकेल हा धातु वापरला जातो.
भारत सरकारच्या चार टाकसाळ आहेत. १) मुंबई (१८३०) २) कोलकाता (१९३०) ३) हैद्राबाद (१९५०) ४) नोएडा (१९८९)
टाकसाळ हे नाने निर्मिती व सोने- चांदीची पारख करण्याचे काम करतात.
RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते.
छापकारखाने
१. करंन्सी नोट प्रेस, नाशिक – या प्रेस मध्ये ५, १०, ५०, १०० ,५०० व १००० च्या मूल्याच्या नोटा छापल्या जातात.
२. बँक नोट प्रेस, देवास ( म. प्रदेश) – या प्रेसमध्ये दोन विभाग आहेत. १) प्रिटिंग प्रेस २) शाई बनविण्याची फॅक्टरी
येथे २०, ५०, १००, ५०० च्या किंमतीच्या नोटा छापल्या जातात.
शाल्विनी (प. बंगाल) आणि म्हैसूर मध्ये RBI नोट मुद्रण ( प्रा. लि.) मध्ये RBI च्या नियंत्रणात करंन्सी नोटा छापल्या जातात.
१) इंडिया सिक्यूरिटी प्रेस, नाशिक – यामध्ये दोन विभाग आहेत १) स्टॅम्प प्रेस २) सेंट्रल स्टॅप डेपो. स्टॅप प्रेसमध्ये पोस्टाची सामुग्री, पोस्टाची व इतर तिकिटे, ज्युडिशिअल आणि नॉन ज्युडिशिअल स्टॅप RBI / SBI चे चेक, बाँन्ड, राष्ट्रीय बचत पत्र, इंदिरा विकास पत्र, किसन विकास पत्र, पोस्टल ऑर्डर, पासपोर्ट, प्रॉमिसरी नोट्स, केंद्र सरकार व राज्य सरकारांची प्रतिभूती छापले जाते.
२) सिक्यूरिटीज प्रिंटिंग प्रेस हैद्राबाद – दक्षिणात्य राज्यांसाठी पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, लिफाफे, संपुर्ण देशासाठी केंद्रीय राजस्व स्टॅम्प छापले जातात.( केंद्रीय उत्पादन कराचे तिकीट)
नाशिकच्या प्रेसला मदत म्हणून नॉन ज्युडिशियल स्टॅप छापले जातात. ५) सिक्यूरीटीज पेपर मिल, हौशिंगाबाद ६) (म. प्रदेश) – येथे करंसी ( चलन ) आणि बँक नोटांचा कागद तसेच इतर सिक्यूरीटीजचा कागद बनविला जातो.
भारताची नवी आधुनिक टाकसाळ चेरापल्लीला आहे.
गांधीजींच्या चित्राच्या नोटा प्रसिध्द – १९६९,१९८७
नेहरुंचे चित्र चलनी नाण्यावर सर्वप्रथम – १९६४,१९८८
आंबेडकरांचे चित्र असणारे नाणे – १९९१
इंदिरा गांधींचे चित्र असणारे नाणे-१९९२
राजीव गांधीचे चित्र असणारे नाणे-१९९२
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सागर सम्राटच्या ( समुद्रात खनिज तेलासाठी विहीरी खोदणारे जहाज १९ फेब्रुवारी १९७४ कार्यास सुरुवात) अभूतपुर्व कामगिरीचा गौरव म्हणून १ रु. च्या व नवीन १००० रु. च्या नोटेवर सागर सम्राटाची प्रतिकृती छापली आहे.
१००० रु. च्या नोटा २२ वर्षानंतर चलनात आल्या. – ९ ऑक्टोबर २०००
पैसा म्हणजे कोणतीही वस्तु की जिच्याद्वारे सर्व व्यवहारांची पुर्तता करण्यासाठी देणे (ऋण देण्यासाठी) देण्याचे साधन म्हणून जी वस्तू स्विकारली जाते तिला पैसा म्हणतात. अनेक स्थळी अनेक वेळी वेगवेगळ्या वस्तू पैसा म्हणून वापरल्या गेल्या आहेत. उदा –धान्य, जनावरे, धातू, धातूचे नाणे, कागदी नोटा इ. वापरल्या गेल्या. भारतात सध्या पैशामध्ये नाणी, कागदी चलन व व्यापारी बँकांच्या चालू ठेवींचा समावेश होतो.
पैशाच्या पुरवठ्याचे मोजमाप –
१९६७-६८ पर्यंत पैशाच्या पुरवठ्याची एकच एक संकल्पना प्रसिध्दी केली. त्या संकल्पनेला M असे म्हटले गेले. या पैशाच्या पुरवठ्यात (M मध्ये ) लोकांच्या जवळील चलन आणि लोकांच्या व्यापारी बँकातील चालू ठेवी यांचा समावेश केला. या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेला संकुचित संकल्पना असे म्हटले गेले.
१९६७-६८ नंतर मात्र RBI ने पैशाच्या संकुचित संकल्पनेशिवाय पैशाच्या पुरवठ्याची व्यापक संकल्पना प्रसिध्द केली. त्या संकल्पनेला समग्र मौद्रीक संसाधने (M3) असे म्हटले जाते.
मौद्रीक संसाधनामध्ये संकुचित मोजलेला पैसा / संकुचित व्याख्या केलेला पैसा ( म्हणजे चलन आणि चालू ठेवी ) आणि लोकांच्या अधिक व्यापारी बँकांच्या मुदत ठेवी यांचा समावेश समग्र मौद्रीक संसाधने यांच्या मध्ये केला जातो. समग्र मौद्रीक संसाधनाला असे M3 म्हटले आहे.
एप्रिल १९७७ पासून RBI पैशाच्या चार पर्यायी संकल्पनेवर आकडेवारी प्रसिध्द करत आहे. ह्या नवीन संकल्पना M1, M2, M3 आणि M4 असे म्हणटले जाते.
M1 - लोकांकडे असलेले चलन म्हणजे नोटा आणि नाणी, बँकामधील मागणी ठेवी तसेच आरबीआय जवळील इतर ठेवी.
M2- M1 + लोकांनी पोस्टात ठेवलेल्या बचत ठेवी
M - M1 + बँकातील निव्वळ मुदत ठेवी
M4- M3 + लोकांच्या पोस्ट खात्यात ठेवलेल्या वेगवेगळ्या मुदतीच्या ( बचत ठेवी व्यतिरिक्त) ठेवी ( पोस्ट ऑफीस बचत संघटने जवळील बचत यात राष्ट्रीय बचत पत्राचा समावेश नाही.)
M1 ला संकुचित तर पैसा तर M3 ला व्यापक पैसा संकल्पना म्हणतात. तर M4 हे मुद्रा पुरवण्याचे सर्वात विस्तृत माप आहे. परंतु ते रद्द करण्यात आले आहे
चलन वाढ -
पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली पण त्याच वेळी पैशाच्या मागणीत वाढ न झाल्यामुळे जर प्रचंड भाववाढ झाली तर त्याला चलन वाढ असे म्हणतात.
क्राउथर – ज्या स्थितीत पैशाचे मूल्य घटत जाते. किंमती वाढत असतात. ती स्थिती म्हणजे भाववाढ होय.पैशाचे मूल्य म्हणजे पैसा आपण दुस-याला दिला असता त्याच्या मोबदल्यात आपल्याला जेवढ्या वस्तू मिळतील तेवढ्या वस्तू म्हणजे त्या पैशाचे मूल्य होय. पैशाचे मूल्य म्हणजे पैशाची खरेदी शक्ती (Purchasing Power) होय.
चलन वाढीची कारणे ;-
१) कागदी चलन वाढ (M1 मध्ये वाढ) झाल्यामुळे जी चलनवाढ घडून येते तिला कागदी चलन वाढ असे म्हणतात.
२) पत निर्मितीमुळे जी चलन वाढ घडून येते तिला पत निर्मिती चनल वाढ म्हणतात.
३) तुटीचा अर्थ भरणा केल्यामुळे चलन वाढ होते.
४) परकीय कर्जाचा पुरवठा झाल्यामुळे चलन वाढ होते.
५) सरकारी खर्च तसेच सरकारच्या अनुत्पादक खर्चात वाढ झाल्यास चलन वाढ होते.
६) मागणी निर्मित चलन वाढ – ज्या वेळी वस्तूचा जेवढा पुरवठा करणे शक्य असते त्या पेक्षा अधिक वस्तूची मागणी निर्माण झाली तर जी भाववाढ म्हणजेच चलन वाढ होते त्यालाच मागणी निर्मित चलन वाढ असे म्हणतात.
चलन वाढीचे / भाववाढीचे परिणाम ः-
१) उत्पादनावर होणारे परिणाम – भाववाढीच्या सुरुवातीच्या काळात उद्योजक वस्तूचे उत्पादन वाढतात त्यामुळे बेकारी कमी होते परंतु, भाववाढ होतच राहिल्यास वस्तूच्या किंमती खुप वाढल्या तर वस्तुची मागणी घटते.त्यामुळे उत्पादन पडून राहते. उद्योजक वस्तू उत्पादन कमी करतात त्यामुळे बेकारीची अवस्था निर्माण होते. बेकारीमुळे वस्तूची मागणी कमी होऊन अर्थव्यवस्थेत मंदी येते.
२) विभाजनावर होणारे परिणाम – अ) श्रमिक – याघटकाचे वेतन कायम राहते किंमत वाढ झाली तर तो गरीब बनतो त्याचे राहणीमान खालावते.
ब) भूमी- या घटकाचा खंड अगोदरच ठरलेला असतो परंतु, किंमत वाढीमुळे वस्तूच्या किंमती वाढल्यामुळे त्याचे राहणीमान खालावते.
क) धनको / भांडवलदार / कर्जपुरवठा करणारा – पैशाचे मूल्य कमी झाल्याने धनकोंना तोटा होतो कारण, व्याज दर अगोदर ठरलेला असल्याने तो कमी असतो.
ड) संयोजक – चलन वाढीमुळे संयोजकाचा नफा वाढतो.
संकीर्ण
वस्तू व सेवा यांचा प्रवाह उद्योग संस्थांकडून कुटूंबाकडे वाहतो त्याच वेळी खर्चाचा (पैसा) प्रवाह कुटूंबाकडून उद्योग संस्थांकडे वाहतो.
उत्पादक घटकांची खरेदी विक्री जेथे चालते त्याला घटक बाजार असे म्हणतात.
मागणी व पुरवठा नेहमीच समान असतात असे से (जे. बी.से.) चा नियम सांगतो कारण, त्यांच्या मते प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत एकूण मागणी व एकूण पुरवठा समान असतो.
पैशाचे मुल्य व किंमत या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
जेव्हा एखाद्या वस्तूचे मूल्य हे पैशात सांगितले जाते तेव्हा त्यांना त्या वस्तूची किंमत म्हणतात.
क्राऊथर यांच्या मते आवाजवी चलन विस्तार म्हणजे अशी व्यवस्था की ज्यामुळे पैशाचे मूल्य कमी होते म्हणेच वस्तूच्या किंमतीत वाढ होते.
वस्तूच्या किंमती घसरल्या असता वस्तूची मागणी वाढते,
मुद्रेची वस्तू व सेवा खरेदी करण्याची क्षमता म्हणजे क्रय शक्ती होय.
वस्तूच्या अंगी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे वस्तूची उपयोगिता होय.
अर्थशास्त्राच्या मते ग्राहकांचा वस्तू करण्यामागे गरज भागविणे, समाधान मिळाविणे, उपभोग घेणे हा आधार आहे.
सतत एकाच वस्तूच्या उपभोगापासून मिळणारी वस्तूची उपयोगीता घटत जाणे याला घटत्या उपयोगीतेचा सिध्दांत असे म्हणतात
अर्थशास्त्राच्या भाषेत उत्पादन म्हणजे उपयोगीतेची निर्मिती होय.
बाजारपेठेतील मक्तेदारी म्हणजे एका वस्तूचा एकच विक्रेता होय.
आरोग्य
आरोग्य
जागतिक आरोग्य संघटनेने २० ऑगस्ट २०१० रोजी स्वाईन फ्लू या रोगाची साथ आटोक्यात आल्याची घोषणा केली.
महाराष्ट्रात स्वाईन फ्ल्यू ने सर्वाधिक लोक पुणे शहरात दगावले गेले.
स्वाईन फ्लूची लस २००९ पासून इंजक्शनव्दारे व नाकाद्वारे उपलब्ध करू देण्यात आली होती.
हेरॉइन, चरस / हशीश , कोकेन हे अंमली पदार्थ आहे.
भारतातील पहिली स्वाईन फ्लूची लस – एचएनव्हीएसी
ही लस भारत बायोटेक या कंपनीने एच- १ एन -१ या स्वाईन फ्लूच्या विषाणूवर मात करणारी विकसित केली.
भारतातील पहिली ह्रदयरोपण शस्त्रक्रिया १९७४ साली डॉ. वेणुगोपाल यांनी दिल्ली येथे केली.
ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१० मध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीस या लागण झाली होती.
महाराष्ट्रात सर्वात जास्त एड्स रोगाचे रुग्ण मुंबईत आढळतात, तर दुसरा क्रमांक पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागतो.
सिकलसेल ऍनिमिया आजार:
देशात सर्वात जास्त सिकलसेल ऍनिमिया आजाराचे रुग्ण छत्तीसगड राज्यात आढळतात.
हा आजार अनुवंशीक असून शरिरातील लाल पेशीमधील गिमोग्लोबिनच्या गुणसुत्रामध्ये विकृती आली तर होतो.
हा आजार आदिवासी बहुल भागातील लोकांना होण्याचे प्रमाण जास्त आहे.
या आजारावर अद्याप प्रभावशाली औषध तयार झालेले नाही.
एण्डोसल्फान या किटक नाशकावर केरळ सरकारने विक्रीस बंदी घातली .
या किटक नाशकामुळे मानसिक , लैंगिक व बौध्दीक विकृती बरोबरच अनेक प्रकारचे अपंगत्व येवून लोक मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण केरळमध्ये सर्वाधिक होते.
हे प्रभावशाली किटक नाशक कापूस,चहा व काजू यांच्या उत्पादनासाठी वापरले जाते.
भारताचा गर्भवती मातांच्या मृत्यूच्या प्रमाणात जगाच्या १३४ देशाच्या सर्वेक्षणामध्ये १२७ वा क्रमांक आहे.
सेव्ह द बेबी गर्ल हा उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी राबविला जातो.
सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमाचे जनक – गिरिष लाड.
या उपक्रमा अंतर्गत सोनोग्राफी यंत्रणा सायलेंट ऑबझरवर लावले जाते.
परिणामी स्त्री भ्रुण निदान करण्याच्या नोंदी आपोआप होतात.
मलेरिया हा आजार प्लासमोडियम प्रजातीच्या परजीवीमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे.
मलेरिया हा आजार डासाद्वारे पसरतो हा शोध ब्रिटिश भारतीय शास्त्रज्ञ रोनाल्ड रॉस यांनी लावला.
मलेरियाचा प्रसार ऍनाफिलिस प्रजातीच्या डास चावल्यामुळे होतो.
मलेरियाचे अचुक निदान करण्यासाटी ऍन्टीजेण चाचणी करावी लागते.
१८ वी आंतराष्ट्रीय एड्स परिषद -२०१० – आयोजन – व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
भारतात २७ लाख एचआयव्ही एड्स रुग्ण आहे.
अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग – हेपाटायटिस – बी, हेपाटायटिस – ई , गॅस्ट्रो , कॉलरा, टायफाईड, डायरिया.
मेडीकल कौन्सील ऑफ इंडियाचे अध्यक्ष केतन देसाई यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस आला.
मेडीकल कौन्सील ऑफ इंडिया ही संस्था भारत सरकारने बरखास्त केली.
पुणे येथील सीरम इन्स्टीट्युटने नसोवॅक ही स्वाईन फ्लू विरोधी लस विकसित केली
ही लस रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी नाकाद्वारे देण्यात येते. सीरम इन्स्टीट्युटचे संचालक डॉ. सायरस पुनावाला हे आहेत.
कृषी व आरोग्य संघटनाच्या अहवालानुसार भारताची सध्या २२ टक्के लोकसंख्या उपोषण ग्रस्त आहे.
मध्यप्रदेश हे देशातील सर्वात उपोषीत राज्य आहे.
या राज्यातील सुमारे ३० टक्के लोकसंख्या उपोषणग्रस्त आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)